शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

सोशल मीडियावरील अपप्रचारामुळे भाजप पदाधिकाऱ्यांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 15:34 IST

भाजप सरकारच्या राजवटीत सर्वसामान्यांचा भ्रमनिरास झाला, महागाईने अनेक विक्रम मोडले, हेच का अच्छे दिन? यासारख्या सोशल मीडियावरील अनेक विडंबनात्मक पोस्ट आणि चावडीवरील अपप्रचारामुळे भाजप पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

- विजय सरवदे 

औरंगाबाद : भाजप सरकारच्या राजवटीत सर्वसामान्यांचा भ्रमनिरास झाला, महागाईने अनेक विक्रम मोडले, हेच का अच्छे दिन? यासारख्या सोशल मीडियावरील अनेक विडंबनात्मक पोस्ट आणि चावडीवरील अपप्रचारामुळे भाजप पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे आता स्वस्थ बसू नका. लोकांमध्ये जाऊन वेगवेगळ्या सरकारी योजनांचा प्रचार करा. लाभार्थ्यांमध्ये जाऊन, तुम्हाला जे काही मिळाले आहे, ते भाजप सरकारमुळेच, अशी त्यांना आठवण करून द्या, या व अशा वेगवेगळ्या टिप्स भाजपच्या नेत्यांनी काल ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पक्षाच्या सर्वच आघाड्यांच्या सदस्य-पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

सन २०१४ ची लोकसभा- विधानसभेची निवडणूक असेल किंवा त्यानंतर येणाऱ्या गावपातळीवरील साऱ्याच निवडणुकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपने विजयाचे सर्व विक्रम मोडले आहेत. अलीकडच्या काळात मात्र, त्याच सोशल मीडियाने भाजप नेत्यांची झोप मोडली आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत काल गुरुवारी जिल्ह्यातील सर्व भाजपचे जि.प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, भाजपच्या जिल्हा, तालुका, शहर कार्यकारिणी तसेच व सर्वच आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक आयोजित झाली.

या बैठकीत भाजपचा अपप्रचार रोखण्यासाठी सज्ज व्हा, असे सांगून योजनांनिहाय याद्या हस्तगत करा. गाव व तालुकानिहाय लाभार्थ्यांच्या याद्या तयार करा, ग्रामसभांमध्ये त्याचे वाचन करा, लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटी घ्या आणि त्यांना जाणीव करून द्या की, जे काही तुम्हाला मिळाले आहे, ते भाजप सरकारमुळेच.

काही सदस्यांनी कामे होत नसल्याचा सूर आळवला. तेव्हा आपल्याला काय मिळाले किंवा नाही, याचा विचार न करता बुथनिहाय संपर्क अभियान यशस्वी करा. भाजपचा अपप्रचार रोखण्यावर नेटाने भर द्या. आगामी निवडणुकीत बहुमताने भाजपचे सरकार सत्तेत आले, तर तुमची कामे होतील, अशा कानपिचक्याही या बैठकीत दिल्या.

बैठकीत करण्यात आलेले उपदेश असे...भाजपच्या राजवटीत शेतकरी देशोधडीला लागला, असा अपप्रचार केला जात आहे. त्यासाठी पीकविमा, पीककर्ज, बोंडअळीमुळे देण्यात आलेली नुकसानभरपाई आदींच्या याद्या हस्तगत करा. गावनिहाय लाभार्थ्यांच्या याद्या तयार करा. त्यानंतर गावांमध्ये दवंडी लावून ग्रामसभा बोलवा. लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावांच्या यादीचे जाहीरपणे वाचन करा. केंद्र तसेच राज्यात भाजप सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकाळात तुम्हाला हा लाभ मिळाल्याचे त्यांना ठासून सांगा. याशिवाय, संजय गांधी निराधार योजना, मोफत गॅस, मुद्रा लोन, शेततळे, नालाबंडिंग, चर खोदणी, विविध घरकुल योजना, अपंगांच्या विविध योजना, अशा विविध योजनांच्या लाभार्थ्यांना भेटा. त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करा. भाजप सरकारमुळेच तुम्हाला लाभ मिळू शकला, हे त्यांना समजावून सांगा.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाBJPभाजपाElectionनिवडणूकGovernmentसरकार