शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
3
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
5
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
6
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
7
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
8
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
9
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
10
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
11
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
12
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
13
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
14
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
15
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
16
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
17
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
18
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
19
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
20
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना

उपलब्ध आठ लाख लिटर; गरज ४ लाखांची; तरीही कायम टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 22:37 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अनेक विहिरी, कूपनलिका आणि महापालिकेच्या माध्यमातून दररोज तब्बल ८ लाख लिटर पाणी उपलब्ध होते. विद्यापीठ परिसरातील विभागांमध्ये जवळपास ५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. मुले आणि मुलींच्या वसतिगृहांमध्ये १८०० विद्यार्थी वास्तव्याला आहेत. या सर्वांना दररोज ४ लाख लिटरपेक्षा कमी पाणी लागते.

ठळक मुद्देविद्यापीठातील पाणीबाणी : अतिरिक्त विद्यार्थी, पाण्याची चोरी अन् अपव्यय रोखण्याची गरज

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अनेक विहिरी, कूपनलिका आणि महापालिकेच्या माध्यमातून दररोज तब्बल ८ लाख लिटर पाणी उपलब्ध होते. विद्यापीठ परिसरातील विभागांमध्ये जवळपास ५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. मुले आणि मुलींच्या वसतिगृहांमध्ये १८०० विद्यार्थी वास्तव्याला आहेत. या सर्वांना दररोज ४ लाख लिटरपेक्षा कमी पाणी लागते. ८ लाख लिटर पाणी उपलब्ध असताना गरजेचे ४ लाख लिटर वजा केले, तर उरलेले ४ लाख लिटर पाणी कुठे मुरते, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.विद्यापीठातील विविध विभाग, वसतिगृहे आणि प्रशासकीय इमारतींमध्ये पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतागृहांमध्ये पाणीटंचाईचा प्रकार वारंवार घडतो आहे. विद्यापीठातील पाण्याची उपलब्धता मोठी आहे. हे पाणी वसतिगृहे, विभागांच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये दररोज भरले जाते; मात्र वापर आणि पाण्याच्या चोरीवर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आली. विद्यापीठातील विभागांमध्ये ५ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील १८०० विद्यार्थी (कागदोपत्री) वसतिगृहात राहतात. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १३५ लिटर पाणी प्रतिदिन दिले पाहिजे, असा नियम आहे. यानुसार १८०० विद्यार्थ्यांना २ लाख ४३ हजार लिटर पाण्याची आवश्यकता आहे, तर विभागांमध्ये शिक्षण घेणाºया ५ हजार विद्यार्थ्यांना पिण्याचे आणि विभागातील स्वच्छतागृहांसाठी दररोज १ लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. अशी ४ लाख लिटर पाण्याची विद्यापीठात गरज असल्याची माहिती स्थावर विभागाच्या अधिकाºयांनी दिली; मात्र विद्यापीठातील १८ विहिरी, १४ कुपनलिका आणि महापालिकेद्वारे दररोज ८ लाख लिटर पाणी उपलब्ध होते. ही आकडेवारी वसतिगृह, विभाग आणि प्रशासकीय इमारतींमधील पाणी साठवण टाक्यांमध्ये टाकण्यात येणाºया दररोजच्या नोंदीवरून काढलेली आहे.नासाडीसह चोरी थांबविण्याची आवश्यकतावसतिगृहांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्यात येते; मात्र या वसतिगृहांमध्ये उपलब्ध पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी करण्यात येते. मनसोक्त आंघोळ करणे, स्वच्छतागृहांसाठी आवश्यकतेपेक्षा अधिक पाण्याचा वापर केल्यामुळेही पाण्याच्या टाक्या तात्काळ रिकाम्या होतात. याशिवाय विविध वसतिगृहांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी होते. विद्यापीठाशेजारील परिसरात राहणारे विद्यार्थी, रहिवासी पिण्याचे पाणी जारमध्ये भरून घेऊन जात असल्याचेही निदर्शनास आले. वसतिगृहात न राहणारे विद्यार्थीही सकाळी वसतिगृहातील मित्रांकडे येऊन आंघोळी करून जातात, असेही विद्यार्थ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, तसेच वसतिगृहात कागदोपत्री असलेल्या आकडेवारीपेक्षा तिप्पट विद्यार्थी वास्तव्याला असल्याचेही पाहणीत स्पष्ट झाले.नियंत्रण कोण ठेवणारविद्यापीठातील वसतिगृहे, विभागांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी स्थावर मालमत्ता विभागाची आहे. या विभागाचे अधिकारी, कर्मचारी वसतिगृहे, विभागांमधील पाण्याच्या टाक्या भरून देतात; मात्र त्या टाक्या तात्काळ रिकाम्या होतात. यामुळे प्रत्यक्ष वापर करणाºया पाण्याची काटकसर, चोरीला जाणारे पाणी थांबविणे आणि अतिरिक्त वसतिगृहात येणारे आणि राहणाºया विद्यार्थ्यांना कोण अडवणार? असा प्रश्न उपस्थित झाला असल्याचेही स्थावर विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.पाण्याची उपलब्धता१८ विहिरी आणि १४ कूपनलिका- ६ लाख लिटर पेक्षा अधिकमहापालिकेचा जलकुंभ - २ लाख लिटर (एक दिवसाआड)पाण्याची गरज - प्रतिविद्यार्थी १३५ लिटर (वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी)उपलब्धता आठ लाख लिटर; आवश्यकता ४ लाखांची; तरीही कायम टंचाई (जोड) कु ल शब्द(52)उपलब्धता आठ लाख लिटर; आवश्यकता ४ लाखांची; तरीही कायम टंचाई (जोड)पाण्याची सतत टंचाई होत असल्यामुळे बैठक घेऊन आढावा घेतला. विद्यापीठात पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे. विविध विहिरी, कूपनलिका आणि महापालिकेकडून मिळणारे पाणी पुरेसे असल्याचे दिसून आले. पाण्याच्या अतिवापरासह समन्वयाचा अभाव दिसून आला. विद्यापीठाने एक स्वतंत्र अतिरिक्त टँकर खरेदी केले आहे. जेथे पाणी कमी पडेल, तेथे पाणी दिले जाईल.- डॉ. अशोक तेजनकर, प्रकुलगुरू

 

टॅग्स :universityविद्यापीठWaterपाणीAurangabadऔरंगाबाद