शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ महाराज यांच्या पादुका मोजक्या वारकऱ्यांसह रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 16:06 IST

वारकऱ्यांना यंदा माऊलीचे दर्शन  घडणार नसल्याने पादुका प्रस्थान समयी वारकरी हवालदिल झाल्याचे दिसून आले.

- संजय जाधव

पैठण: आषाढी वारीसाठी संत श्री एकनाथ महाराज यांच्या पादुका परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने आज नाथमंदिरातून मोजक्या वारकऱ्यासह रवाना करण्यात आल्या. शासनाने पायीवारी रद्द केल्याने औपचारिक प्रस्थान झाल्यानंतर गेल्या १८ दिवसापासून नाथांच्या पादुका गावातील नाथमंदीरात मुक्कामी होत्या. दरम्यान विठ्ठल दर्शनाची आस असणाऱ्या वारकऱ्यांना यंदा माऊलीचे दर्शन  घडणार नसल्याने पादुका प्रस्थान समयी वारकरी हवालदिल झाल्याचे दिसून आले.

४२२ वर्षाची पायीवारीची प्रथा असलेल्या नाथांचा पायी पालखी सोहळा रद्द झाल्याने आषाढी एकादशीच्या दर्शनासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे आज २० वारकऱ्यासह पादुका नाथमंदिरातून वाजत गाजत भानुदास एकनाथ अशा गजरात रवाना करण्यात आल्या. रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे व पालखी प्रमुख हभप रघुनाथ महाराज पालखीवाले यांच्या हस्ते नाथमंदीरात पादुका आरती करण्यात आली.

या वेळी संत एकनाथ महाराज विश्वस्त मंडळाचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे, रेखाताई कुलकर्णी, व वारकरी उपस्थित होते. आरती झाल्यानंतर मंत्री भुमरे व पालखी प्रमुख रघुनाथ महाराज यांच्या हस्ते पादुका शिवशाही बसमध्ये ठेवण्यात आल्या, यावेळी उपस्थित भाविकांनी भानुदास एकनाथ नामाचा गजर करून बसवर पुष्पवृष्टी करण्यात आली. 

ज्या शिवशाही बसने नाथ महाराजांच्या पादुका पंढरपूरला जाणार होत्या. त्या बसला पारंपरिक पालखीस जसे सजवतात तसे फुला पानाने सजविण्यात आले होते.  बस पादुका घेउन निघाल्यानंतर रस्त्याने भाविक नागरिक पालखीचे जसे दर्शन घेत होते तसेच अंतकरणातून बसचे हात जोडून दर्शन घेताना दिसून आले.

रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी नाथाच्या पादुका असलेल्या बसने पैठण तालुक्याच्या सीमेपर्येंत प्रवास केला.  तालुक्याच्या सीमेवर मंत्री भुमरे व तहसीलदार शेळके यांनी बसला निरोप दिला.पादुका असलेल्या बस सोबत तहसीलदार एस एन लाड केअर टेकर ऑफिसर म्हणून रवाना झाले. बस सोबत सुरक्षेसाठी पोलीस व्हँन रवाना झाली.पोलीस व्हँन बस सोबत पैठण ते पंढरपूर व पंढरपूर ते पैठण अशी राहणार आहे.

आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगतसे गुज पांडुरंग...’’ 

पांडुरंगानेच सांगितले ' विसरू नका मज ' आणि देवच जर आमची वारी चुकवतो तर आम्ही काय करायचे अशा उद्विग्न प्रतिक्रिया नियमितपणे पायी वारीस जाणाऱ्या वारकऱ्यातू आज उमटल्या. नाथांच्या पालखीसोबत अनेक वर्षांपासून पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांची वारी चुकल्याने पालखी प्रस्थान समयी त्यांना भरून आले होते. विठ्ठलाच्या भेटीच्या आशेने आषाढीवारीची प्रतिक्षा वारकरी संप्रदायास असते.

उन वारा पाऊस याची तमा न बाळगता, कुठल्याही सोयी सुविधाची अपेक्षा न करता वारकरी विठ्ठल नामाच्या प्रवाहात पंढरपूरकडे पायी प्रवास करत असतो. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायीवारी रद्द झाल्याने हजारो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनास मुकणार असल्याने वारकरी अस्वस्थ झाले आहेत. नाथांच्या पादुका पंढरपूरला रवाना झाल्या तेव्हा वारकऱ्यांची तगमग व घालमेल स्पष्ट दिसून येत होती. आमचे पंढरपूरला येणे होणार नसल्याने बा विठ्ठला आता तुम्हीच आम्हाला भेटायला या अशी भावना वारकरी व्यक्त करत होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaharashtraमहाराष्ट्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस