शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

बांधकाम कमिटीच्या हाती रिकाम्या तिजोरीच्या चाव्या !

By admin | Updated: December 5, 2014 00:52 IST

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत दरवर्षी विविध प्रकारच्या कामावर जवळपास २० कोटी रुपये खर्च होतात

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत दरवर्षी विविध प्रकारच्या कामावर जवळपास २० कोटी रुपये खर्च होतात. सर्वाधिक निधी असलेला विभाग म्हणून या खात्याकडे पाहिले जाते. त्यामुळे बांधकाम समितीवर वर्णी लागावी म्हणून सदस्यांमध्ये चढाओढ असते. मात्र चालू आर्थिक वर्षातील निधीचे नियोजन करुन तत्कालीन समितीने कामांना मंजुऱ्याही दिल्या आहेत. त्यामुळे विद्यमान समिती पदाधिकाऱ्यांच्या हद्दीत संबंधित कामांचा आढावा घेण्याखेरीज काहीच उरलेले नाही. सध्यातरी समिती पदाधिकाऱ्यांच्या हाती रिकाम्या तिजोरीच्या चाव्या आहेत. जिल्हा परिषदेत आलेल्या बहुतांश सदस्यांचे लक्ष बांधकाम खात्याकडे असते. सर्वसाधारण सभेतही याच विभागाबाबत अधिकतर चर्चा होते. त्याला कारणही तसेच आहे. कारण या विभागाच्या माध्यमातून वर्षभरात जवळपास २० कोटी रुपये इतका निधी खर्च होतो. या माध्यमातून तीर्थक्षेत्र, आरोग्य, पर्यटनस्थळ, रस्ते आदी कामे राबविले जातात. चालू वर्षातही या विभागाला १९ ते २० कोटीचा निधी मंजूर होता. माजी बांधकाम सभापती धनंजय सावंत यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या निधीच्या माध्यमातून कामांचे नियोजन करुन त्याला मंजुऱ्याही दिल्या. यातील अनेक कामे पूर्ण झाली असून, काही प्रगतीपथावर आहेत. दरम्यान, असे असतानाच मागील दोन ते अडीच महिन्यापूर्वी बांधकाम समितीचे नव्याने गठन झाले आहे. बांधकाम सभापती म्हणून काँग्रेसचे सुधाकर गुंड यांची वर्णी लागली आहे. मात्र, विद्यमान समितीतील सदस्यांना निधीअभावी कामे सूचविण्यास अडचण येत आहे. कारण सध्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे. ही परिस्थिती एप्रिल २०१५ पर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे आगामी चार महिन्यांमध्ये विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या हाती जुन्या कमिटीने मंजूर केलेल्या कामांचा आढावा घेण्याखेरीज काहीही उरलेले नाही. त्यामुळे नव्याने समितीवर आलेल्या सदस्यांत नाराजी आहे. (प्रतिनिधी)४एकीकडे कामे सुचविण्यास वाव नसताना दुसरीकडे मंजूर झालेली तब्बल ३९ कामे शासनाच्या निर्देशानुसार रद्द करण्यात आली आहेत. यापैकी सर्वाधिक २७ कामे ही भूम आणि परंडा तालुक्यातील आहेत. तसेच वाशी तालुक्यातील ६, तुळजापूर ५ आणि उस्मानाबाद तालुक्यातील एका कामाचा समावेश आहे. त्यामुळे संबंधित पदाधिकाऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे.