शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

भर दुष्काळात नाथसागराची पिकांना ‘संजीवनी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 00:23 IST

विक्रमी पाणीपट्टी वसूल : लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात २५० कोटींची वाढ

संजय जाधवपैठण : भर दुष्काळातही जायकवाडी धरणातून (नाथसागर) यंदा सिंचनासाठी व बिगर सिंचनासाठी १३ टीएमसी पाणी सोडण्यात आले. जायकवाडीच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या ३८६ गावांतील शेतकऱ्यांना याचा फायदा झाला असून शेतीच्या उत्पादनात जवळपास २५० कोटी रूपयांची वाढ झाली आहे. लाभक्षेत्रात मनासारखे पाणी मिळाल्याने बळीराजानेही यंदा भरभरून पाणीपट्टीचे माप जायकवाडी प्रशासनाच्या तिजोरीत टाकले आहे. गेल्या दहा वर्षात सर्वाधिक म्हणजे २८ कोटी ३४ लाख रूपयांची पाणीपट्टी यंदा सिंचन व बिगर सिंचन क्षेत्रातून वसूल केल्याचा विक्रम जायकवाडी प्रशासनाने केला आहे.जायकवाडी धरणात यंदा ४७ टक्के जलसाठा झाला होता. धरणात उपलब्ध असलेल्या जलसाठ्याच्या कालवा सल्लागार समितीत योग्य नियोजन करून पिण्यासाठी लागणारे पाणी राखीव ठेवत लाभक्षेत्रातील शेतकºयांसाठी कालव्याद्वारे सोडण्यात आले. जायकवाडीच्या डाव्या व उजव्या कालव्यातून १५ आॅक्टोबर, २०१८ ते १ डिसेंबर, २०१८ असे ४६ दिवसांचे पहिले आवर्तन सोडण्यात आले. या कालावधीत ७.३४ टीएमसी पाणी जलाशयातून देण्यात आले. दुसरे आवर्तन २४ जानेवारी २०१९ ते २८ फेब्रुवारी २०१९ असे ३५ दिवस सोडण्यात आले. या कालावधीत ५.६६ टीएमसी पाणी जलाशयातून खर्ची झाले.दीड लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखालीकालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे औरंगाबाद, जालना, परभणी, बीड व अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. लाभक्षेत्रात यंदा कापूस, कडधान्य, गहू, ज्वारी, मका, हरभरा, भाजीपाला, मिरची, हळद, ऊस, केळी, मोसंबी आदी पिकांचे उत्पादन जोरात घेण्यात आले. यंदा गहू पिकाखाली येणारे क्षेत्र एकूण लाभक्षेत्राच्या १८ टक्के एवढे होते. जायकवाडी धरणातून वेळेवर पाणी मिळाल्याने या पिकांच्या उत्पादनात वाढ झाली असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.उद्दिष्ट ७ कोटींचे, वसुली २८ कोटी ३४ लाखांचीसिंचन व बिगर सिंचन या क्षेत्रातून जायकवाडी प्रशासनासमोर यंदा ७ कोटी रुपये पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी जायकवाडीचे अधिकारी व शेतकरी यांच्यात समन्वय निर्माण केल्याने तब्बल २८ कोटी ३४ लाख १२ हजार रूपयांची पाणीपट्टी जायकवाडीच्या तिजोरीत जमा झाली आहे. यात जलाशय उपसा पाणीपट्टी १ कोटी २९ लाख ८८ हजार रुपये, प्रवाही कालवा पाणीपट्टी ४२ लाख ४९ हजार, कालवा उपसा पाणीपट्टी ७ लाख ७४ हजार रुपये असे एकूण १ कोटी ८० लाख ११ हजार रुपये वसूल झाले आहेत. बिगर सिंचन प्रकारात २६ कोटी २७ लक्ष ३४ हजार रुपये व बिगर सिंचन समायोजन २६ लाख २७ हजार रुपये असे एकूण २८ कोटी ३४ लाख १२ हजार रुपये पाणीपट्टी यंदा वसूल झाली. गेल्या दहा वर्षात २००८ ते २०१८ दरम्यान १४ कोटी २७ लक्ष रुपये पाणीपट्टी वसुलीचा उच्चांक होता. यंदा मात्र तब्बल २८ कोटी रूपयांची पाणीपट्टी वसूल करुन हा उच्चांक मोडण्यात आला.कोट...पाणीवापर संस्था वाढवणे गरजेचेशेतकरी व अधिकारी असे सहभागी सिंचनाचे तत्व वापरून पाण्याची बचत करून ओलीताखालील क्षेत्र वाढविण्यासाठी लाभक्षेत्रात दोन्ही कालव्यावर पाणीवापर सहकारी संस्था शेतकºयांनी स्थापन कराव्यात, असे आवाहन कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी केले आहे. लाभक्षेत्रात सध्या १३४ पाणीवापर संस्था कार्यान्वित असून या पाणीवापर संस्थेच्या सभासद शेतकºयांना जायकवाडीच्या पाण्याचा योग्य लाभ होत आहे, असेही त्यांनी सांगितले. जायकवाडी जलाशयातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.चौकट...गेल्या दहा वर्षातील जायकवाडीची पाणीपट्टी वसुली२००८-०९ - १४ कोटी २७ लक्ष.२००९-१० - १२ कोटी ८२ लक्ष.२०१०-११ - १२ कोटी ६६ लक्ष.२०११-१२ - १३ कोटी ६२ लक्ष.१०१२- १३ - ०९ कोटी ६० लक्ष.२०१३-१४ - १० कोटी ९३ लक्ष.२०१४- १५ - १२ कोटी १० लक्ष.२०१५-१६ - ०८ कोटी ९५ लक्ष.२०१६-१७ - ०९ कोटी२८ लक्ष.२०१७-१८ - १२ कोटी ८३ लक्ष.२०१८- १९ - २८ कोटी ३४ लक्ष.

 

टॅग्स :DamधरणWaterपाणी