शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

वसुंधरेची चाळणी !

By admin | Updated: April 3, 2015 00:44 IST

बीड : पिण्यापुरतेच पाणी लागावे असे म्हणत चक्क हजार फुटापर्यंत बोअरवेल घेतले जात आहेत. पूर्वी केवळ ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बोअरवेल घेतले जात होते

बीड : पिण्यापुरतेच पाणी लागावे असे म्हणत चक्क हजार फुटापर्यंत बोअरवेल घेतले जात आहेत. पूर्वी केवळ ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बोअरवेल घेतले जात होते. आता शहरी भागातही मोठ्या प्रमाणात बोअरवेल घेतले जात आहेत. जमीनीची होत असलेली चाळणी भविष्यासाठी घातक असल्याचे तज्ञांनी सांगितले.पिण्यापुरतेच पाणी लागावे, अशी अपेक्षा ठेवत हजार फुटापर्यंत बोअर घेतले जात आहेत. परराज्यातून आलेल्या बोअरच्या गाड्या रात्रनदिवस सुरू असल्याचे चित्र गुरूवारी पहावयास मिळाले. मागील तीन वर्षापासून अल्प पाऊस पडत असल्याने पाणी पातळी कमालीची खालावली आहे. सिंचनाच्या कुठल्याच सुविधा प्रभावीपणे राबविलेल्या नसल्याने पाणी पातळीत वाढ होण्याचे कारण नाही. अशा स्थितीत बोअर घेण्याचा सपाटा सुरू आहे. शिरूरमध्ये बोअर घेण्याची स्पर्धाचशिरूर कासार तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे. निदान जनावरांना पिण्यापुरते तरी पाणी बोअरला लागेल या आशेने जिल्ह्यात जणू बोअर घेण्याची स्पर्धाच लागली असून तालुक्यातील घाटशिळ पारगाव या गावातील बोअरची संख्या एक हजारच्या जवळपास पोहचली असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.परळीतील पाणी पातळीचारशे फूट खालावलीमागील दोन वर्षात परळी तालुक्यात दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. आज स्थितीत शहरातील गंगासागर नगर भागात ४०० फुट बोअर घेवूनही पाणी लागत नाही तर काही भागात दीडशे फुटावर देखील पाणी लागते. असे वारकरी परिषदेचे तालुकाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते गोपाळराव आंधळे यांनी सांगितले.गेवराईत खारे पाणीगोदाकाठावरील गाव म्हणून गेवराईकडे पाहिले जाते. मात्र मागील तीन वर्षापासून पावसाने दडी मारल्याने येथील नदी कोरडी ठाक पडलेली आहे. परिणामी पाचशे फूट बोअर घेवूनही हाती पाणी लागत नाही. काही ठिकाणी पाणी लागले तर ते गोड पाणी लागेल याचा नेम नाही. वाड्या, तांड्यांवर दररोज बोअरची गाडी येते. जर दहा बोअर घेतले तर त्यातील सात बोअरला खारे व तीनला गोड (पिण्यास योग्य) पाणी लागते असे येथील शेतकरी ज्ञानोबा पिसे यांनी सांगितले.दिवसाकाठी वीस बोअरएकट्या धारूर तालुक्यात दिवसाकाठी वीसच्या जवळपास बोअर घेण्याचे प्रमाण आहे. तालुक्यात एकूण १८ च्या जवळपास बोअरच्या गाड्या आहेत. या सर्व गाड्या परराज्यातून आलेल्या आहेत. ७०० फुटापर्यंत तालुक्यात पाणी लागत नाही तरी देखील शेतकरी मोठ्या प्रमाणात बोअर घेत असल्याचे चित्र पहावयास मिळते.पानाड्यांचे ‘बिझी शेड्युल’सर्व जलस्त्रोत तळाला गेले आहेत. तरी शेवटची आशा म्हणून पानाड्याच्या भरवशावर तो सांगेल त्या ठिकाणी शेतकरी बोअरवेल घेत आहेत. अनेक पानाड्यांच्या पुढील एक महिन्याच्या तारखा बुक असल्याचे पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे, एखाद्या गावात पानाडी आला की, अर्धे गाव त्या पानाड्याकडून आपल्या शेतातील पाण्याची चाचपणी करते. तर अनेक शेतकरी पाणी बघताच गाडी बोलावून बोअर घेतात. यामुळे मात्र शेतकऱ्यांच्या बोअरला पाणी लागो या ना लागो. पानाड्यांची मात्र चांदी होत आहे. (प्रतिनिधी)आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील शेतकरी विश्वबंर जगताप या शेतकऱ्याने मागील तीन वर्षात १८ एकर जमीनीत ४८ बोअरवेल घेतले. यातील तीन चार बोअरला एक ते दीड इंच पाणी लागलेले आहे. हे पाणी केवळ पाण्याची टाकी भरून घेण्यापुरतेच आहे. पाण्याच्या शोधात जगताप यांनी आठरा एकर क्षेत्राची चाळणी केली तरी देखील पाणी लागलेले नाही. एवढेच नाही तर एक बोअर चक्क १ हजार फूट घेतले. मात्र त्या बोअरला एक ठिपका देखील पाणी लागले नाही.