शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वेरूळ आणि अजिंठा लेणी बंद; प्री बुकिंग केलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 12:13 IST

ज्यांनी बुकिंग करून भारतामध्ये पर्यटनाचा बेत आखला आहे, त्यांनी आता काय करावे, असा प्रश्न आहे.

औरंगाबाद : कोरोना रुग्णांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, लेणी पूर्णतः बंद करण्यात येऊ नयेत, अशी मागणी उद्योजक आणि औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांची गैरसोय झाली आहे. ज्यांनी बुकिंग करून भारतामध्ये पर्यटनाचा बेत आखला आहे, त्यांनी आता काय करावे, असा प्रश्न आहे. कोरोनामुळे तिसऱ्यांदा पर्यटनस्थळे बंद झाली आहेत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर वेरूळ आणि अजिंठा लेणी बंद होणार आहेत. मात्र लेणी बंद वातावरणात असलेल्या शॉपिंग मॉल्स आणि सिनेमा थिएटरपेक्षा नैसर्गिकरीत्या हवेशीर असतात. त्यामुळे संपूर्ण कोविड प्रोटोकॉलसह ही स्मारके सुरू ठेवावीत, परंतु पूर्णपणे बंद करू नयेत. कारण यामुळे औरंगाबादच्या पर्यटनावर अवलंबून असलेल्या सर्वांचे प्रचंड नुकसान होईल, असे कोठारी यांनी नमूद केले.

शॉपिंग मॉल्स, सिनेमा थिएटर्स आणि आता जिम्नॅशियमला ५० टक्के क्षमतेने काम करण्याची परवानगी आहे. पण वेरूळ आणि अजिंठा यासारखी स्मारके पूर्णपणे बंद झाली तर पर्यटन क्षेत्रासाठी अन्यायकारक आहे. ही स्मारके वारंवार बंद केल्यामुळे गाईड, कार, बस आणि टॅक्सी ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर, हस्तकला आणि यासारख्या पर्यटन उद्योगातील सर्व भागधारकांवर नकारात्मक प्रभाव पडेल, असे सुनीत कोठारी यांनी नमूद केले आहे.

शासनाचे आदेशजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले, हे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे त्या आदेशांचे पालन करावे लागेल. नव्याने आदेश काढलेले नाहीत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAjantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटन