शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

भर दुष्काळात नाथसागराची पिकांना ‘संजीवनी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 00:23 IST

विक्रमी पाणीपट्टी वसूल : लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात २५० कोटींची वाढ

संजय जाधवपैठण : भर दुष्काळातही जायकवाडी धरणातून (नाथसागर) यंदा सिंचनासाठी व बिगर सिंचनासाठी १३ टीएमसी पाणी सोडण्यात आले. जायकवाडीच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या ३८६ गावांतील शेतकऱ्यांना याचा फायदा झाला असून शेतीच्या उत्पादनात जवळपास २५० कोटी रूपयांची वाढ झाली आहे. लाभक्षेत्रात मनासारखे पाणी मिळाल्याने बळीराजानेही यंदा भरभरून पाणीपट्टीचे माप जायकवाडी प्रशासनाच्या तिजोरीत टाकले आहे. गेल्या दहा वर्षात सर्वाधिक म्हणजे २८ कोटी ३४ लाख रूपयांची पाणीपट्टी यंदा सिंचन व बिगर सिंचन क्षेत्रातून वसूल केल्याचा विक्रम जायकवाडी प्रशासनाने केला आहे.जायकवाडी धरणात यंदा ४७ टक्के जलसाठा झाला होता. धरणात उपलब्ध असलेल्या जलसाठ्याच्या कालवा सल्लागार समितीत योग्य नियोजन करून पिण्यासाठी लागणारे पाणी राखीव ठेवत लाभक्षेत्रातील शेतकºयांसाठी कालव्याद्वारे सोडण्यात आले. जायकवाडीच्या डाव्या व उजव्या कालव्यातून १५ आॅक्टोबर, २०१८ ते १ डिसेंबर, २०१८ असे ४६ दिवसांचे पहिले आवर्तन सोडण्यात आले. या कालावधीत ७.३४ टीएमसी पाणी जलाशयातून देण्यात आले. दुसरे आवर्तन २४ जानेवारी २०१९ ते २८ फेब्रुवारी २०१९ असे ३५ दिवस सोडण्यात आले. या कालावधीत ५.६६ टीएमसी पाणी जलाशयातून खर्ची झाले.दीड लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखालीकालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे औरंगाबाद, जालना, परभणी, बीड व अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. लाभक्षेत्रात यंदा कापूस, कडधान्य, गहू, ज्वारी, मका, हरभरा, भाजीपाला, मिरची, हळद, ऊस, केळी, मोसंबी आदी पिकांचे उत्पादन जोरात घेण्यात आले. यंदा गहू पिकाखाली येणारे क्षेत्र एकूण लाभक्षेत्राच्या १८ टक्के एवढे होते. जायकवाडी धरणातून वेळेवर पाणी मिळाल्याने या पिकांच्या उत्पादनात वाढ झाली असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.उद्दिष्ट ७ कोटींचे, वसुली २८ कोटी ३४ लाखांचीसिंचन व बिगर सिंचन या क्षेत्रातून जायकवाडी प्रशासनासमोर यंदा ७ कोटी रुपये पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी जायकवाडीचे अधिकारी व शेतकरी यांच्यात समन्वय निर्माण केल्याने तब्बल २८ कोटी ३४ लाख १२ हजार रूपयांची पाणीपट्टी जायकवाडीच्या तिजोरीत जमा झाली आहे. यात जलाशय उपसा पाणीपट्टी १ कोटी २९ लाख ८८ हजार रुपये, प्रवाही कालवा पाणीपट्टी ४२ लाख ४९ हजार, कालवा उपसा पाणीपट्टी ७ लाख ७४ हजार रुपये असे एकूण १ कोटी ८० लाख ११ हजार रुपये वसूल झाले आहेत. बिगर सिंचन प्रकारात २६ कोटी २७ लक्ष ३४ हजार रुपये व बिगर सिंचन समायोजन २६ लाख २७ हजार रुपये असे एकूण २८ कोटी ३४ लाख १२ हजार रुपये पाणीपट्टी यंदा वसूल झाली. गेल्या दहा वर्षात २००८ ते २०१८ दरम्यान १४ कोटी २७ लक्ष रुपये पाणीपट्टी वसुलीचा उच्चांक होता. यंदा मात्र तब्बल २८ कोटी रूपयांची पाणीपट्टी वसूल करुन हा उच्चांक मोडण्यात आला.कोट...पाणीवापर संस्था वाढवणे गरजेचेशेतकरी व अधिकारी असे सहभागी सिंचनाचे तत्व वापरून पाण्याची बचत करून ओलीताखालील क्षेत्र वाढविण्यासाठी लाभक्षेत्रात दोन्ही कालव्यावर पाणीवापर सहकारी संस्था शेतकºयांनी स्थापन कराव्यात, असे आवाहन कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी केले आहे. लाभक्षेत्रात सध्या १३४ पाणीवापर संस्था कार्यान्वित असून या पाणीवापर संस्थेच्या सभासद शेतकºयांना जायकवाडीच्या पाण्याचा योग्य लाभ होत आहे, असेही त्यांनी सांगितले. जायकवाडी जलाशयातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.चौकट...गेल्या दहा वर्षातील जायकवाडीची पाणीपट्टी वसुली२००८-०९ - १४ कोटी २७ लक्ष.२००९-१० - १२ कोटी ८२ लक्ष.२०१०-११ - १२ कोटी ६६ लक्ष.२०११-१२ - १३ कोटी ६२ लक्ष.१०१२- १३ - ०९ कोटी ६० लक्ष.२०१३-१४ - १० कोटी ९३ लक्ष.२०१४- १५ - १२ कोटी १० लक्ष.२०१५-१६ - ०८ कोटी ९५ लक्ष.२०१६-१७ - ०९ कोटी२८ लक्ष.२०१७-१८ - १२ कोटी ८३ लक्ष.२०१८- १९ - २८ कोटी ३४ लक्ष.

 

टॅग्स :DamधरणWaterपाणी