शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

यापूर्वी रेल्वे नेली, आता..रस्त्यावर उतरू, पण पीटलाउन जालन्याला जाऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 12:43 IST

Aurangaabd Pitline: रेल्वेची पीटलाइन चिकलठाणा येथेच झाली पाहिजे, यासाठी चिकलठाणा संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शेतकरी, ग्रामस्थ एकवटले आहेत.

औरंगाबाद : चिकलठाण्यासाठी मंजूर झालेली पीटलाइन कोणत्याही परिस्थितीत जालन्याला जाऊ देणार नाही, असा पवित्रा चिकलठाणा येथील शेतकरी आणि गावकऱ्यांनी घेतला आहे. वेळ पडली तर पीटलाइनसाठी रस्त्यावरही उतरू, असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे पीटलाइनचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रेल्वेची पीटलाइन चिकलठाणा येथेच झाली पाहिजे, यासाठी चिकलठाणा संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शेतकरी एकवटले आहेत. शेतकऱ्यांनी बुधवारी छोटेखानी बैठक घेत पीटलाइन चिकलठाणा येथून जाऊ देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला आहे. औरंगाबाद ही पर्यटनाची राजधानी असून, औद्योगिक वसाहती, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शिवाय भौगोलिकदृष्ट्या पीटलाइन चिकलठाणा येथेच झाली पाहिजे, असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले. हा लढा व्यापक करण्यासाठी शनिवारी सकाळी १० वाजता चिकलठाणा रेल्वेस्टेशन येथे बैठक आयोजित केली आहे.औरंगाबादेत पीटलाइन झाली पाहिजे, अशी मागणी गेल्या १५ ते २० वर्षांपासून करण्यात येत आहे. यासाठी चिकलठाणा येथे सर्वेक्षण करण्यात आले होते. पीटलाइनला मंजुरी मिळालेली होती, असे असताना अचानक पीटलाइन जालना येथे होणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. शनिवारी होणाऱ्या बैठकीस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी रमेश दहीहंडे, अमोल कोरडे, विकिराजे पाटील, रामेश्वर कोरडे, विलास गायके, प्रकाश गायके, सचिन जैस्वाल, नीलेश कावडे, बाळू दहीहंडे, श्रीराम दहीहंडे यांची उपस्थिती होती.

यापूर्वी रेल्वे नेली, आता..यापूर्वी औरंगाबादहून सुटणारी आणि औरंगाबादकरांच्या सोयीची जनशताब्दी एक्स्प्रेस जालना येथे नेण्यात आली. आता पुन्हा मंजूर झालेली पीटलाइन पळविण्यात येत आहे. त्यामुळे या विरोधात चिकलठाणा आणि परिसरातील शेतकरी एकवटले आहेत. पीटलाइन जालन्याला जाऊ देणार नाही, असे रमेश दहीहंडे यांनी सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वेJalanaजालनाAurangabadऔरंगाबाद