शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

नांदेड विभागातील रेल्वे मार्गावर एप्रिलपासून होईल विद्युतीकरणाचे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 17:33 IST

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे मार्गावर एप्रिल २०१८ पासून विद्युतीकरणाचे काम सुरू होणार आहे. दुहेरीकरणाचे काम करण्यासोबतच एकेरी मार्गावर विद्युतीकरण होईल.

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे मार्गावर एप्रिल २०१८ पासून विद्युतीकरणाचे काम सुरू होणार आहे. दुहेरीकरणाचे काम करण्यासोबतच एकेरी मार्गावर विद्युतीकरण होईल. हे काम सुरू करण्यासाठी सध्या सर्वेक्षण सुरू असून, विद्युतीकरणाच्या कामाने इंजिन नादुरुस्तीच्या घटनांना कायमस्वरुपी आळा बसेल, असे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा म्हणाले. 

नांदेड विभागाच्या व्यवस्थापकपदी २२ नोव्हेंबर रोजी त्रिकालज्ञ राभा हे रुजू झाले. पदभार घेतल्यानंतर औरंगाबादेतील पहिल्या दौर्‍यात बुधवारी (दि.२०) मुख्य रेल्वेस्टेशन, मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन आणि चिकलठाणा येथे पीटलाईनसंदर्भात पाहणी केली. पाहणीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना रेल्वेच्या विद्युतीकरणाविषयी त्यांनी माहिती दिली.

रेल्वे प्रशासनाकडून नांदेड- मुदखेड या मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. यात परभणी- मिरखेल या १७ किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. नांदेड विभागात रेल्वेचे इंजिन नादुरुस्तीच्या घटनांचे प्रमाणही अधिक आहे. इंजिन नादुरुस्तीनंतर या मार्गावरील रेल्वेची वाहतूक ठप्प होते. इंजिन दुरुस्त होणे अथवा दुसरे इंजिन येण्यात बराच वेळ जातो. त्यामुळे तासन्तास रेल्वे वाहतूक खोळंबते. गेल्या अनेक वर्षांपासून दुहेरीकरणाची प्रतीक्षा केली जात आहे. 

याविषयी त्रिकालज्ञ राभा म्हणाले, एप्रिलपासून विद्युतीकरणाचे काम केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेले सुरुवातीचे काम आणि सर्वेक्षण सध्या सुरू आहे. विद्युतीकरणात वीज कोठून घ्यायची, रेल्वे मार्गावरील पूल, भुयारी मार्गांची स्थिती, उच्चदाबाच्या वीजवाहिन्यांची स्थिती आदी गोष्टींचा आढावा घेतला जात आहे. दुहेरीकरणाच्या कामांबरोबरच एकेरी मार्गावर विद्युतीक रण होईल. दुहेरीकरणाने रेल्वेची संख्या वाढेल. तसेच क्रॉसिंगसाठी अधिक वेळ रेल्वे रोखण्याचा प्रकार थांबेल, असे ते म्हणाले.

मुकुंदवाडीचे काम महिनाभरातमुकुंदवाडी रेल्वेस्टेशनवरील विकासकामे गेल्या अनेक महिन्यांपासून ‘स्लो ट्रॅक ’वर सुरू आहेत. येथील कामे आगामी महिनाभरात पूर्ण होतील. मुकुंदवाडी येथे भुयारी मार्ग होणे अवघड असल्याचे त्रिकालज्ञ राभा म्हणाले.

कामे पूर्ण करण्यास प्राधान्यऔरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील विविध सोयी-सुविधांची पाहणी करून राभा यांनी अधिकार्‍यांना विविध सूचना दिला. स्टेशनवरील परिस्थिती चांगली आहे. प्रवाशांनी ते अधिक चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सध्या अनेक प्रकल्प सुरू आहेत. ही कामे पूर्ण करण्यास आधी प्राधान्य असल्याचे त्रिकालज्ञ राभा म्हणाले.