शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

जिल्ह्यातील प्रकल्पांत अकरा टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:46 IST

जालना : समाधानकारक पावसाअभावी जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये केवळ ११ टक्के उपयुक्त जलसाठा आहे,

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : समाधानकारक पावसाअभावी जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये केवळ ११ टक्के उपयुक्त जलसाठा आहे, तर ६४ पैकी ३८ प्रकल्प अद्याप जोत्याखाली असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात सात मध्यम तर ५७ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची एकूण साठवण क्षमता २७३.२५ दलघमी आहे. या आठवड्यातील अहवालानुसार मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये केवळ २५.७१ दलघमी जलसाठा आहे. यातील उपयुक्त जलसाठ्याची टक्केवारी १०.८२ टक्के एवढा आहे. कल्याण गिरजा, कल्याण, अप्पर दुधना, जुई, धामणा, जीवरेखा, गल्हाटी या मध्यम प्रकल्पांमध्ये २४. ७३ टक्के जलसाठा आहे. वाकी, दरेगाव, जामवाडी, निरखेड तांडा, वानडगाव, पिंपळवाडी, कुंभेफळ, सोमठाणा, बरंजळा, प्रल्हादपूर, पिंपळगाव कोलते, चांदईएक्को,पळसखेडा, बानेगाव, चिंचखेडा, डोलखेडा, डावरगाव, कानडगाव, भातखेडा, सुखापुरी, धनगरपिंप्री, खडकेश्वर, टाक, लासुरा, पाणेगाव, तळेगाव, मुसा भद्रायणी दहेगाव, जांबसमर्थ इ. लघु प्रकल्प अद्याप जोत्याखाली आहेत. तर सारवाडी व नेर प्रकल्प पूर्णत: कोरडा आहे. मोठ्या सात प्रकल्पांपैकी तीन तर ५७ लघु प्रकल्पांमधील ५२ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा उपलब्ध आहे. जालना जिल्ह्याची पावसाची एकूण सरासरी ६८८ मिलीमीटर असून, आतापर्यंत केवळ २१०. २७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्यामुळे बहुतांश प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. याचा पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला. मात्र, यंदा जिल्ह्यात अद्यापही सर्वदूर दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे विहिरींना अद्यापही पाणी आलेले नाही. पिकांची स्थिती नाजूक असून, दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. शेतकरी आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.