शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
5
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
6
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
8
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
9
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
10
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
11
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
12
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
13
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
14
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
15
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
16
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
17
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
18
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
19
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
20
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन

नव वर्षात हा बदल होणार, रिचार्ज केल्यानंतरच मिळेल वीज; पैसा संपताच बत्ती होणार गुल !

By साहेबराव हिवराळे | Updated: December 28, 2023 18:21 IST

देशभरात कुठेही तुम्ही राहत असलात तरी येत्या वर्षभरापासून तुम्हाला विजेच्या वापरासाठी आधी पैसे मोजावे लागणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर : थकबाकीला आवर घालण्यासाठी महावितरण आता स्मार्ट मीटर घेऊन येणार आहे. रिचार्ज केल्यानंतरच वीज मिळणार आहे. मोबाईलप्रमाणे पैसे संपले की वीज गुल होईल. त्यामुळे अतिवीज वापरावर चाप बसणार आहे. वीज चोरीच्या घटनांना ब्रेक लागणार आहे. थकबाकीमुळे वीज पुरवठा कट करून राजरोसपणे वीज जोडणी घेणाऱ्यांची संख्या अधिक बळावलेली आहे. यावर गुन्हे दाखल होऊनही कारवाईला न जुमानता वीज चोऱ्या केल्या जात असल्याने प्रीपेड मीटर त्यावर पर्याय असल्याचे हेरलेले आहे. प्रत्येक घरी प्रीपेड स्मार्ट मीटर लागणार आहेत.

पुढील वर्षापासून देशभर अनिवार्य ?देशभरात कुठेही तुम्ही राहत असलात तरी येत्या वर्षभरापासून तुम्हाला विजेच्या वापरासाठी आधी पैसे मोजावे लागणार आहेत.

जिल्ह्यात घरगुती पाच लाख ग्राहकविजेची बिले थकवणाऱ्यांना आणि विजेची चोरी करणाऱ्या ग्राहकांना चाप बसवण्यासाठी केंद्र सरकारने आता प्रीपेड म्हणजेच वीज वापरण्याआधीच पैसे भरावे लागतील अशी योजना आणली आहे.

जेवढा रिचार्ज तेवढी मिळेल वीजयेत्या वर्षभरापासून तुम्हाला विजेच्या वापरासाठी आधी पैसे मोजावे लागणार आहेत.जेवढे रिचार्ज असेल तेवढीच वीज तुम्हाला वापरता येणार आहे. त्यामुळे वीज चोरून वापरणाऱ्यांची मोठी अडचण होणार असून, स्मार्ट मीटर घेण्याशिवाय पर्याय राहणारच नाही.

मोबाईलप्रमाणेच रिचार्ज संपले की वीज गुलदेशभरातील सर्व विजेचे मीटर बदलून त्याऐवजी स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. सर्व विद्युत वितरण कंपन्यांना हे स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जिल्ह्यात तीन कोटींवर थकबाकीजिल्ह्यात थकबाकीदारांची लिस्ट मोठी असून, त्यातून बहुतांश वीज थकबाकीदाराकडून वसुली झालेली आहे.स्मार्ट मीटर आल्यावर त्याचा फायदा कंपनीला होणार असून, वीजचोराला चाप बसणार आहे.

कधीपासून लागणार प्रीपेड स्मार्ट मीटर?कधी बसणार महावितरण स्मार्ट मीटर याची चर्चा जोरात सुरू असून, पुढील वर्षी ही प्रक्रिया सुरू होणार आहे, असे खात्रीलायकपणे सूत्राकडून सांगितले जात आहे.

प्रीपेड स्मार्ट वीज मीटरने वापर जपून होईल..सर्व विद्युत वितरण कंपन्यांना हे स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे स्मार्ट मीटर नक्की आहेत तरी कसे, त्याचा ग्राहकांना काय फायदा, त्यामुळे विजेची बचत होणार का, पैसे संपले की लगेच विद्युतपुरवठा खंडित होणार का असे अनेक प्रश्न यानिमित्ताने पुढे आले आहेत.- महावितरण अधिकारी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectricityवीज