भांडेगाव : हिंगोली तालुक्यातील जामठी येथील माधव गोविंदराव भवर यांच्या शेतात गट क्र.२०३ मध्ये खांबावरील वीजतारा लोंबकळल्यामुळे शेतामध्ये काम करणे अवघड झाले आहे. कधीही अपघात होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती आहे. जामठीतील भवर यांच्या शेतामधून विद्युत वाहिनीच्या तारा गेल्या आहेत. दरम्यान, या तारा वाऱ्यामुळे खाली आल्या. त्यामुळे या तार कधी तुटून खाली पडतील, याचा नेम राहिलेला नाही. जमिनीपासून केवळ चार ते पाच फूटच उंची असल्याने या तारांना सहज हात लागू शकतो. शेतकऱ्यांना किंवा जनावरांना या भागातून फिरणे अवघड झाले आहे. तारा लोंबकळल्यामुळे शेतातील पेरणी, कोळपणी करणे अवघड झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून या तारा व्यवस्थित करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांमधून होत आहे. (वार्ताहर)
हात पोहोचेल एवढ्या अंतरावर विद्युत तारा
By admin | Updated: August 3, 2014 01:13 IST