शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

नव वर्षात हा बदल होणार, रिचार्ज केल्यानंतरच मिळेल वीज; पैसा संपताच बत्ती होणार गुल !

By साहेबराव हिवराळे | Updated: December 28, 2023 18:21 IST

देशभरात कुठेही तुम्ही राहत असलात तरी येत्या वर्षभरापासून तुम्हाला विजेच्या वापरासाठी आधी पैसे मोजावे लागणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर : थकबाकीला आवर घालण्यासाठी महावितरण आता स्मार्ट मीटर घेऊन येणार आहे. रिचार्ज केल्यानंतरच वीज मिळणार आहे. मोबाईलप्रमाणे पैसे संपले की वीज गुल होईल. त्यामुळे अतिवीज वापरावर चाप बसणार आहे. वीज चोरीच्या घटनांना ब्रेक लागणार आहे. थकबाकीमुळे वीज पुरवठा कट करून राजरोसपणे वीज जोडणी घेणाऱ्यांची संख्या अधिक बळावलेली आहे. यावर गुन्हे दाखल होऊनही कारवाईला न जुमानता वीज चोऱ्या केल्या जात असल्याने प्रीपेड मीटर त्यावर पर्याय असल्याचे हेरलेले आहे. प्रत्येक घरी प्रीपेड स्मार्ट मीटर लागणार आहेत.

पुढील वर्षापासून देशभर अनिवार्य ?देशभरात कुठेही तुम्ही राहत असलात तरी येत्या वर्षभरापासून तुम्हाला विजेच्या वापरासाठी आधी पैसे मोजावे लागणार आहेत.

जिल्ह्यात घरगुती पाच लाख ग्राहकविजेची बिले थकवणाऱ्यांना आणि विजेची चोरी करणाऱ्या ग्राहकांना चाप बसवण्यासाठी केंद्र सरकारने आता प्रीपेड म्हणजेच वीज वापरण्याआधीच पैसे भरावे लागतील अशी योजना आणली आहे.

जेवढा रिचार्ज तेवढी मिळेल वीजयेत्या वर्षभरापासून तुम्हाला विजेच्या वापरासाठी आधी पैसे मोजावे लागणार आहेत.जेवढे रिचार्ज असेल तेवढीच वीज तुम्हाला वापरता येणार आहे. त्यामुळे वीज चोरून वापरणाऱ्यांची मोठी अडचण होणार असून, स्मार्ट मीटर घेण्याशिवाय पर्याय राहणारच नाही.

मोबाईलप्रमाणेच रिचार्ज संपले की वीज गुलदेशभरातील सर्व विजेचे मीटर बदलून त्याऐवजी स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. सर्व विद्युत वितरण कंपन्यांना हे स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जिल्ह्यात तीन कोटींवर थकबाकीजिल्ह्यात थकबाकीदारांची लिस्ट मोठी असून, त्यातून बहुतांश वीज थकबाकीदाराकडून वसुली झालेली आहे.स्मार्ट मीटर आल्यावर त्याचा फायदा कंपनीला होणार असून, वीजचोराला चाप बसणार आहे.

कधीपासून लागणार प्रीपेड स्मार्ट मीटर?कधी बसणार महावितरण स्मार्ट मीटर याची चर्चा जोरात सुरू असून, पुढील वर्षी ही प्रक्रिया सुरू होणार आहे, असे खात्रीलायकपणे सूत्राकडून सांगितले जात आहे.

प्रीपेड स्मार्ट वीज मीटरने वापर जपून होईल..सर्व विद्युत वितरण कंपन्यांना हे स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे स्मार्ट मीटर नक्की आहेत तरी कसे, त्याचा ग्राहकांना काय फायदा, त्यामुळे विजेची बचत होणार का, पैसे संपले की लगेच विद्युतपुरवठा खंडित होणार का असे अनेक प्रश्न यानिमित्ताने पुढे आले आहेत.- महावितरण अधिकारी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectricityवीज