शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कमी पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे सव्वालाख हेक्टर रब्बीचे क्षेत्र घटणार

By बापू सोळुंके | Updated: October 20, 2023 19:54 IST

कमी पावसाचा फटका : रब्बी क्षेत्र निम्मे होण्याचा अंदाज

छत्रपती संभाजीनगर : कमी पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामाचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा खाली येणार असल्याचे सांगितले जात असतानाच आता रब्बीचे क्षेत्राही निम्मे होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दिवसेंदिवस जमिनीतील ओलावा घटत असल्याने यावर्षी सुमारे सव्वा लाख हेक्टरवरील रब्बीचे क्षेत्र घटण्याचा अंदाज वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यावर्षी सरासरी पावसाच्या ८५ टक्केच पाऊस झाला शिवाय मुसळधार पाऊस न पडल्याने जिल्ह्यातील नदी, नाल्यांना एकही पूर गेला नाही. अल्प पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन निम्म्याहून अधिक घटेल असा अंदाज कृषितज्ज्ञ वर्तवित आहेत. सलग २१ दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाने खंड दिलेल्या कृषी मंडळातील अनेक पिकांचा केवळ चारा झाला. दरवर्षी ऑक्टोबरनंतर शेतकरी रब्बी हंगामाची तयारी सुरू करीत असतात. ज्या शेतकऱ्यांकडे बाराही महिने सिंचन सुविधा आहेत, अशा शेतकऱ्यांचा रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी आणि अन्य पिके घेण्याकडे कल आहे. मात्र, शेतकऱ्यांचेही यंदा कमी पावसामुळे रब्बीचे पेरणी क्षेत्र निम्म्यापर्यंत घटणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गतवर्षी सुमारे २लाख ५६ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती. यावर्षी मात्र कमी पावसामुळे रब्बीच्या क्षेत्रात निम्मी अर्थात सव्वालाख हेक्टरची घट होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील प्रमुख रब्बी पीक आणि प्रस्तावित क्षेत्र हेक्टरमध्येरब्बी ज्वारी--६०,४५०गहू----४८५२०मका---४७,४००हरभरा---५४०६०करडई---११७०एकूण दुय्यम पिके-- ४५९४

अत्यल्प पावसाळ्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात मोठी घटयावर्षी पावसाळा कमी झाल्याने जमिनीची ओल दिवसेंदिवस कमी होत आहे. मागील वर्षीच्या पेरणी क्षेत्राच्या आधारे आम्ही यावर्षीच्या रब्बी क्षेत्र किती असेल याबाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयास सादर केली आहे. या आकडेवारीच्या आधारे शासन स्तरावरून आपल्या जिल्ह्यासाठी बियाणे आणि रब्बीसाठी रासायनिक खतांचा कोटा मिळतो. गत वर्षभराच्या तुलनेत रब्बीच्या क्षेत्रात मोठी घट होण्याची स्थिती आहे. गव्हाऐवजी शेतकऱ्यांचा कमी पावसावर येणाऱ्या हरभऱ्याची पेरणी करण्याकडे कल असणार आहे.- प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसCropपीकFarmerशेतकरी