शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

'किरकोळ त्रुटींचे अर्ज बाद', राज्यात मतदार नोंदणीतील ढिसाळपणावर निवडणूक विभागाचे ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 18:34 IST

मुख्य निवडणूक विभागाने किरकोळी त्रुटींचे निवारण न करता अर्ज नाकारल्याची बाब गांभीर्याने घेतली आहे. सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना केल्या सूचना

- विकास राऊत

औरंगाबाद : राज्यात मतदार नोंदणीचा सुरू असलेला कार्यक्रम वाऱ्यावरच्या वरातीप्रमाणे राबविला जात असल्याचे आढळल्यामुळे राज्य मुख्य निवडणूक विभागाने या ढिसाळ प्रकरणाबाबत ताशेरे ओढले आहेत. अधिकाऱ्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन मतदार नोंदणी कार्यक्रम पारदर्शकपणे राबविण्याच्या सूचना केल्या आहेत.

आळसावलेल्या यंत्रणेने खातरजमा न करता अनेक अर्ज बाद केल्यामुळे मुख्य निवडणूक विभागाने किरकोळी त्रुटींचे निवारण न करता अर्ज नाकारल्याची बाब गांभीर्याने घेतली आहे. सर्व विधानसभा मतदारसंघांतील सहायक मतदार नोंदणी अधिकारी, नोंदणी अधिकाऱ्यांनी बूथ लेव्हल ऑफिसरच्या अहवालानुसारच अर्ज बाद करण्याचा निर्णय घ्यावा, असे निवडणूक विभागाने म्हटले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२२ या पात्रता तारखेवर मतदारयादी, नोंदणीचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. या मोहिमेतील एईआरओ, ईआरओ, डीईओ आणि सीईओ पातळीवरील १९ हजार ४०० मतदारांचे अर्ज परीक्षणासाठी ईआरओ-नेटमध्ये विशेष पडताळणीसाठी घेतले. यातील बहुतांश अर्ज बीएलओने न पाहताच निकाली काढलेले असल्याचे निदर्शनास आले. अपूर्ण आणि पार्ट-४ नसल्यामुळे अर्ज नाकारले आहेत, तसेच रहिवासी, आधार कार्ड सादर केलेले अर्जदेखील नाकारले आहेत. कागदपत्रे सादर करूनही अर्ज नाकारण्याचे कारण काय, ही बाब स्पष्ट झालेली नाही, तसेच विवाहाचा दाखला, चुकीचा मोबाइल क्रमांक, किरकोळ त्रुटी असलेल्या अर्जांबाबत निवडणूक विभागाच्या यंत्रणेने काहीही परिश्रम न घेता अर्ज बाद केले आहेत.

निवडणूक विभागाने काय म्हटले आहे पत्रात?नवमतदारांच्या किंवा इतर कारणाने आलेल्या अर्जांच्या त्रुटी दुरुस्त करणे शक्य होते; परंतु त्या केलेल्या नाहीत. अर्जदारास त्याची बाजू मांडण्यासाठी संधी दिलेली दिसत नाही. जी कागदपत्रे कमी आहेत, त्याबाबत अर्जदारास सूचना केलेली आढळत नाही. नोंदणीसंदर्भातील आलेल्या अर्जांबाबत बीएलओच्या मंजुरी अहवालाच्या आधारे निर्णय घ्यावा. जी कागदपत्रे कमी आहेत, त्यासाठी अर्जदाराला सुनावणीसाठी बोलावणे गरजेचे आहे. अनेक त्रुटी बीएलओ पातळीवर दुरुस्त झाल्या पाहिजेत, असे राज्य निवडणूक विभागाचे उपसचिव ए.एन. वळवी यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादElectionनिवडणूकAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद