शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
3
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
4
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
5
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
6
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
7
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
8
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
9
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
10
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
12
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
13
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
14
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
15
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
16
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
17
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
18
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
19
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन

शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट !

By admin | Updated: June 25, 2017 13:48 IST

वर्‍हाडात पावसाने दडी मारल्याने पेरण्या उलटण्याचे प्रमाण वाढले आहे.

शेतकरी हवालदिल ; बियाणे बाजारातील गर्दी ओसरलीअकोला : वर्‍हाडात पावसाने दडी मारल्याने पेरण्या उलटण्याचे प्रमाण वाढले आहे. येत्या दोन तीन दिवसात पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाच्या अनिच्छिततेचा परिणाम बियाणे बाजारावर झाली असून, शेतकर्‍यांनी अद्याप पुर्ण शंभर टक्के कृषी निविष्ठाची खरेदी केलेली नाही.अमरावती,अकोला,बुलडाणा व वाशिम जिल्हयात जवळपास ५0 ते ५५ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. अकोला जिल्हयात १0 टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने यावर्षी चांगल्या पावसाचे भाकीत केल्याने पश्‍चिम विदर्भातील शेतकर्‍यांनी या आशेवर पहिल्याच पावसात जवळपास ५0 टक्के क्षेत्रावर पेरणी केली आहे; पण पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तापमानात वाढ झाल्याने पेरणी केलेली पिके कोमेजू लागली आहेत. पाण्याची थोडीफार उपलब्धता असलेल्या ठिकाणी तुषार सिंचनाद्वारे पिके जगविण्याचा प्रयत्न शेतकर्‍यांकडून केला जात आहे. येत्या दोन दिवसांत पाऊस न आल्यास पिके उलटण्याची भीती असल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.दरम्यान, पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ांत ३२ लाखांवर क्षेत्र खरीप हंगामाचे आहे. यातील अध्र्याच्यावर म्हणजेच १७ लाख हेक्टर क्षेत्र हे अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्हय़ात आहे. अकोला वगळता बुलडाणा व वाशिम जिल्हय़ात ५0 टक्के क्षेत्रावर शेतकर्‍यांनी खरीप पिकांची पेरणी केली आहे; पण पावसाने दडी मारल्याने अंकुरलेली पिके करपू लागली असून, उर्वरित पेरण्यांना विलंब होत आहे. पिकांना तातडीने पावसाची गरज असल्याने शेतकर्‍यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील ४ लाख १३ हजार हेक्टरवर कृषी विभागाने पेरणीचे नियोजन केले आहे. त्यातील २ लाख ५0 हजार हेक्टरवर शेतकर्‍यांनी पेरणी केली आहे. हे क्षेत्र ५१ टक्के आहे. बुलडाणा जिल्हय़ातील ७ लाख ४७ हजार ५७८ हेक्टर क्षेत्र खरीप हंगामातील पेरणीचे असून,जवळपास ४ लाख हजार हेक्टरवर शेतकर्‍यांनी पेरणी केली आहे. घाटाखालील परिस्थिती नाजूक आहे.पाऊस न आल्यास घाटाखाली आणि घाटावरील पिके उलटण्याची शक्यता आहे. अक ोला जिल्हय़ातही ४ लाख ८६ हजार ६00 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत यातील १0 टक्क्यांच्यावर पेरणी आटोपली आहे. यवतमाळ, अमरावती जिल्हय़ातही ५0 टक्क्यांच्या जवळपास पेरण्या आटोपल्या आहेत.

- पाऊस लाबंला आणि तापमानात वाढ झाल्याने पेरणी केलेली वर्‍हाडातील पिके कोमेजू लागली आहेत. बुलडणा जिल्हयातही हीच परिस्थिती आहे.घाटाखालची परिस्थिती नाजूक आहे. घाटावरही आता पाऊस हवा आहे. एक दोन दिवसात पाऊस न आल्यास दुबार पेरणीची शक्यता नाकारता येत नाही. - प्रमोद लहाळे,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,बुलडाणा.