शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

पाणी बचतीवर भर! छत्रपती संभाजीनगरात ९२ हजार शेतकऱ्यांनी पोकरातून घेतले ठिबक,तुषार सेट

By बापू सोळुंके | Updated: May 9, 2024 12:48 IST

२०१८ ते २०२३ या पाच वर्षासाठी पोकरा योजनेचा पहिला टप्पा पूर्ण राबविण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या (पोकरा) पाच वर्षाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार ८६१ शेतकऱ्यांनी लाभ घेतला. सतत दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाणी बचतीला प्राधान्य देणाऱ्या ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन सेट घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तब्बल ९२ हजार ५८३ असल्याचे दिसून येते. यासाठी शेतकऱ्यांना तब्बल ६२२ कोटी ५१ लाख रुपयांचे अनुदान शासनाने दिल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली.

२०१८ ते २०२३ या पाच वर्षासाठी पोकरा योजनेचा पहिला टप्पा पूर्ण राबविण्यात आला. पोकरा योजनेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४९५ गावांचा समावेश करण्यात आला होता. बहुतेक योजनेमध्ये ७५ ते ८० टक्के अनुदान शासनाने दिले होते. यामुळे जिल्ह्यातील तब्बल १ लाख ३८ हजार ८६१ शेतकऱ्यांनी ‘पोकरा’तील योजनांचा लाभ घेतला. सतत पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील सर्वाधिक ७४ हजार ३५० शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन सेट घेतल्याचे दिसून येते. पाणी बचत करणाऱ्या या यंत्रणांचा लाभ घेणाऱ्या ठिबकच्या लाभार्थी शेतकऱ्यांना शासनाने ५५८ कोटी ९४ लाख ९८ हजार २७० रुपये तर तुषार सिंचन योजनेेचा तब्बल १८ हजार २३३ शेतकऱ्यांनी लाभ घेतला. तुषार सिंचन योजनेच्या लाभार्थ्यांना ३३ कोटी ५६ लाख ९८० रुपयांचे अनुदान देण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

८० टक्के अनुदानावर शेती उपयोगी यंत्रणापोकरामध्ये शेतकऱ्यांना ठिबक सिंचन सेट पुरविणे, गांडूळखत निर्मिती सेट देणे, पोल्ट्री उद्योगास साहाय्य, शेती यांत्रिकीकरण, वैयक्तिक शेततळे योजना, शून्य मशागत शेती प्रोत्साहन योजना, फळबाग योजना, मधुमक्षिकापालन, शेडनेट हाऊस, तुषार सिंचन सेट, फवारणी यंत्र, वैयक्तिक विहीर, शेततळे अस्तरीकरण योजना, पाइपलाइन, विहीर पुनर्भरण योजना, पॉलिहाऊस योजना, रेशीम शेती, मत्स्यपालन, मोटारपंप इ.चा यात समावेश होता.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले ९८७ कोटी ३३ लाख रुपये अनुदानपोकराच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार ८६१ शेतकऱ्यांना सुमारे ९८७ कोटी ३३ लाख ३ हजार ८१० रुपये अनुदान मागील पाच वर्षात प्राप्त झाले. यात सर्वाधिक लाभार्थी ठिबक सिंचनचे तर फळबाग लागवडीसाठी १५ हजार ८५५ शेतकऱ्यांना ४० कोटी ६३ लाख ४६ हजार ८७१ रुपयांचे अनुदान मिळाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र