शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या पावसाळ्यात मराठवाड्यातील साडेपाच हजार किमी रस्ते गेले वाहून; यंदाही ५०९ किमीची चाळण

By विकास राऊत | Updated: July 27, 2022 20:12 IST

बांधकाम विभागाची ५५० कोटी रुपयांची मागणी होती. मात्र त्यातून अर्धेच अनुदान पदरी पडल्याने बहुतांश कामे रखडली.

- विकास राऊतऔरंगाबाद : गेल्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील सुमारे साडेपाच हजार किमी रस्ते वाहून गेले आहेत. यंदाही ५०९ कि.मी. रस्ते वाहून गेले आहेत.

रस्ते विकासासाठी शासनाने १० हजार कोटींच्या पॅकेजमधून काही रक्कम रस्ते बांधणीसाठी मराठवाडा विभागात दिली होेती. बांधकाम विभागाची ५५० कोटी रुपयांची मागणी होती. मात्र त्यातून अर्धेच अनुदान पदरी पडल्याने बहुतांश कामे रखडली. आता पुन्हा यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांची चाळणी होण्यास सुरुवात झाली असून, नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक रस्ते वाहून गेले आहेत. उर्वरित जिल्ह्यातील आढावा बांधकाम विभाग घेत आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची जमीन वाहून जात आहे. साठवलेला शेतमाल, जनावरांचे गोठे, बी-बियाणे शेतात असलेल्या घरातील जीवनावश्यक वस्तू महापुरात वाहून गेल्या आहेत. खरिपातील पावणेचार लाख हेक्टरवरील उभे पीक अतिवृष्टीने आडवे केले. शेतकऱ्यांच्या या नुकसानासोबतच दळणवळणासाठी असलेले रस्तेही वाहून गेले. त्या रस्त्यांची डागडुजी करणे, काही नवीन पक्के रस्ते तयार केल्यास शेतमालाला मार्केटपर्यंत नेणे सोपे होईल. भाजीपाला, फळे, दूध हा माल वेळेत बाजारपेठेपर्यंत जाणे आवश्यक असते. त्यासाठी चांगले रस्ते असणे गरजेचे आहे. याचा विचार करूनच शासनाने मराठवाड्यातील रस्ते बांधणीसाठी अनुदान देण्याची मागणी आगामी काळात होण्याची शक्यता आहे.

रस्त्यांचे नुकसान होत आहेदरम्यान, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता डी. डी. उकिर्डे यांनी सांगितले. मागील पावसाळ्यात विभागातील साडेपाच ते सहा हजार किमी. रस्त्यावर अतिवृष्टीमुळे खड्डे पडले होते. काही ठिकाणचे रस्ते वाहून गेले होते. आवश्यक कामे हाती घेतली आहेत. नांदेड जिल्ह्यातील चार ते पाच तालुक्यांत रस्ते, पुलांचे व सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. आगामी काळात दुरुस्ती हाती घेण्यात येईल.

विभागीय प्रशासनाचा अहवाल असाजून व जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील रस्ते, पुलासह शाळा इमारतीसह अन्य अशा ३ हजाराहून अधिक सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. त्या दुरुस्तीसाठी सुमारे ४३३ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाच्या प्राथमिक अहवालात नोंदविण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील ५०९ किमी रस्त्यांचे नुकसान झाले. त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे ३१८ कोटी ६६ लाखांचा निधी अपेक्षित आहे, तर जिल्ह्यातील ४६० पुलांना या पुराचा फटका बसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असून त्याच्या दुरुस्तीसाठी ७८ कोटी ३७ लाखांचा निधी लागणार आहे.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाroad safetyरस्ते सुरक्षा