शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

ग्रामपंचायतीच्या मैदानात माघार घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 15:16 IST

Efforts are being made to withdraw from the Gram Panchayat जिल्ह्यात या निवडणुकीसाठी १६ हजार ९४२ उमेदवारांनी १६ हजार ९५७ अर्ज दाखल केले आहेत.

ठळक मुद्देग्रामीण भागात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पॅनलच्या आडून राजकीय पक्ष पॅनल बिनविरोध यावे, यासाठी जोरदार प्रयत्न

औरंगाबाद : जिल्ह्यात ६१७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक मैदानातून उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी अनेकांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेनंतर चित्र स्पष्ट होईल, तसेच किती ग्रामपंचायती बिनविरोध होतील, हेदेखील स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यात या निवडणुकीसाठी १६ हजार ९४२ उमेदवारांनी १६ हजार ९५७ अर्ज दाखल केले आहेत. ग्रामीण भागात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पॅनलच्या आडून राजकीय पक्ष पॅनल बिनविरोध यावे, यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत.३१ डिसेंबर २०२० रोजी उमेदवारी अर्जांच्या छाननीअंती ३७१ अर्ज बाद झाले. ४ जानेवारीला दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. याच दिवशी उमेदवरांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायतींमधील २,०९० प्रभागांसाठी ५,६८३ सदस्य संख्या राहणार आहे. या निवडणुकीमध्ये १२ लाख ४६ हजार ५३६ मतदार ग्रामपंचायत सदस्य निवडणार आहेत. १५ जानेवारी रोजी निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार आहे. १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

राजकीय पक्षांनीही लावली ताकदराज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे तिन्ही पक्ष ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. भाजपचेही सर्वाधिक ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये स्पर्धा लागल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायत