शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

पावसाळ्यात आवर्जून खा आरोग्यदायी रानभाज्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:02 IST

औरंगाबाद : पावसाळ्यात सगळीकडे रानभाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. प्रत्येक प्रांतातल्या रानभाजीची वेगळीच खासियत असते आणि त्यात अनेक पौष्टिक ...

औरंगाबाद : पावसाळ्यात सगळीकडे रानभाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. प्रत्येक प्रांतातल्या रानभाजीची वेगळीच खासियत असते आणि त्यात अनेक पौष्टिक गुणधर्मही दडलेले असतात. त्यामुळे पावसाळ्यात रानभाज्यांच्या रूपात मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारा हा आरोग्याचा ठेवा चुकवू नये, असाच आहे.

हल्ली कोरोनामुळे तर प्रत्येक जण आराेग्याबाबत जागरूक झालेले आहेत. जेवढे काही नैसर्गिक असेल, ते खाण्याकडे प्रत्येकाचा कल आहे. त्यामुळे रानभाज्यांविषयीची जागृतीही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. त्या-त्या प्रांतातल्या खनिजांनी समृद्ध असणे, हे रानभाज्यांचे वैशिष्ट्य आहे. रानभाज्यांमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस अशी शरीराला ऊर्जा देणारी खनिजे मोठ्या प्रमाणावर असतात.

रानभाज्यांच्या सेवनाने शरीर लवचीक बनते तसेच त्यांच्यातील औषधी गुणांमुळे अनेक जुनाट आजारही बरे होतात. रानभाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण खूप असते. त्यामुळे रानभाज्या खाल्ल्याने शरीरातील चरबी वाढत नाही. रानभाज्या नियमितपणे खाणाऱ्या व्यक्ती काटक असतात. हाडांचे पोषण आणि हाडांना मजबुती देण्याचे काम रानभाज्या करतात. करटोली, अंबाडी, माठ, शेवगा, हादगा, कुर्डू, अळू, घोळ, भोकर, मोखा अशा अनेक रानभाज्या सध्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.

चौकट :

रानभाज्या कशा खाव्यात ?

रानभाज्यांच्या मूळ चवीला धक्का न लागू देता आणि त्यांच्यातील पोषण मूल्ये कमी न करता रानभाज्या खाल्ल्या पाहिजेत. रानभाज्या बनविताना पुदिना, कैरी, लिंबू टाकून त्यांची पोषण मूल्ये अधिक वाढविता येतात. या भाज्यांसोबत पोळ्यांऐवजी भाकरी खाणे अधिक आरोग्यदायी असते. भाकरी तांदळाची किंवा नाचणीची असेल तर उत्तम. उडीद आणि ज्वारी यांचे पीठ एकत्रित करून बनविलेली कळण्याची भाकरी रानभाज्यांसोबत खाणे केव्हाही अधिक चांगले.

- डॉ. अलका कर्णिक, आहारतज्ज्ञ.

चौकट :

रानभाज्या करताना ही काळजी घ्या

एरवी आपण ज्या भाज्या खातो, त्या वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. परंतु रानभाजी बनविण्याची योग्य पद्धत त्या-त्या प्रांतातल्या लोकांकडून जाणून घेतली पाहिजे. याचे सगळ्यात मुख्य कारण म्हणजे कोणत्या भाज्यांमध्ये काय असते आणि त्याचा आपल्या तब्येतीवर कोणता परिणाम होईल, हे आपल्याला माहीत नसते. काही रानभाज्यांमध्ये काही विषारी घटकही असतात. जेव्हा आपण ती भाजी व्यवस्थित शिजवून, वाफवून घेतो किंवा त्यामध्ये एखादा नवा घटक टाकतो, तेव्हा तिच्यातले विषारी घटक कमी होतात आणि ती भाजी खाण्यायोग्य बनते. तसेच ती खाणाऱ्याला कोणत्याही प्रकारे बाधत नाही. त्यामुळे रानभाजी बनविताना कोणतेही प्रयोग करणे टाळावे.

फोटो ओळ :

पावसाळ्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या रानभाज्या.