शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोरडवाहू अभियानातंर्गत मनुष्यबळाचे सक्षमीकरण

By admin | Updated: August 7, 2014 01:29 IST

नांदेड : कोरडवाहू शेती अभियानांतर्गत गावांचा कायापालट झाला आहे.

नांदेड : ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट करुन जनतेचे जीवनमान उंचावण्याकरिता राबविण्यात येत असलेल्या कोरडवाहू शेती अभियानांतर्गत मनुष्यबळाचे सक्षमीकरण करण्यात येत असल्याने गावांचा कायापालट झाला आहे.पहिल्या टप्प्यात चार तर दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील दहा गावांची निवड केली आहे. कोरडवाहू शेतीचा विकास करणे अपरिहार्य असल्यामुळे २०१३-१४ पासून राबविण्यात येत असलेल्या अभियानात जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर व मुदखेड ही तीन तालुके वगळता इतर तेरा तालुक्यांतील १४ गावांची निवड केली आहे. यामुळे या गावांची चोहोबाजूंनी प्रगती होत आहे.या योजनेमध्ये दुसऱ्या टप्प्यात लोहा-धानोरा, कंधार-नंदनवन, धर्माबाद-पाटोदा (खु.), हदगाव-ल्याहरी, उमरी-रामखडक, माहूर-कुपटी, बिलोली-हिप्परगामाळ, हिमायतनगर-किरमगाव तर नायगांव तालुक्यातील मुस्तापूर व कोलंबी या गावांची निवड केली आहे. सदरील गावांना शासनस्तरावर मंजुरी मिळाली असून प्रकल्प आराखड्यास मान्यता दिल्यानंतर या गावामध्ये प्रत्यक्ष विकासकामास सुरुवात होईल.पहिल्या टप्प्यात या अभियानंतर्गत मनुष्यबळ विकास करण्यासाठी ९.७० लाखांपैकी ८.४२ लाख खर्च करण्यात आला आहे. यात शेतीशाळा, शेतकरी सहल, शेतकरी गट संघटन आदी कामे करण्यात आली आहेत. संरक्षित सिंचन सुविधेतंर्गत सिमेंटनाला बांध, पाईप पुरवठा, विंधन विद्युतपंप पुरवठा, शेततळी, खोदकाम, सपाटीकरण, ठिबक व तुषार आदी कामे करण्यात आली असून त्यावर २३२.२० कोटी रुपये खर्च झाले आहेत. मूलस्थानी जलसंधारणासाठी यांत्रिकीकरण, कोरडवाहू पिकांच्या सुधारित वाणांची प्रात्यक्षिके व मृद तपासणी,नियंत्रित शेती आणि प्राथमिक कृषी प्रक्रिया व पणन, ट्रॅक्टर, रोटावेटर ही कामे केली असून यावर ९.६२ लाख खर्च झाला आहे. प्राथमिक कृषी प्रक्रिया व पणन यातंर्गत मिनी दालमिल, भरडधान्य प्रक्रिया उद्योग, पॅकहाऊस, नियंत्रित शेती, हरितगृह, शेडनेट हाऊस आदी कामे झाली आहेत. यावर ४९.६० लाख खर्च करण्यात आले आहेत.या माध्यमातून कोरडवाहू शेतीची उत्पादकता आणि उत्पन्न वाढवून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे, मूलस्थानी मृदसंधारणासह साखळी बंधारे, शेततळी या माध्यमातून संरक्षित सिंचनाच्या सुविधा निर्माण करणे, सूक्ष्म सिंचन वापरुन सिंचनाची कार्यक्षमता वाढविणे, यांत्रिकीकरणाद्वारे उत्पादन खर्च कमी करुन उत्पादकता वाढविणे, शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी नियंत्रित शेती प्राथमिक कृषी प्रक्रिया व पणन सुविधा निर्माण करणे, कोरडवाहू तंत्रज्ञानाचा पीक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रचार व प्रसार, प्रशिक्षण, शेतीशाळा, अभ्यासदौरे या माध्यमातून मनुष्यबळाचे सक्षमीकरण करण्यात येत आहे. २०१३-१४ या वर्षात अवर्षण प्रवण क्षेत्रातील गावांचा समावेश केला आहे. लाभार्थी निवडतांना अल्प व अत्यल्प भूधारक तसेच महिला व मागासवर्गीय शेतकरी, गटाच्या माध्यमातून गटाधारित शेती करणारे शेतकरी, तसेच जलसंधारणाचा अवलंब करुन सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिलेले आहे. पहिल्या टप्प्यात मुखेड तालुक्यातील ठाणा, भोकर-रिठा, देगलूर-भक्तापूर व किनवट तालुक्यातील जरुर या गावामध्ये आजपर्यंत जवळपास ३.१२ कोटींची कामे करण्यात आली आहेत.