शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
3
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
4
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
5
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
6
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
7
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."
8
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
9
Video - "मी तुमच्या मुलीवर उपचार करणार नाही..."; डॉक्टरची रुग्णाच्या वडिलांना मारहाण
10
Vastu Shastra: वास्तु शास्त्रानुसार घराच्या 'या' भागात ठेवा मोरपीस, आयुष्यात भरतील नवे रंग!
11
मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का?
12
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
13
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
14
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्ठा राडा !! मोहम्मद रिझवान पाक क्रिकेट बोर्डाला नडला... काय घडलं?
15
किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; सेन्सेक्स ८५,००० अंकांच्या आणि निफ्टी २६,००० अंकांच्या जवळ
16
PPF ला साधं समजू नका! पती-पत्नी मिळून बनवू शकता ₹१.३३ कोटींचा फंड, तोही टॅक्स फ्री
17
'तो' प्रवास ठरला शेवटचा! कुटुंबीयांसमोरच वडील आणि मुलीचा होरपळून मृत्यू; १० जण जखमी
18
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
19
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
20
Ramkesh Murder Case: बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?

उपलब्ध आठ लाख लिटर; गरज ४ लाखांची; तरीही कायम टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 22:37 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अनेक विहिरी, कूपनलिका आणि महापालिकेच्या माध्यमातून दररोज तब्बल ८ लाख लिटर पाणी उपलब्ध होते. विद्यापीठ परिसरातील विभागांमध्ये जवळपास ५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. मुले आणि मुलींच्या वसतिगृहांमध्ये १८०० विद्यार्थी वास्तव्याला आहेत. या सर्वांना दररोज ४ लाख लिटरपेक्षा कमी पाणी लागते.

ठळक मुद्देविद्यापीठातील पाणीबाणी : अतिरिक्त विद्यार्थी, पाण्याची चोरी अन् अपव्यय रोखण्याची गरज

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अनेक विहिरी, कूपनलिका आणि महापालिकेच्या माध्यमातून दररोज तब्बल ८ लाख लिटर पाणी उपलब्ध होते. विद्यापीठ परिसरातील विभागांमध्ये जवळपास ५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. मुले आणि मुलींच्या वसतिगृहांमध्ये १८०० विद्यार्थी वास्तव्याला आहेत. या सर्वांना दररोज ४ लाख लिटरपेक्षा कमी पाणी लागते. ८ लाख लिटर पाणी उपलब्ध असताना गरजेचे ४ लाख लिटर वजा केले, तर उरलेले ४ लाख लिटर पाणी कुठे मुरते, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.विद्यापीठातील विविध विभाग, वसतिगृहे आणि प्रशासकीय इमारतींमध्ये पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतागृहांमध्ये पाणीटंचाईचा प्रकार वारंवार घडतो आहे. विद्यापीठातील पाण्याची उपलब्धता मोठी आहे. हे पाणी वसतिगृहे, विभागांच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये दररोज भरले जाते; मात्र वापर आणि पाण्याच्या चोरीवर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आली. विद्यापीठातील विभागांमध्ये ५ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील १८०० विद्यार्थी (कागदोपत्री) वसतिगृहात राहतात. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १३५ लिटर पाणी प्रतिदिन दिले पाहिजे, असा नियम आहे. यानुसार १८०० विद्यार्थ्यांना २ लाख ४३ हजार लिटर पाण्याची आवश्यकता आहे, तर विभागांमध्ये शिक्षण घेणाºया ५ हजार विद्यार्थ्यांना पिण्याचे आणि विभागातील स्वच्छतागृहांसाठी दररोज १ लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. अशी ४ लाख लिटर पाण्याची विद्यापीठात गरज असल्याची माहिती स्थावर विभागाच्या अधिकाºयांनी दिली; मात्र विद्यापीठातील १८ विहिरी, १४ कुपनलिका आणि महापालिकेद्वारे दररोज ८ लाख लिटर पाणी उपलब्ध होते. ही आकडेवारी वसतिगृह, विभाग आणि प्रशासकीय इमारतींमधील पाणी साठवण टाक्यांमध्ये टाकण्यात येणाºया दररोजच्या नोंदीवरून काढलेली आहे.नासाडीसह चोरी थांबविण्याची आवश्यकतावसतिगृहांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्यात येते; मात्र या वसतिगृहांमध्ये उपलब्ध पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी करण्यात येते. मनसोक्त आंघोळ करणे, स्वच्छतागृहांसाठी आवश्यकतेपेक्षा अधिक पाण्याचा वापर केल्यामुळेही पाण्याच्या टाक्या तात्काळ रिकाम्या होतात. याशिवाय विविध वसतिगृहांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी होते. विद्यापीठाशेजारील परिसरात राहणारे विद्यार्थी, रहिवासी पिण्याचे पाणी जारमध्ये भरून घेऊन जात असल्याचेही निदर्शनास आले. वसतिगृहात न राहणारे विद्यार्थीही सकाळी वसतिगृहातील मित्रांकडे येऊन आंघोळी करून जातात, असेही विद्यार्थ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, तसेच वसतिगृहात कागदोपत्री असलेल्या आकडेवारीपेक्षा तिप्पट विद्यार्थी वास्तव्याला असल्याचेही पाहणीत स्पष्ट झाले.नियंत्रण कोण ठेवणारविद्यापीठातील वसतिगृहे, विभागांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी स्थावर मालमत्ता विभागाची आहे. या विभागाचे अधिकारी, कर्मचारी वसतिगृहे, विभागांमधील पाण्याच्या टाक्या भरून देतात; मात्र त्या टाक्या तात्काळ रिकाम्या होतात. यामुळे प्रत्यक्ष वापर करणाºया पाण्याची काटकसर, चोरीला जाणारे पाणी थांबविणे आणि अतिरिक्त वसतिगृहात येणारे आणि राहणाºया विद्यार्थ्यांना कोण अडवणार? असा प्रश्न उपस्थित झाला असल्याचेही स्थावर विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.पाण्याची उपलब्धता१८ विहिरी आणि १४ कूपनलिका- ६ लाख लिटर पेक्षा अधिकमहापालिकेचा जलकुंभ - २ लाख लिटर (एक दिवसाआड)पाण्याची गरज - प्रतिविद्यार्थी १३५ लिटर (वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी)उपलब्धता आठ लाख लिटर; आवश्यकता ४ लाखांची; तरीही कायम टंचाई (जोड) कु ल शब्द(52)उपलब्धता आठ लाख लिटर; आवश्यकता ४ लाखांची; तरीही कायम टंचाई (जोड)पाण्याची सतत टंचाई होत असल्यामुळे बैठक घेऊन आढावा घेतला. विद्यापीठात पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे. विविध विहिरी, कूपनलिका आणि महापालिकेकडून मिळणारे पाणी पुरेसे असल्याचे दिसून आले. पाण्याच्या अतिवापरासह समन्वयाचा अभाव दिसून आला. विद्यापीठाने एक स्वतंत्र अतिरिक्त टँकर खरेदी केले आहे. जेथे पाणी कमी पडेल, तेथे पाणी दिले जाईल.- डॉ. अशोक तेजनकर, प्रकुलगुरू

 

टॅग्स :universityविद्यापीठWaterपाणीAurangabadऔरंगाबाद