शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

चोरांच्या मृत्यूप्रकरणी आठ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:46 IST

४०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल : पोलिसांच्या कोम्बिंग आॅपरेशनविरुद्ध वैजापुरात मोर्चा

वैजापूर : तालुक्यातील चांडगाव -पानव येथे शुक्रवारी जमावाने संशयित चोरांच्या टोळीतील आठ जणांना बेदम मारहाण केल्याने दोघांचा मृत्यू झाला होता, तर ६ चोर जखमी झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी कोम्बिंग आॅपरेशन करुन चांडगाव, जरुळ, पानव भागातील जवळपास चारशे जणांवर खून, जीवे मारण्याचा प्रयत्न व दंगलीचा गुन्हा दाखल केला व आठ जणांना अटक केली.चोरांच्या दहशतीमुळे आधीच हैराण झालेल्या नागरिकांमध्ये पोलिसांच्या या भूमिकेने भिती निर्माण झाली आहे. दोघांच्या मृत्यू प्रकरणात निष्पाप लोकांना विनाकारण कायद्याच्या कचाट्यात अडकवू नका, अशी मागणी करत माजी आमदार आर.एम. वाणी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी शनिवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.याप्रसंगी वाणी यांच्यासह नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरखान, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील बोरनारे, माजी जिल्हा परिषद सदस्य अभय पाटील चिकटगावकर,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नबी पटेल तिडीकर यांच्या शिष्टमंडळाने उपविभागिय अधिकारी डॉ. संदीपान सानप, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार, सहायक पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांच्याशी चर्चा करुन निवेदन दिले.शनिवारी पानव, जरुळ, चांडगाव, भायगाव, रोटेगाव आदी भागातील शेकडो नागरिक वाणी यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकर पुतळ्याजवळ जमा झाले व त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून निवेदन दिले. याप्रसंगी बाबासाहेब जगताप, चंद्रकांत कटारे, प्रकाश मतसागर, साईनाथ मतसागर, नंदकिशोर जाधव, धीरजसिंह राजपूत, मंजाहरी गाढे, मोहन साळुंके, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, एराज शेख, दिपकसिंग राजपूत, अ‍ॅड. प्रताप निंबाळकर, अ‍ॅड. नानासाहेब जगताप, दिगंबर मतसागर, दिनकर कुहिले, सागर गायकवाड, अरविंद शेवाळे, अमोल बावचे आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.पोलिसांची कारवाई म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशीवैजापूर पोलिसांनी शुक्रवारपासून चांडगाव व नांदगाव शिवारातील नागरिकांची धरपकड सुरू केल्याचे तीव्र पडसाद शनिवारी उमटले. पोलिसांची ही कारवाई म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार असल्याची टीका सर्वपक्षीय नेत्यांनी केली. ग्रामीण भागात नागरिक दहशतीखाली आहेत.निष्पाप लोकांवर कारवाई होणार नाही, असे उपविभागीय पोलीस अधिकारी लांजेवार यांनी सांगितले.शनिवारी अटक केलेल्या आठ जणांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या घटनेत मयत झालेल्या दोघांच्या कुटुंबियांनी मृतदेह नेण्यासाठी चोवीस तास उलटूनही पोलिसांशी संपर्क साधला नाही किंवा तक्रार केली नाही. त्यामुळे याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Morchaमोर्चाPoliceपोलिस