शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

नियम मोडताना ३६८ वाहनचालकांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 23:29 IST

वाहतूक नियम मोडून बिनधास्तपणे वाहने पळविणाऱ्या ३६८ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी रविवारी सायंकाळी कारवाई केली.

औरंगाबाद : वाहतूक नियम मोडून बिनधास्तपणे वाहने पळविणाऱ्या ३६८ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी रविवारी सायंकाळी कारवाई केली. विशेष म्हणजे शहराच्या विविध भागांमध्ये ही अचानक कारवाई करण्यात आल्याने वाहनचालकांची धांदल उडाली.

वाहतूक शाखेचे प्रभारी सहायक पोलीस आयुक्त भारत काकडे म्हणाले की, वाहतूक नियम मोडल्यामुळे अपघात होतात आणि अपघातात अनेकांना प्राणास मुकावे लागते, अशा घटना रोखण्यासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियम पाळणे बंधनकारक आहे, असे असताना वाहनचालक मात्र नियम मोडून वाहने पळविताना दिसतात. अशा वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून सतत कारवाई केली जाते.

आज रविवार असल्याने बहुतेक वाहतूक पोलीस साप्ताहिक सुटीवर असतात, यामुळे शहरातील मोजक्याच सिग्नलवर वाहतूक पोलीस नजरेस पडतात. ही बाब वाहनचालकांना माहीत असल्याने वाहनचालक राँग साईडने वाहने नेतात, विना हेल्मेट आणि विना सीटबेल्ट वाहने पळवितात. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ९ ठिकाणी आज अचानक वाहतूक नियम मोडणाºया वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

सायंकाळी ५ ते ६ कालावधीत ३६८ वाहनचालकांना नियम मोडून वाहने चालविताना पकडले. या सर्व वाहनचालकांना ई-चलन देऊन १ लाख ७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त काकडे यांनी दिली. अशा प्रकारची कारवाई यापुढेही नियमित सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtraffic policeवाहतूक पोलीस