शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

चोरांच्या मृत्यूप्रकरणी आठ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:46 IST

४०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल : पोलिसांच्या कोम्बिंग आॅपरेशनविरुद्ध वैजापुरात मोर्चा

वैजापूर : तालुक्यातील चांडगाव -पानव येथे शुक्रवारी जमावाने संशयित चोरांच्या टोळीतील आठ जणांना बेदम मारहाण केल्याने दोघांचा मृत्यू झाला होता, तर ६ चोर जखमी झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी कोम्बिंग आॅपरेशन करुन चांडगाव, जरुळ, पानव भागातील जवळपास चारशे जणांवर खून, जीवे मारण्याचा प्रयत्न व दंगलीचा गुन्हा दाखल केला व आठ जणांना अटक केली.चोरांच्या दहशतीमुळे आधीच हैराण झालेल्या नागरिकांमध्ये पोलिसांच्या या भूमिकेने भिती निर्माण झाली आहे. दोघांच्या मृत्यू प्रकरणात निष्पाप लोकांना विनाकारण कायद्याच्या कचाट्यात अडकवू नका, अशी मागणी करत माजी आमदार आर.एम. वाणी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी शनिवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.याप्रसंगी वाणी यांच्यासह नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरखान, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील बोरनारे, माजी जिल्हा परिषद सदस्य अभय पाटील चिकटगावकर,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नबी पटेल तिडीकर यांच्या शिष्टमंडळाने उपविभागिय अधिकारी डॉ. संदीपान सानप, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार, सहायक पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांच्याशी चर्चा करुन निवेदन दिले.शनिवारी पानव, जरुळ, चांडगाव, भायगाव, रोटेगाव आदी भागातील शेकडो नागरिक वाणी यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकर पुतळ्याजवळ जमा झाले व त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून निवेदन दिले. याप्रसंगी बाबासाहेब जगताप, चंद्रकांत कटारे, प्रकाश मतसागर, साईनाथ मतसागर, नंदकिशोर जाधव, धीरजसिंह राजपूत, मंजाहरी गाढे, मोहन साळुंके, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, एराज शेख, दिपकसिंग राजपूत, अ‍ॅड. प्रताप निंबाळकर, अ‍ॅड. नानासाहेब जगताप, दिगंबर मतसागर, दिनकर कुहिले, सागर गायकवाड, अरविंद शेवाळे, अमोल बावचे आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.पोलिसांची कारवाई म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशीवैजापूर पोलिसांनी शुक्रवारपासून चांडगाव व नांदगाव शिवारातील नागरिकांची धरपकड सुरू केल्याचे तीव्र पडसाद शनिवारी उमटले. पोलिसांची ही कारवाई म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार असल्याची टीका सर्वपक्षीय नेत्यांनी केली. ग्रामीण भागात नागरिक दहशतीखाली आहेत.निष्पाप लोकांवर कारवाई होणार नाही, असे उपविभागीय पोलीस अधिकारी लांजेवार यांनी सांगितले.शनिवारी अटक केलेल्या आठ जणांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या घटनेत मयत झालेल्या दोघांच्या कुटुंबियांनी मृतदेह नेण्यासाठी चोवीस तास उलटूनही पोलिसांशी संपर्क साधला नाही किंवा तक्रार केली नाही. त्यामुळे याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Morchaमोर्चाPoliceपोलिस