शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिने उलटले पण औरंगाबाद शहरातील कचरा कोंडी काही फुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 23:36 IST

शहरातील कचरा प्रश्न सुटावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास बाब म्हणून औरंगाबाद महापालिकेला आठ महिन्यांपूर्वी ९० कोटींचा घसघशीत निधी दिला. महापालिकेला आठ महिन्यांमध्ये एकही कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारता आला नाही. शहरात जमा होणारा कचरा जिथे जागा मिळेल तेथे नेऊन टाकण्यात येत आहे. अनेक वॉर्डांमध्ये तर महापालिकेने चक्ककचरा बँकाच तयार करून ठेवल्या आहेत. महापालिकेच्या या कारभाराला औरंगाबादकर प्रचंड कंटाळले आहेत.

ठळक मुद्देशासन निधी पडून : प्रशासनाकडून कागदी घोडे नाचविणे सुरू

औरंगाबाद : शहरातील कचरा प्रश्न सुटावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास बाब म्हणून औरंगाबाद महापालिकेला आठ महिन्यांपूर्वी ९० कोटींचा घसघशीत निधी दिला. महापालिकेला आठ महिन्यांमध्ये एकही कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारता आला नाही. शहरात जमा होणारा कचरा जिथे जागा मिळेल तेथे नेऊन टाकण्यात येत आहे. अनेक वॉर्डांमध्ये तर महापालिकेने चक्ककचरा बँकाच तयार करून ठेवल्या आहेत. महापालिकेच्या या कारभाराला औरंगाबादकर प्रचंड कंटाळले आहेत.१६ फेब्रुवारी २०१८ पासून शहरात कचराकोंडीला सुरुवात झाली. महापालिकेवर मागील ३० वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीची निर्विवाद सत्ता आहे. राज्यातही युतीचीच सत्ता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कचरा प्रश्न सोडविण्यासाठी शहरात अधिकारी व कर्मचाऱ्यांची फौज उभी केली. ९० कोटींचा निधीही दिला. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना खास बाब म्हणून औरंगाबादेत जाऊन प्रश्न सोडविण्याचा आदेश दिला. मनीषा म्हैसकर यांनी महापालिकेला कचरा प्रश्न सोडविण्यासाठी दिलेल्या पंचसूत्रीपैकी एकावरही काम करण्यात आले नाही. त्यामुळे कचºयाच्या प्रश्न जशास तसा आहे.आठ महिन्यांत मनपाने काय केले?५ कोटी रुपये खर्च करून शहरात जिथे तिथे ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी कंपोस्ट पीट तयार केले. या पिटात एक दिवसही ओला कचरा टाकला नाही. आता या कंपोस्ट पिटाचे ‘पिटात’ रूपांतर झाले आहे. त्यानंतर शासनाने नेमलेल्या कचरा संनियंत्रण समितीने हर्सूल, चिकलठाणा, पडेगाव, नक्षत्रवाडी येथे प्रक्रिया केंद्र उभारण्याचे निर्देश दिले. महापालिका येथे प्रक्रिया केंद्र उभारण्याऐवजी ओला व सुका कचरा नेऊन टाकत आहे. येथे आता कचºयाचे मोठमोठे डोंगर तयार झाले आहेत.निविदा प्रक्रियेचा खेळचिकलठाणा, पडेगाव येथे ३०० मेट्रिक टन क्षमतेची दोन प्रक्रिया केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला. वाळूज येथील मायोवेसल कंपनीला कामही देण्यात आले. कंपनीसाठी लागणारे शेडच महापालिकेने आजपर्यंत तयार केलेले नाहीत. नऊ वॉर्डांमध्ये १६ टन क्षमतेच्या मशीन लावून कचºयावर प्रक्रिया करण्याची घोषणा केली. आजपर्यंत हे क्षुल्लक कामही मनपाला करता आले नाही.स्थायीत प्रस्ताव पडूनशहरातील संपूर्ण कचरा उचलण्यासाठी बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीची निवड केली आहे. ७ वर्षांसाठी हे कंत्राट देण्यात आले आहे. २११ कोटी रुपयांचा हा प्रस्ताव २२ दिवसांपूर्वी मनपा प्रशासनाने स्थायी समितीला सादर केला आहे. स्थायी समितीने आजपर्यंत या प्रस्तावाला मंजुरी दिलेली नाही.मुख्यमंत्री घेणार आज आढावामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी औरंगाबादेत असून, ते सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. सर्वप्रथम महापालिकेच्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात येणार आहे. मागील वर्षी राज्य शासनाने शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी १०० कोटींचा निधी दिला होता. या कामांचे काय झाले अशी विचारणाही मुख्यमंत्र्यांकडून होणार हे निश्चित. कचरा प्रश्नातही मुख्यमंत्री महापालिकेच्या कारभाराचा आढावा घेणार आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्न