शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

'किरकोळ त्रुटींचे अर्ज बाद', राज्यात मतदार नोंदणीतील ढिसाळपणावर निवडणूक विभागाचे ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 18:34 IST

मुख्य निवडणूक विभागाने किरकोळी त्रुटींचे निवारण न करता अर्ज नाकारल्याची बाब गांभीर्याने घेतली आहे. सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना केल्या सूचना

- विकास राऊत

औरंगाबाद : राज्यात मतदार नोंदणीचा सुरू असलेला कार्यक्रम वाऱ्यावरच्या वरातीप्रमाणे राबविला जात असल्याचे आढळल्यामुळे राज्य मुख्य निवडणूक विभागाने या ढिसाळ प्रकरणाबाबत ताशेरे ओढले आहेत. अधिकाऱ्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन मतदार नोंदणी कार्यक्रम पारदर्शकपणे राबविण्याच्या सूचना केल्या आहेत.

आळसावलेल्या यंत्रणेने खातरजमा न करता अनेक अर्ज बाद केल्यामुळे मुख्य निवडणूक विभागाने किरकोळी त्रुटींचे निवारण न करता अर्ज नाकारल्याची बाब गांभीर्याने घेतली आहे. सर्व विधानसभा मतदारसंघांतील सहायक मतदार नोंदणी अधिकारी, नोंदणी अधिकाऱ्यांनी बूथ लेव्हल ऑफिसरच्या अहवालानुसारच अर्ज बाद करण्याचा निर्णय घ्यावा, असे निवडणूक विभागाने म्हटले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२२ या पात्रता तारखेवर मतदारयादी, नोंदणीचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. या मोहिमेतील एईआरओ, ईआरओ, डीईओ आणि सीईओ पातळीवरील १९ हजार ४०० मतदारांचे अर्ज परीक्षणासाठी ईआरओ-नेटमध्ये विशेष पडताळणीसाठी घेतले. यातील बहुतांश अर्ज बीएलओने न पाहताच निकाली काढलेले असल्याचे निदर्शनास आले. अपूर्ण आणि पार्ट-४ नसल्यामुळे अर्ज नाकारले आहेत, तसेच रहिवासी, आधार कार्ड सादर केलेले अर्जदेखील नाकारले आहेत. कागदपत्रे सादर करूनही अर्ज नाकारण्याचे कारण काय, ही बाब स्पष्ट झालेली नाही, तसेच विवाहाचा दाखला, चुकीचा मोबाइल क्रमांक, किरकोळ त्रुटी असलेल्या अर्जांबाबत निवडणूक विभागाच्या यंत्रणेने काहीही परिश्रम न घेता अर्ज बाद केले आहेत.

निवडणूक विभागाने काय म्हटले आहे पत्रात?नवमतदारांच्या किंवा इतर कारणाने आलेल्या अर्जांच्या त्रुटी दुरुस्त करणे शक्य होते; परंतु त्या केलेल्या नाहीत. अर्जदारास त्याची बाजू मांडण्यासाठी संधी दिलेली दिसत नाही. जी कागदपत्रे कमी आहेत, त्याबाबत अर्जदारास सूचना केलेली आढळत नाही. नोंदणीसंदर्भातील आलेल्या अर्जांबाबत बीएलओच्या मंजुरी अहवालाच्या आधारे निर्णय घ्यावा. जी कागदपत्रे कमी आहेत, त्यासाठी अर्जदाराला सुनावणीसाठी बोलावणे गरजेचे आहे. अनेक त्रुटी बीएलओ पातळीवर दुरुस्त झाल्या पाहिजेत, असे राज्य निवडणूक विभागाचे उपसचिव ए.एन. वळवी यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादElectionनिवडणूकAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद