शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

संस्थेच्या पैशांचा व्यक्तिगत उपयोग केल्यामुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:02 IST

विद्यापीठाची परवानगी न घेता आठच दिवसात तोडली मुदतठेव; इरादापत्र रद्द खंडपीठ : इरादापत्र रद्द करण्याचे शासनाला आदेश औरंगाबाद : ...

विद्यापीठाची परवानगी न घेता आठच दिवसात तोडली मुदतठेव;

इरादापत्र रद्द

खंडपीठ : इरादापत्र रद्द करण्याचे शासनाला आदेश

औरंगाबाद : संस्थेचे मुदतठेव प्रमाणपत्र ही संस्थेची मालमत्ता असते. विद्यापीठाची परवानगी न घेता मुदतठेवीच्या रकमेचा व्यक्तिगत खर्चासाठी उपयोग केल्यामुळे पैठण तालुक्यामधील बिडकीन येथील अमरप्रीत बहुद्देशीय सेवाभावी संस्थेला नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी शासनाने दिलेले इरादापत्र रद्द करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. परिणामी संस्थेला नवीन महाविद्यालय गमवावे लागले.

इरादापत्र नाकारलेल्या बजाजनगर येथील प्रतिस्पर्धी महात्मा बसवेश्वर शिक्षणसंस्थेच्या याचिकेवर न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर. एन. लड्डा यांच्या खंडपीठात १८ ऑगस्ट रोजी सुनावणी झाली असता, अमरप्रीत बहुद्देशीय संस्थेचे वरील कृत्य महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या कलम १०८चा आणि १५ सप्टेंबर २०१७च्या शासन निर्णयाचा भंग करणारे आहे. नवीन महाविद्यालयाचा कारभार चालविण्यासाठी संस्था सक्षम आहे किंवा कसे हे पडताळण्यासाठी मुदतठेव घेण्याचा उद्देश असतो. त्याचाही भंग केल्याचे निरीक्षण नोंदवीत खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

काय होती याचिका

महात्मा बसवेश्वर संस्थेने याचिकेत म्हटल्यानुसार सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अमरप्रीत बहुद्देशीय सेवाभावी संस्थेला इरादापत्र दिले होते. मात्र, अमरप्रीत संस्थेने प्रस्तावासोबत आवश्यक असलेले सात लाख रुपयांचे मुदतठेव प्रमाणपत्र जोडले नव्हते. ते त्यांनी एक महिन्यानंतर दाखल केले. विद्यापीठाच्या पूर्वपरवानगीशिवाय पैसे काढणार नसल्याचे हमीपत्रही दिले. त्यानंतर अवघ्या एकच आठवड्यात संस्थेने मुदतठेवीचे सात लाख रुपये काढून घेतले. विद्यापीठाने नकारात्मक शिफारस केली असताना, संस्थेने शासन निर्णयाचे पालन न करता राजकीय दबावाचा वापर करून इरादापत्र मिळविले. त्यामुळे ते रद्द करावे, अशी विनंती याचिकाकर्त्याचे वकील संदीप बी. राजेभोसले यांनी केली होती.

प्रतिवाद्यांचा युक्तिवाद

संस्थाचालकांचे संपूर्ण कुटुंब कोविड-१९मुळे आजारी झाले होते. त्यांच्या उपचारासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता असल्यामुळे अनिवार्य परिस्थितीत मुदतठेव मोडावी लागली होती. संस्थेने नंतर ती रक्कम परत जमा केली, असे प्रतिवादीतर्फे ॲड. एस. एस. जाधवर यांनी निदर्शनास आणून दिले.

विद्यापीठातर्फे ॲड. एस. एस. टोपे आणि शासनातर्फे मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांनी काम पाहिले.