शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातही अनेक गावे तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:46 IST

पावसाळ्यातही वाळूज महानगरातील अनेक गावे तहानलेलीच असून, त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

वाळूज महानगर : पावसाळा सुरु होऊन दीड महिना उलटला आहे. मात्र, अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे जलस्त्रोत कोरडेच आहेत. त्यामुळे पावसाळ्यातही वाळूज महानगरातील अनेक गावे तहानलेलीच असून, त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अशीच परिस्थिती रहिली तर येणाऱ्या काळात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. पावसाळा सुरु होवून दीड महिना होत आला आहे. तरीही अजून समाधानकारक पाऊस झालेला नाही. केवळ दोन-तीन वेळाच बºयापैकी पाऊस झाला आहे. परंतू या झालेल्या पावसामुळे अजून जमिनीची तहानही भागलेली नाही. त्यामुळे दरवर्षी या वेळेत २५ ते ३० टक्के साठा होणारे पाझर तलाव, धरणे अजूनही कोरडेच आहेत.

त्यामुळे मागील काही महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करणारी वाळूज महानगरातील अनेक गावे पावसाळ्यातही तहानलेलीच आहेत. महानगरातील सिडको वाळूज महानगरासह पंढरपूर, वडगाव कोल्हाटी, तीसगाव, साजापूर, रांजणगाव, वाळूज, जोगेश्वरी, कमळापूर, विटावा, घाणेगाव आदी गावांतील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून यातील काही गावांना स्थानिक प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. एमआयडीसीने पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागाच्या पाणीपुरवठ्यात कपात केली आहे. या पाणी कपातीच्या धोरणामुळे स्थानिक ग्रामपंचायतीही संकटात सापडल्या असून, गावाला पाणीपुरवठा करताना त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. यातून बहुतांशी ग्रामपंचायतीला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

तर भीषण पाणीटंचाईअर्धा पावसाळा संपत आला आहे. परंतू अजून चांगला पाणीसाठा होईल असा मोठा पाऊस झालेला नाही. दरवर्षी पावसाळ्यात सुरुवातीच्या एक ते दीड महिन्यात पाझर तलाव, धरणे, नाल्यात बºयापैकी साठा होतो. पण यावर्षी एकाही तलावात, धरणा पाणी साठा झालेला नाही. यंदा जमिनीतील पाणीपातळीही मोठ्या प्रमाणात खाली गेली आहे. जर काही दिवसांत मोठा पाऊस झाला नाही. तर नागरिकांसह जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत.----------------------------------------------

टॅग्स :Walujवाळूजwater shortageपाणीकपात