शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

आठ महिने उलटले पण औरंगाबाद शहरातील कचरा कोंडी काही फुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 23:36 IST

शहरातील कचरा प्रश्न सुटावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास बाब म्हणून औरंगाबाद महापालिकेला आठ महिन्यांपूर्वी ९० कोटींचा घसघशीत निधी दिला. महापालिकेला आठ महिन्यांमध्ये एकही कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारता आला नाही. शहरात जमा होणारा कचरा जिथे जागा मिळेल तेथे नेऊन टाकण्यात येत आहे. अनेक वॉर्डांमध्ये तर महापालिकेने चक्ककचरा बँकाच तयार करून ठेवल्या आहेत. महापालिकेच्या या कारभाराला औरंगाबादकर प्रचंड कंटाळले आहेत.

ठळक मुद्देशासन निधी पडून : प्रशासनाकडून कागदी घोडे नाचविणे सुरू

औरंगाबाद : शहरातील कचरा प्रश्न सुटावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास बाब म्हणून औरंगाबाद महापालिकेला आठ महिन्यांपूर्वी ९० कोटींचा घसघशीत निधी दिला. महापालिकेला आठ महिन्यांमध्ये एकही कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारता आला नाही. शहरात जमा होणारा कचरा जिथे जागा मिळेल तेथे नेऊन टाकण्यात येत आहे. अनेक वॉर्डांमध्ये तर महापालिकेने चक्ककचरा बँकाच तयार करून ठेवल्या आहेत. महापालिकेच्या या कारभाराला औरंगाबादकर प्रचंड कंटाळले आहेत.१६ फेब्रुवारी २०१८ पासून शहरात कचराकोंडीला सुरुवात झाली. महापालिकेवर मागील ३० वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीची निर्विवाद सत्ता आहे. राज्यातही युतीचीच सत्ता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कचरा प्रश्न सोडविण्यासाठी शहरात अधिकारी व कर्मचाऱ्यांची फौज उभी केली. ९० कोटींचा निधीही दिला. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना खास बाब म्हणून औरंगाबादेत जाऊन प्रश्न सोडविण्याचा आदेश दिला. मनीषा म्हैसकर यांनी महापालिकेला कचरा प्रश्न सोडविण्यासाठी दिलेल्या पंचसूत्रीपैकी एकावरही काम करण्यात आले नाही. त्यामुळे कचºयाच्या प्रश्न जशास तसा आहे.आठ महिन्यांत मनपाने काय केले?५ कोटी रुपये खर्च करून शहरात जिथे तिथे ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी कंपोस्ट पीट तयार केले. या पिटात एक दिवसही ओला कचरा टाकला नाही. आता या कंपोस्ट पिटाचे ‘पिटात’ रूपांतर झाले आहे. त्यानंतर शासनाने नेमलेल्या कचरा संनियंत्रण समितीने हर्सूल, चिकलठाणा, पडेगाव, नक्षत्रवाडी येथे प्रक्रिया केंद्र उभारण्याचे निर्देश दिले. महापालिका येथे प्रक्रिया केंद्र उभारण्याऐवजी ओला व सुका कचरा नेऊन टाकत आहे. येथे आता कचºयाचे मोठमोठे डोंगर तयार झाले आहेत.निविदा प्रक्रियेचा खेळचिकलठाणा, पडेगाव येथे ३०० मेट्रिक टन क्षमतेची दोन प्रक्रिया केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला. वाळूज येथील मायोवेसल कंपनीला कामही देण्यात आले. कंपनीसाठी लागणारे शेडच महापालिकेने आजपर्यंत तयार केलेले नाहीत. नऊ वॉर्डांमध्ये १६ टन क्षमतेच्या मशीन लावून कचºयावर प्रक्रिया करण्याची घोषणा केली. आजपर्यंत हे क्षुल्लक कामही मनपाला करता आले नाही.स्थायीत प्रस्ताव पडूनशहरातील संपूर्ण कचरा उचलण्यासाठी बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीची निवड केली आहे. ७ वर्षांसाठी हे कंत्राट देण्यात आले आहे. २११ कोटी रुपयांचा हा प्रस्ताव २२ दिवसांपूर्वी मनपा प्रशासनाने स्थायी समितीला सादर केला आहे. स्थायी समितीने आजपर्यंत या प्रस्तावाला मंजुरी दिलेली नाही.मुख्यमंत्री घेणार आज आढावामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी औरंगाबादेत असून, ते सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. सर्वप्रथम महापालिकेच्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात येणार आहे. मागील वर्षी राज्य शासनाने शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी १०० कोटींचा निधी दिला होता. या कामांचे काय झाले अशी विचारणाही मुख्यमंत्र्यांकडून होणार हे निश्चित. कचरा प्रश्नातही मुख्यमंत्री महापालिकेच्या कारभाराचा आढावा घेणार आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्न