शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

नियम मोडताना ३६८ वाहनचालकांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 23:29 IST

वाहतूक नियम मोडून बिनधास्तपणे वाहने पळविणाऱ्या ३६८ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी रविवारी सायंकाळी कारवाई केली.

औरंगाबाद : वाहतूक नियम मोडून बिनधास्तपणे वाहने पळविणाऱ्या ३६८ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी रविवारी सायंकाळी कारवाई केली. विशेष म्हणजे शहराच्या विविध भागांमध्ये ही अचानक कारवाई करण्यात आल्याने वाहनचालकांची धांदल उडाली.

वाहतूक शाखेचे प्रभारी सहायक पोलीस आयुक्त भारत काकडे म्हणाले की, वाहतूक नियम मोडल्यामुळे अपघात होतात आणि अपघातात अनेकांना प्राणास मुकावे लागते, अशा घटना रोखण्यासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियम पाळणे बंधनकारक आहे, असे असताना वाहनचालक मात्र नियम मोडून वाहने पळविताना दिसतात. अशा वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून सतत कारवाई केली जाते.

आज रविवार असल्याने बहुतेक वाहतूक पोलीस साप्ताहिक सुटीवर असतात, यामुळे शहरातील मोजक्याच सिग्नलवर वाहतूक पोलीस नजरेस पडतात. ही बाब वाहनचालकांना माहीत असल्याने वाहनचालक राँग साईडने वाहने नेतात, विना हेल्मेट आणि विना सीटबेल्ट वाहने पळवितात. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ९ ठिकाणी आज अचानक वाहतूक नियम मोडणाºया वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

सायंकाळी ५ ते ६ कालावधीत ३६८ वाहनचालकांना नियम मोडून वाहने चालविताना पकडले. या सर्व वाहनचालकांना ई-चलन देऊन १ लाख ७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त काकडे यांनी दिली. अशा प्रकारची कारवाई यापुढेही नियमित सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtraffic policeवाहतूक पोलीस