शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

चौकशीच्या शक्यतेमुळेच मराठवाड्यातील 'जलयुक्त'साठीचे ५१ कोटी रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 13:45 IST

Jalyukta Shiwar Yojana जलयुक्त योजनेवर कॅगने ताशेरे ओढल्यामुळे आता पूर्ण योजना चौकशीच्या फेऱ्यात आली आहे.

ठळक मुद्देएप्रिल महिन्यात दिला चार जिल्ह्यांना निधी

औरंगाबाद : मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी राबविलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या शेवटच्या टप्प्यातील कामांना विद्यमान महाविकास आघाडी सरकारने अनुदानच दिले नाही.  योजनेबाबत सरकारला संशय असल्यामुळेच अपूर्ण राहिलेल्या दोन हजारांपेक्षा अधिक कामांसाठी ५१ कोटी ४८ लाख रुपये रोखण्यात आले.

सदर कामांसाठी निधीच्या तरतुदीची संचिका अर्थमंत्रालयात एप्रिल महिन्यात गेली, त्यावेळी ४५ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले. उर्वरित अनुदानाची संचिका तशीच पडून राहिली. जलयुक्त योजनेवर कॅगने ताशेरे ओढल्यामुळे आता पूर्ण योजना चौकशीच्या फेऱ्यात आली आहे. मराठवाड्यात गेल्या साडेचार वर्षांत जलयुक्त योजनेवर तब्बल दोन हजार ४१७ कोटी रुपये खर्च करण्यात आले. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारने डिसेंबर २०१४ मध्ये जलयुक्त शिवार योजना सुरू केली होती. या कालावधीत मराठवाड्यात अभिसरण, लोक सहभाग, असे मिळून सुमारे दोन हजार ४१७ कोटी रुपये खर्च केले. हा सगळा खर्च झाला असताना गेल्या उन्हाळ्यात विभागातील जिल्ह्यांना टँकरचा फेरा चुकला नाही. विभागात शेवटच्या टप्प्यातील दोन हजार ७७ कामे प्रगतिपथावर होती, त्या कामांना सरकारने कोरोनाच्या काळात अनुदानच दिले नाही.

एप्रिल महिन्यात दिला चार जिल्ह्यांना निधीचार जिल्ह्यांना एप्रिलमध्ये निधी देण्यात आला. त्यामध्ये जालना १६ कोटी १७ लाख, बीड १५ कोटी, नांदेड ४.५ कोटी व लातूरला १० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला.च्कामे संपल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्याने निधी नाकारला होता. परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, जिल्ह्यांना अनुदान मिळालेच नाही.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारMarathwadaमराठवाडाfundsनिधी