शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उपलब्ध आठ लाख लिटर; गरज ४ लाखांची; तरीही कायम टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 22:37 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अनेक विहिरी, कूपनलिका आणि महापालिकेच्या माध्यमातून दररोज तब्बल ८ लाख लिटर पाणी उपलब्ध होते. विद्यापीठ परिसरातील विभागांमध्ये जवळपास ५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. मुले आणि मुलींच्या वसतिगृहांमध्ये १८०० विद्यार्थी वास्तव्याला आहेत. या सर्वांना दररोज ४ लाख लिटरपेक्षा कमी पाणी लागते.

ठळक मुद्देविद्यापीठातील पाणीबाणी : अतिरिक्त विद्यार्थी, पाण्याची चोरी अन् अपव्यय रोखण्याची गरज

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अनेक विहिरी, कूपनलिका आणि महापालिकेच्या माध्यमातून दररोज तब्बल ८ लाख लिटर पाणी उपलब्ध होते. विद्यापीठ परिसरातील विभागांमध्ये जवळपास ५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. मुले आणि मुलींच्या वसतिगृहांमध्ये १८०० विद्यार्थी वास्तव्याला आहेत. या सर्वांना दररोज ४ लाख लिटरपेक्षा कमी पाणी लागते. ८ लाख लिटर पाणी उपलब्ध असताना गरजेचे ४ लाख लिटर वजा केले, तर उरलेले ४ लाख लिटर पाणी कुठे मुरते, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.विद्यापीठातील विविध विभाग, वसतिगृहे आणि प्रशासकीय इमारतींमध्ये पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतागृहांमध्ये पाणीटंचाईचा प्रकार वारंवार घडतो आहे. विद्यापीठातील पाण्याची उपलब्धता मोठी आहे. हे पाणी वसतिगृहे, विभागांच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये दररोज भरले जाते; मात्र वापर आणि पाण्याच्या चोरीवर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आली. विद्यापीठातील विभागांमध्ये ५ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील १८०० विद्यार्थी (कागदोपत्री) वसतिगृहात राहतात. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १३५ लिटर पाणी प्रतिदिन दिले पाहिजे, असा नियम आहे. यानुसार १८०० विद्यार्थ्यांना २ लाख ४३ हजार लिटर पाण्याची आवश्यकता आहे, तर विभागांमध्ये शिक्षण घेणाºया ५ हजार विद्यार्थ्यांना पिण्याचे आणि विभागातील स्वच्छतागृहांसाठी दररोज १ लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. अशी ४ लाख लिटर पाण्याची विद्यापीठात गरज असल्याची माहिती स्थावर विभागाच्या अधिकाºयांनी दिली; मात्र विद्यापीठातील १८ विहिरी, १४ कुपनलिका आणि महापालिकेद्वारे दररोज ८ लाख लिटर पाणी उपलब्ध होते. ही आकडेवारी वसतिगृह, विभाग आणि प्रशासकीय इमारतींमधील पाणी साठवण टाक्यांमध्ये टाकण्यात येणाºया दररोजच्या नोंदीवरून काढलेली आहे.नासाडीसह चोरी थांबविण्याची आवश्यकतावसतिगृहांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्यात येते; मात्र या वसतिगृहांमध्ये उपलब्ध पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी करण्यात येते. मनसोक्त आंघोळ करणे, स्वच्छतागृहांसाठी आवश्यकतेपेक्षा अधिक पाण्याचा वापर केल्यामुळेही पाण्याच्या टाक्या तात्काळ रिकाम्या होतात. याशिवाय विविध वसतिगृहांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी होते. विद्यापीठाशेजारील परिसरात राहणारे विद्यार्थी, रहिवासी पिण्याचे पाणी जारमध्ये भरून घेऊन जात असल्याचेही निदर्शनास आले. वसतिगृहात न राहणारे विद्यार्थीही सकाळी वसतिगृहातील मित्रांकडे येऊन आंघोळी करून जातात, असेही विद्यार्थ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, तसेच वसतिगृहात कागदोपत्री असलेल्या आकडेवारीपेक्षा तिप्पट विद्यार्थी वास्तव्याला असल्याचेही पाहणीत स्पष्ट झाले.नियंत्रण कोण ठेवणारविद्यापीठातील वसतिगृहे, विभागांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी स्थावर मालमत्ता विभागाची आहे. या विभागाचे अधिकारी, कर्मचारी वसतिगृहे, विभागांमधील पाण्याच्या टाक्या भरून देतात; मात्र त्या टाक्या तात्काळ रिकाम्या होतात. यामुळे प्रत्यक्ष वापर करणाºया पाण्याची काटकसर, चोरीला जाणारे पाणी थांबविणे आणि अतिरिक्त वसतिगृहात येणारे आणि राहणाºया विद्यार्थ्यांना कोण अडवणार? असा प्रश्न उपस्थित झाला असल्याचेही स्थावर विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.पाण्याची उपलब्धता१८ विहिरी आणि १४ कूपनलिका- ६ लाख लिटर पेक्षा अधिकमहापालिकेचा जलकुंभ - २ लाख लिटर (एक दिवसाआड)पाण्याची गरज - प्रतिविद्यार्थी १३५ लिटर (वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी)उपलब्धता आठ लाख लिटर; आवश्यकता ४ लाखांची; तरीही कायम टंचाई (जोड) कु ल शब्द(52)उपलब्धता आठ लाख लिटर; आवश्यकता ४ लाखांची; तरीही कायम टंचाई (जोड)पाण्याची सतत टंचाई होत असल्यामुळे बैठक घेऊन आढावा घेतला. विद्यापीठात पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे. विविध विहिरी, कूपनलिका आणि महापालिकेकडून मिळणारे पाणी पुरेसे असल्याचे दिसून आले. पाण्याच्या अतिवापरासह समन्वयाचा अभाव दिसून आला. विद्यापीठाने एक स्वतंत्र अतिरिक्त टँकर खरेदी केले आहे. जेथे पाणी कमी पडेल, तेथे पाणी दिले जाईल.- डॉ. अशोक तेजनकर, प्रकुलगुरू

 

टॅग्स :universityविद्यापीठWaterपाणीAurangabadऔरंगाबाद