शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

ग्रामपंचायतीच्या मैदानात माघार घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 15:16 IST

Efforts are being made to withdraw from the Gram Panchayat जिल्ह्यात या निवडणुकीसाठी १६ हजार ९४२ उमेदवारांनी १६ हजार ९५७ अर्ज दाखल केले आहेत.

ठळक मुद्देग्रामीण भागात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पॅनलच्या आडून राजकीय पक्ष पॅनल बिनविरोध यावे, यासाठी जोरदार प्रयत्न

औरंगाबाद : जिल्ह्यात ६१७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक मैदानातून उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी अनेकांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेनंतर चित्र स्पष्ट होईल, तसेच किती ग्रामपंचायती बिनविरोध होतील, हेदेखील स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यात या निवडणुकीसाठी १६ हजार ९४२ उमेदवारांनी १६ हजार ९५७ अर्ज दाखल केले आहेत. ग्रामीण भागात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पॅनलच्या आडून राजकीय पक्ष पॅनल बिनविरोध यावे, यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत.३१ डिसेंबर २०२० रोजी उमेदवारी अर्जांच्या छाननीअंती ३७१ अर्ज बाद झाले. ४ जानेवारीला दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. याच दिवशी उमेदवरांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायतींमधील २,०९० प्रभागांसाठी ५,६८३ सदस्य संख्या राहणार आहे. या निवडणुकीमध्ये १२ लाख ४६ हजार ५३६ मतदार ग्रामपंचायत सदस्य निवडणार आहेत. १५ जानेवारी रोजी निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार आहे. १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

राजकीय पक्षांनीही लावली ताकदराज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे तिन्ही पक्ष ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. भाजपचेही सर्वाधिक ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये स्पर्धा लागल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायत