शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
5
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
6
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
7
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
8
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
9
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
10
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
11
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
12
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
13
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
14
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
15
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
16
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
17
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
18
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
19
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
20
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...

कोरडवाहू अभियानातंर्गत मनुष्यबळाचे सक्षमीकरण

By admin | Updated: August 7, 2014 01:29 IST

नांदेड : कोरडवाहू शेती अभियानांतर्गत गावांचा कायापालट झाला आहे.

नांदेड : ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट करुन जनतेचे जीवनमान उंचावण्याकरिता राबविण्यात येत असलेल्या कोरडवाहू शेती अभियानांतर्गत मनुष्यबळाचे सक्षमीकरण करण्यात येत असल्याने गावांचा कायापालट झाला आहे.पहिल्या टप्प्यात चार तर दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील दहा गावांची निवड केली आहे. कोरडवाहू शेतीचा विकास करणे अपरिहार्य असल्यामुळे २०१३-१४ पासून राबविण्यात येत असलेल्या अभियानात जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर व मुदखेड ही तीन तालुके वगळता इतर तेरा तालुक्यांतील १४ गावांची निवड केली आहे. यामुळे या गावांची चोहोबाजूंनी प्रगती होत आहे.या योजनेमध्ये दुसऱ्या टप्प्यात लोहा-धानोरा, कंधार-नंदनवन, धर्माबाद-पाटोदा (खु.), हदगाव-ल्याहरी, उमरी-रामखडक, माहूर-कुपटी, बिलोली-हिप्परगामाळ, हिमायतनगर-किरमगाव तर नायगांव तालुक्यातील मुस्तापूर व कोलंबी या गावांची निवड केली आहे. सदरील गावांना शासनस्तरावर मंजुरी मिळाली असून प्रकल्प आराखड्यास मान्यता दिल्यानंतर या गावामध्ये प्रत्यक्ष विकासकामास सुरुवात होईल.पहिल्या टप्प्यात या अभियानंतर्गत मनुष्यबळ विकास करण्यासाठी ९.७० लाखांपैकी ८.४२ लाख खर्च करण्यात आला आहे. यात शेतीशाळा, शेतकरी सहल, शेतकरी गट संघटन आदी कामे करण्यात आली आहेत. संरक्षित सिंचन सुविधेतंर्गत सिमेंटनाला बांध, पाईप पुरवठा, विंधन विद्युतपंप पुरवठा, शेततळी, खोदकाम, सपाटीकरण, ठिबक व तुषार आदी कामे करण्यात आली असून त्यावर २३२.२० कोटी रुपये खर्च झाले आहेत. मूलस्थानी जलसंधारणासाठी यांत्रिकीकरण, कोरडवाहू पिकांच्या सुधारित वाणांची प्रात्यक्षिके व मृद तपासणी,नियंत्रित शेती आणि प्राथमिक कृषी प्रक्रिया व पणन, ट्रॅक्टर, रोटावेटर ही कामे केली असून यावर ९.६२ लाख खर्च झाला आहे. प्राथमिक कृषी प्रक्रिया व पणन यातंर्गत मिनी दालमिल, भरडधान्य प्रक्रिया उद्योग, पॅकहाऊस, नियंत्रित शेती, हरितगृह, शेडनेट हाऊस आदी कामे झाली आहेत. यावर ४९.६० लाख खर्च करण्यात आले आहेत.या माध्यमातून कोरडवाहू शेतीची उत्पादकता आणि उत्पन्न वाढवून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे, मूलस्थानी मृदसंधारणासह साखळी बंधारे, शेततळी या माध्यमातून संरक्षित सिंचनाच्या सुविधा निर्माण करणे, सूक्ष्म सिंचन वापरुन सिंचनाची कार्यक्षमता वाढविणे, यांत्रिकीकरणाद्वारे उत्पादन खर्च कमी करुन उत्पादकता वाढविणे, शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी नियंत्रित शेती प्राथमिक कृषी प्रक्रिया व पणन सुविधा निर्माण करणे, कोरडवाहू तंत्रज्ञानाचा पीक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रचार व प्रसार, प्रशिक्षण, शेतीशाळा, अभ्यासदौरे या माध्यमातून मनुष्यबळाचे सक्षमीकरण करण्यात येत आहे. २०१३-१४ या वर्षात अवर्षण प्रवण क्षेत्रातील गावांचा समावेश केला आहे. लाभार्थी निवडतांना अल्प व अत्यल्प भूधारक तसेच महिला व मागासवर्गीय शेतकरी, गटाच्या माध्यमातून गटाधारित शेती करणारे शेतकरी, तसेच जलसंधारणाचा अवलंब करुन सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिलेले आहे. पहिल्या टप्प्यात मुखेड तालुक्यातील ठाणा, भोकर-रिठा, देगलूर-भक्तापूर व किनवट तालुक्यातील जरुर या गावामध्ये आजपर्यंत जवळपास ३.१२ कोटींची कामे करण्यात आली आहेत.