शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

गेल्या पावसाळ्यात मराठवाड्यातील साडेपाच हजार किमी रस्ते गेले वाहून; यंदाही ५०९ किमीची चाळण

By विकास राऊत | Updated: July 27, 2022 20:12 IST

बांधकाम विभागाची ५५० कोटी रुपयांची मागणी होती. मात्र त्यातून अर्धेच अनुदान पदरी पडल्याने बहुतांश कामे रखडली.

- विकास राऊतऔरंगाबाद : गेल्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील सुमारे साडेपाच हजार किमी रस्ते वाहून गेले आहेत. यंदाही ५०९ कि.मी. रस्ते वाहून गेले आहेत.

रस्ते विकासासाठी शासनाने १० हजार कोटींच्या पॅकेजमधून काही रक्कम रस्ते बांधणीसाठी मराठवाडा विभागात दिली होेती. बांधकाम विभागाची ५५० कोटी रुपयांची मागणी होती. मात्र त्यातून अर्धेच अनुदान पदरी पडल्याने बहुतांश कामे रखडली. आता पुन्हा यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांची चाळणी होण्यास सुरुवात झाली असून, नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक रस्ते वाहून गेले आहेत. उर्वरित जिल्ह्यातील आढावा बांधकाम विभाग घेत आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची जमीन वाहून जात आहे. साठवलेला शेतमाल, जनावरांचे गोठे, बी-बियाणे शेतात असलेल्या घरातील जीवनावश्यक वस्तू महापुरात वाहून गेल्या आहेत. खरिपातील पावणेचार लाख हेक्टरवरील उभे पीक अतिवृष्टीने आडवे केले. शेतकऱ्यांच्या या नुकसानासोबतच दळणवळणासाठी असलेले रस्तेही वाहून गेले. त्या रस्त्यांची डागडुजी करणे, काही नवीन पक्के रस्ते तयार केल्यास शेतमालाला मार्केटपर्यंत नेणे सोपे होईल. भाजीपाला, फळे, दूध हा माल वेळेत बाजारपेठेपर्यंत जाणे आवश्यक असते. त्यासाठी चांगले रस्ते असणे गरजेचे आहे. याचा विचार करूनच शासनाने मराठवाड्यातील रस्ते बांधणीसाठी अनुदान देण्याची मागणी आगामी काळात होण्याची शक्यता आहे.

रस्त्यांचे नुकसान होत आहेदरम्यान, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता डी. डी. उकिर्डे यांनी सांगितले. मागील पावसाळ्यात विभागातील साडेपाच ते सहा हजार किमी. रस्त्यावर अतिवृष्टीमुळे खड्डे पडले होते. काही ठिकाणचे रस्ते वाहून गेले होते. आवश्यक कामे हाती घेतली आहेत. नांदेड जिल्ह्यातील चार ते पाच तालुक्यांत रस्ते, पुलांचे व सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. आगामी काळात दुरुस्ती हाती घेण्यात येईल.

विभागीय प्रशासनाचा अहवाल असाजून व जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील रस्ते, पुलासह शाळा इमारतीसह अन्य अशा ३ हजाराहून अधिक सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. त्या दुरुस्तीसाठी सुमारे ४३३ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाच्या प्राथमिक अहवालात नोंदविण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील ५०९ किमी रस्त्यांचे नुकसान झाले. त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे ३१८ कोटी ६६ लाखांचा निधी अपेक्षित आहे, तर जिल्ह्यातील ४६० पुलांना या पुराचा फटका बसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असून त्याच्या दुरुस्तीसाठी ७८ कोटी ३७ लाखांचा निधी लागणार आहे.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाroad safetyरस्ते सुरक्षा