शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

‘डीएमआयसी’त इलेक्ट्रॉनिक्स झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2016 02:00 IST

औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरअंतर्गत (डीएमआयसी) उभारण्यात येणाऱ्या शेंद्रा- बिडकीन मेगा पार्कची इलेक्ट्रॉनिक्स झोन म्हणून निवड करण्यात आली

औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरअंतर्गत (डीएमआयसी) उभारण्यात येणाऱ्या शेंद्रा- बिडकीन मेगा पार्कची इलेक्ट्रॉनिक्स झोन म्हणून निवड करण्यात आली असून, स्टरलाईटचा प्रकल्प याठिकाणी आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत, असे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी येथे सांगितले.अ. भा. ब्राह्मण महासंघाच्या ब्राह्मण उद्योग संमेलनाचे उद्घाटन देसाई यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पेट्रोलियम पदार्थानंतर भारतात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची भारतातच निर्मिती व्हावी, असे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यासाठी शेंद्रा- बिडकीन मेगा पार्कमध्ये इलेक्ट्रॉनिक्स झोन निर्माण केला जाणार आहे. जगभरातील आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या येथे याव्यात, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. स्टरलाईट टेक्नॉलॉजीज्चा भारतातील पहिला ‘एलसीडी’ निर्मिती प्रकल्प औरंगाबादेत आणण्याचे प्रयत्न केले जात असून, याबाबत कंपनीशी प्राथमिक बोलणीदेखील झाली आहे, असे देसाई यांनी सांगितले.चिकलठाण्यातून लवकरच आंतरराष्ट्रीय उड्डाणे‘डीएमआयसी’ तसेच ड्रायपोर्टमुळे औरंगाबादच्या विकासाला चालना मिळेल. चिकलठाणा विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांची ये-जा सुरू झाल्यास खऱ्या अर्थाने उद्योगांची भरभराट होईल. त्यासाठी विमानतळाचे विस्तारीकरण गरजेचे आहे. विस्तारीकरणासाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली असून, लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही देसाई यांनी स्पष्ट केले. शेंद्र्यात आॅईल डेपोमराठवाड्याला मनमाडजवळील पानेवाडी येथून पेट्रोल, डिझेल, रॉकेलचा पुरवठा केला जातो. ही बाब खर्चिक ठरत असल्याने शेंद्र्यात स्वतंत्र आॅईल डेपो सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असल्याचे देसाई यांनी सांगितले.ब्राह्मणांनो न्यूनगंड बाळगू नकामहाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री देण्याचा चमत्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला होता. मनोहर जोशी यांच्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने दुसऱ्यांदा राज्याला ब्राह्मण मुख्यमंत्री मिळाले आहेत. त्यामुळे ब्राह्मणांनी कसलाही न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वास, स्वाभिमानाने पुढे गेले पाहिजे, असे सुभाष देसाई यांनी नमूद केले. ब्राह्मण समाजाला उद्योगांची मोठी परंपरा लाभली आहे. किर्लोस्कर, बडवे आदींचे उद्योग सुरुवातीला सूक्ष्म होते. त्यानंतर त्यांचा वटवृक्ष झाला. त्यामुळे आपला उद्योग लहान असल्याची खंत बाळगू नका. आज छोटा असणारा तुमचा उद्योग भविष्यात निश्चित मोठा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नव्याने सुरू झालेल्या लघु उद्योगांपैकी ३० टक्के उद्योगच पुढे टिकतात. ७० टक्के उद्योग अडचणींमुळे बंद पडतात. हे उद्योग पुन्हा सक्षम करण्याची जबाबदारी ब्रह्मोद्योग संघटनेने घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. खा. चंद्रकांत खैरे, चितळे उद्योग समूहाचे नानासाहेब चितळे, बडवे उद्योग समूहाचे श्रीकांत बडवे, आ. संजय शिरसाट, आ.अतुल सावे, अ. भा. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, रवींद्र वैद्य, रेणुकादास वैद्य, विश्वजित देशपांडे, अनिल मुळे आदी उपस्थित होते.