शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

नांदेड-मनमाड लोहमार्गाचे विद्युतीकरण दोन वर्षांत : रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2021 12:14 IST

Raosaheb Danve : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाची बैठक प्रथमच औरंगाबादेत घेण्यात आली.

ठळक मुद्देमराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांवर दिल्लीत बैठक घेऊ

औरंगाबाद : नांदेड ते मनमाडपर्यंतच्या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण २०२३ पर्यंत पूर्ण केले जाईल ( Electrification of Nanded-Manmad railway) . दक्षिण मध्य रेल्वेचा नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडण्याची मागणी आहे. शिवाय, या लोहमार्गाच्या दुहेरीकरणाची मागणी जुनी आहे आणि मी याच कामाचा पाठपुरावा करीत आहे, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve) यांनी बुधवारी रेल्वेच्या बैठकीत सांगितले. सर्व प्रलंबित मागण्यांसाठी अधिवेशन काळात दिल्लीत मराठवाड्यातील ( Marathwada )  खासदार आणि रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाची बैठक प्रथमच औरंगाबादेत घेण्यात आली. यावेळी राज्यमंत्री दानवे म्हणाले, फायद्यात नसलेले रेल्वेमार्ग आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने ५० टक्के वाटा दिला पाहिजे. त्यासाठी सर्वजण मुख्यमंत्र्यांना भेटू. बैठकीत उपस्थित खासदारांनी आपल्या मागण्या मांडल्यानंतर रावसाहेब दानवे म्हणाले, यापूर्वी खासदार म्हणून बैठकीत मुद्दे मांडत होतो. आज मंत्री म्हणून आलो आहे. मराठवाड्याच्या रेल्वे विकासासाठी प्रयत्न केला जाईल. राज्य सरकारकडे काही विषय प्रलंबित आहेत. नवीन रेल्वेमार्ग आणि भुयारी मार्गांच्या कामात राज्याचा वाटा असतो.

मुदखेड - परभणी काम पूर्ण‘एससीआर’च्या अधिकार क्षेत्रात महाराष्ट्रासाठी ४ हजार २६४ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. या कामांमध्ये २६३ कि.मी. दुहेरी लाईन, ४२ कि.मी. तिसरी लाईन आणि ९३० किलोमीटरच्या विद्युतीकरणाचा समावेश आहे. ८१ किलोमीटर लांबीच्या मुदखेड-परभणीदरम्यानच्या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. यावेळी दानवे म्हणाले, अकोला-अकोटदरम्यान ४३ कि.मी. गेज रूपांतराचे कामही पूर्ण झाले आहे. ३४ कि.मी. अंतरासाठी अकोला-लोहगडदरम्यान विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. भारतीय रेल्वे सुरक्षेशी संबंधित पायाभूत कामांना प्राधान्य देते. ज्यात भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल यांचा समावेश आहे. औरंगाबादेतील शिवाजीनगर रेल्वेगेटवर कॉस्ट शेअरिंग तत्त्वावर भुयारी मार्ग केला जाईल. बीड-परळीदरम्यान ३० कि.मी. अंतरासाठी नवीन रेल्वे लाईनचे काम पूर्ण झाले आहे आणि चालू आर्थिक वर्षात ३० किलोमीटरचा आणखी एक भाग पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असेही दानवे म्हणाले.

औरंगाबाद-चाळीसगाव हा मार्ग फायद्याचा नाहीपॅसेंजर रेल्वे फायद्यात नाही; कारण एक रुपया खर्च केल्यानंतर ४८ पैशांचे नुकसान होते. हे नुकसान मालवाहतुकीतून भरून काढले जाते. मात्र, चाळीसगाव येथे मालवाहतूक नसल्याने औरंगाबाद-चाळीसगाव हा मार्ग फायद्याचा नाही. त्यासाठी राज्य सरकारने वाटा वाढवून दिला तरच शक्य होईल. राज्यानुसार झोन झालेले नाहीत. नांदेड विभाग मध्य रेल्वेतून काढण्यासाठी रेल्वे बोेर्डाशी चर्चा केली जाईल. पुण्याला जाण्यासाठी नांदेडहून रेल्वे सुरू केली जाईल, असे दानवे म्हणाले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा