शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

भर दुष्काळात नाथसागराची पिकांना ‘संजीवनी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 00:23 IST

विक्रमी पाणीपट्टी वसूल : लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात २५० कोटींची वाढ

संजय जाधवपैठण : भर दुष्काळातही जायकवाडी धरणातून (नाथसागर) यंदा सिंचनासाठी व बिगर सिंचनासाठी १३ टीएमसी पाणी सोडण्यात आले. जायकवाडीच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या ३८६ गावांतील शेतकऱ्यांना याचा फायदा झाला असून शेतीच्या उत्पादनात जवळपास २५० कोटी रूपयांची वाढ झाली आहे. लाभक्षेत्रात मनासारखे पाणी मिळाल्याने बळीराजानेही यंदा भरभरून पाणीपट्टीचे माप जायकवाडी प्रशासनाच्या तिजोरीत टाकले आहे. गेल्या दहा वर्षात सर्वाधिक म्हणजे २८ कोटी ३४ लाख रूपयांची पाणीपट्टी यंदा सिंचन व बिगर सिंचन क्षेत्रातून वसूल केल्याचा विक्रम जायकवाडी प्रशासनाने केला आहे.जायकवाडी धरणात यंदा ४७ टक्के जलसाठा झाला होता. धरणात उपलब्ध असलेल्या जलसाठ्याच्या कालवा सल्लागार समितीत योग्य नियोजन करून पिण्यासाठी लागणारे पाणी राखीव ठेवत लाभक्षेत्रातील शेतकºयांसाठी कालव्याद्वारे सोडण्यात आले. जायकवाडीच्या डाव्या व उजव्या कालव्यातून १५ आॅक्टोबर, २०१८ ते १ डिसेंबर, २०१८ असे ४६ दिवसांचे पहिले आवर्तन सोडण्यात आले. या कालावधीत ७.३४ टीएमसी पाणी जलाशयातून देण्यात आले. दुसरे आवर्तन २४ जानेवारी २०१९ ते २८ फेब्रुवारी २०१९ असे ३५ दिवस सोडण्यात आले. या कालावधीत ५.६६ टीएमसी पाणी जलाशयातून खर्ची झाले.दीड लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखालीकालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे औरंगाबाद, जालना, परभणी, बीड व अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. लाभक्षेत्रात यंदा कापूस, कडधान्य, गहू, ज्वारी, मका, हरभरा, भाजीपाला, मिरची, हळद, ऊस, केळी, मोसंबी आदी पिकांचे उत्पादन जोरात घेण्यात आले. यंदा गहू पिकाखाली येणारे क्षेत्र एकूण लाभक्षेत्राच्या १८ टक्के एवढे होते. जायकवाडी धरणातून वेळेवर पाणी मिळाल्याने या पिकांच्या उत्पादनात वाढ झाली असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.उद्दिष्ट ७ कोटींचे, वसुली २८ कोटी ३४ लाखांचीसिंचन व बिगर सिंचन या क्षेत्रातून जायकवाडी प्रशासनासमोर यंदा ७ कोटी रुपये पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी जायकवाडीचे अधिकारी व शेतकरी यांच्यात समन्वय निर्माण केल्याने तब्बल २८ कोटी ३४ लाख १२ हजार रूपयांची पाणीपट्टी जायकवाडीच्या तिजोरीत जमा झाली आहे. यात जलाशय उपसा पाणीपट्टी १ कोटी २९ लाख ८८ हजार रुपये, प्रवाही कालवा पाणीपट्टी ४२ लाख ४९ हजार, कालवा उपसा पाणीपट्टी ७ लाख ७४ हजार रुपये असे एकूण १ कोटी ८० लाख ११ हजार रुपये वसूल झाले आहेत. बिगर सिंचन प्रकारात २६ कोटी २७ लक्ष ३४ हजार रुपये व बिगर सिंचन समायोजन २६ लाख २७ हजार रुपये असे एकूण २८ कोटी ३४ लाख १२ हजार रुपये पाणीपट्टी यंदा वसूल झाली. गेल्या दहा वर्षात २००८ ते २०१८ दरम्यान १४ कोटी २७ लक्ष रुपये पाणीपट्टी वसुलीचा उच्चांक होता. यंदा मात्र तब्बल २८ कोटी रूपयांची पाणीपट्टी वसूल करुन हा उच्चांक मोडण्यात आला.कोट...पाणीवापर संस्था वाढवणे गरजेचेशेतकरी व अधिकारी असे सहभागी सिंचनाचे तत्व वापरून पाण्याची बचत करून ओलीताखालील क्षेत्र वाढविण्यासाठी लाभक्षेत्रात दोन्ही कालव्यावर पाणीवापर सहकारी संस्था शेतकºयांनी स्थापन कराव्यात, असे आवाहन कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी केले आहे. लाभक्षेत्रात सध्या १३४ पाणीवापर संस्था कार्यान्वित असून या पाणीवापर संस्थेच्या सभासद शेतकºयांना जायकवाडीच्या पाण्याचा योग्य लाभ होत आहे, असेही त्यांनी सांगितले. जायकवाडी जलाशयातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.चौकट...गेल्या दहा वर्षातील जायकवाडीची पाणीपट्टी वसुली२००८-०९ - १४ कोटी २७ लक्ष.२००९-१० - १२ कोटी ८२ लक्ष.२०१०-११ - १२ कोटी ६६ लक्ष.२०११-१२ - १३ कोटी ६२ लक्ष.१०१२- १३ - ०९ कोटी ६० लक्ष.२०१३-१४ - १० कोटी ९३ लक्ष.२०१४- १५ - १२ कोटी १० लक्ष.२०१५-१६ - ०८ कोटी ९५ लक्ष.२०१६-१७ - ०९ कोटी२८ लक्ष.२०१७-१८ - १२ कोटी ८३ लक्ष.२०१८- १९ - २८ कोटी ३४ लक्ष.

 

टॅग्स :DamधरणWaterपाणी