शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

औरंगाबादमध्ये आता ‘ई-नाम’; ओरडून हर्राशी करणे झाले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 15:06 IST

जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्याच्या अडत बाजारात ‘ओरडून हर्राशी’ करणे बंद झाले आहे.

औरंगाबाद : जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्याच्या अडत बाजारात ‘ओरडून हर्राशी’ करणे बंद झाले आहे. मागील दोन दिवसांपासून ‘ई-नाम’ या इलेक्ट्रॉनिक्स व्यापार पोर्टलद्वारे ‘ई-आॅक्शन’ करण्यात येत आहे. मंगळवारी दुसर्‍या दिवशी २७७ क्विंटलपैकी १४३ क्विंटल धान्याची विक्री झाली. मात्र, नवीन प्रणाली असल्याने पोर्टल हँग होण्याचा प्रकार अधूनमधून होत आहे. ‘ई-आॅक्शन’ सुरळीत होण्यास निश्चितच आठवडाभराचा अवधी लागणार आहे. यामुळे  खरेदीदार व शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाची स्थिती राहील. 

राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये होणारे रोखीचे व्यवहार बंद करून सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्यासाठी, शेतकर्‍यांची होणारी लूट थांबून त्यांच्या शेतीमालास जास्तीत जास्त भाव मिळावा, या हेतूने ‘ई-नाम’प्रणाली केंद्र सरकारने लागू केली आहे. जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारपासून प्रत्यक्षात ‘ई-आॅक्शन’ला सुरुवात झाली. आता बाजार समितीच्या गेटवर नोंदणी केली जाते. त्यानंतर सर्व माल सेल हॉल क्र. २ मध्ये उतरविण्यात येतो. येथे शेतमालाची गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेमध्ये गुणवत्ता तपासली जाते. यानंतर ‘ई-आॅक्शन’ला सुरुवात होते.

मंगळवारी २७७ क्विंटल पैकी १४३ क्विंटल धान्याची विक्री झाली. आता ओरडून हर्राशीऐवजी प्रत्येक  खरेदीदाराच्या हातात मोबाईल असतो व मोबाईलवरच ई-आॅक्शन केले जात आहे. सर्वात जास्त किंमत आल्यावर शेतकर्‍यास विक्री व्यवहार करायचा की नाही, हे विचारले जाते. संबंधिताची संमती असेल तरच शेतीमालाची विक्री होते. नसता दुसर्‍या दिवशी पुन्हा त्या शेतीमालाचे ‘ई-आॅक्शन’ केले जाते. प्रणाली नवीन असल्याने कृउबा कर्मचारी व खरेदीदारांना थोडे अवघड जात आहे. त्यात पोर्टल हँग होत असल्याने ई-आॅक्शनला वेळ लागत आहे. यासंदर्भात बाजार समितीचे सचिव विजय शिरसाठ यांनी सांगितले की, प्रणाली सुरळीत होण्यास आठवडाभराचा कालावधी लागेल. या ई-आॅक्शनमध्ये शेतकरी व खरेदीदारांना काही अडचणी येत असतील, तर बाजार समिती संपूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. येत्या काही दिवसांत ई-आॅक्शन सर्वांना दिसावे यासाठी मोठा स्क्रीन बसविण्यात येणार आहे.

ई-आॅक्शन करा; पण अडत्याच्या दुकानासमोर ‘ई-नाम’ला व्यापार्‍यांचा विरोध नाही. मात्र, ई-आॅक्शन अडत्याच्या दुकानासमोर करण्यात यावे. जाधववाडीतच सर्व माल एका हॉलमध्ये उतरवून तिथे ई-आॅक्शन केले जाते. परिस्थिती अशीच राहिल्यास अडते व त्यांच्यावर अवलंबून कर्मचारी, हमाल सर्व बेरोजगार होतील. -हरीश पवार, अडत व्यापारी, जाधववाडी

अडते खरेदी परवाने कृउबाला करणार परत आॅनलाईन व्यवहारात शेतकरीच नव्हे, तर खरेदीदारांनाही आर्थिक फटका बसत आहे. जिल्ह्यातील अन्य बाजार समितीत ‘ई-नाम’ सुरू झाले नाही. यामुळे शेतकरी शेतीमाल तिकडे नेत आहेत. याचा फटका येथील अडते व खरेदीदारांना बसत आहे. शुक्रवारी सर्व अडते आपल्याकडील खरेदी-विक्रीचे परवाने कृउबाला परत देणार आहेत. -कन्हैयालाल जैस्वाल, अध्यक्ष, अडत व्यापारी संघटना

हमालांवर बेकारीचे संकट अडत्याच्या दुकानाऐवजी शेतीमाल एकाच हॉलमध्ये उतरवून घेतला जात आहे. याचा फटका हमालांनाही बसला आहे. धान्याच्या अडत बाजारात १२५ हमाल व महिला कामगार आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अडत दुकानावरच ई-आॅक्शन व्हावे, यासाठी बुधवारी कृउबाच्या सभापतींना निवेदन देण्यात येणार आहे.-देवीदास कीर्तिशाही, सचिव, मराठवाडा लेबर युनियन

बाजरीला वाजवी भाव ९ पोते बाजरी विक्रीला आणली ‘ई-लिलावात’ १००५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. थोडी भिजलेली बाजारी होती. वाजवी भाव मिळाला. अडत्याकडे क्विंटलमागे १५ किलो बाजरीचे नुकसान होत असे व अडतही कापल्या जात होती. ‘ई-नाम’मध्ये शेतकर्‍याचा फायदा आहे. -परमेश्वर पठाडे, शेतकरी, वरझडी

शेतकर्‍यांनी भूलथापांना बळी पडू नयेई-नाम योजना शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी आहे. मात्र, काही व्यापारी शेतकर्‍यांना संभ्रमित करीत आहेत. कमी भाव मिळेल, असे सांगून त्यांची दिशाभूल करीत आहेत. शेतकर्‍यांनी भूलथापांना बळी पडू नये व शेतीमाल कृउबात विक्रीसाठी आणावा. -राधाकिसन पठाडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद