शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

चोरांच्या मृत्यूप्रकरणी आठ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:46 IST

४०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल : पोलिसांच्या कोम्बिंग आॅपरेशनविरुद्ध वैजापुरात मोर्चा

वैजापूर : तालुक्यातील चांडगाव -पानव येथे शुक्रवारी जमावाने संशयित चोरांच्या टोळीतील आठ जणांना बेदम मारहाण केल्याने दोघांचा मृत्यू झाला होता, तर ६ चोर जखमी झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी कोम्बिंग आॅपरेशन करुन चांडगाव, जरुळ, पानव भागातील जवळपास चारशे जणांवर खून, जीवे मारण्याचा प्रयत्न व दंगलीचा गुन्हा दाखल केला व आठ जणांना अटक केली.चोरांच्या दहशतीमुळे आधीच हैराण झालेल्या नागरिकांमध्ये पोलिसांच्या या भूमिकेने भिती निर्माण झाली आहे. दोघांच्या मृत्यू प्रकरणात निष्पाप लोकांना विनाकारण कायद्याच्या कचाट्यात अडकवू नका, अशी मागणी करत माजी आमदार आर.एम. वाणी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी शनिवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.याप्रसंगी वाणी यांच्यासह नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरखान, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील बोरनारे, माजी जिल्हा परिषद सदस्य अभय पाटील चिकटगावकर,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नबी पटेल तिडीकर यांच्या शिष्टमंडळाने उपविभागिय अधिकारी डॉ. संदीपान सानप, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार, सहायक पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांच्याशी चर्चा करुन निवेदन दिले.शनिवारी पानव, जरुळ, चांडगाव, भायगाव, रोटेगाव आदी भागातील शेकडो नागरिक वाणी यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकर पुतळ्याजवळ जमा झाले व त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून निवेदन दिले. याप्रसंगी बाबासाहेब जगताप, चंद्रकांत कटारे, प्रकाश मतसागर, साईनाथ मतसागर, नंदकिशोर जाधव, धीरजसिंह राजपूत, मंजाहरी गाढे, मोहन साळुंके, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, एराज शेख, दिपकसिंग राजपूत, अ‍ॅड. प्रताप निंबाळकर, अ‍ॅड. नानासाहेब जगताप, दिगंबर मतसागर, दिनकर कुहिले, सागर गायकवाड, अरविंद शेवाळे, अमोल बावचे आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.पोलिसांची कारवाई म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशीवैजापूर पोलिसांनी शुक्रवारपासून चांडगाव व नांदगाव शिवारातील नागरिकांची धरपकड सुरू केल्याचे तीव्र पडसाद शनिवारी उमटले. पोलिसांची ही कारवाई म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार असल्याची टीका सर्वपक्षीय नेत्यांनी केली. ग्रामीण भागात नागरिक दहशतीखाली आहेत.निष्पाप लोकांवर कारवाई होणार नाही, असे उपविभागीय पोलीस अधिकारी लांजेवार यांनी सांगितले.शनिवारी अटक केलेल्या आठ जणांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या घटनेत मयत झालेल्या दोघांच्या कुटुंबियांनी मृतदेह नेण्यासाठी चोवीस तास उलटूनही पोलिसांशी संपर्क साधला नाही किंवा तक्रार केली नाही. त्यामुळे याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Morchaमोर्चाPoliceपोलिस