शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

पावसाच्या खंडामुळे जिल्ह्यातील मूग, उडीद उत्पादन घटले; मक्याचा उत्पादनावरही झाला परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 18:40 IST

पावसाने मोेठी दडी मारल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

औरंगाबाद : पावसाने मोेठी दडी मारल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, जिल्ह्यात मूग व उडदाच्या उत्पादनात ६० ते ७० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. तसेच जिल्ह्यात मक्याच्या उत्पादनावरही ५० टक्के, तर २० टक्क्यांनी कपाशीचे उत्पादन घटण्याचा प्रथम पूर्वानुमान अहवाल कृषी विभागाने जाहीर केला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ३५ हजार ५८५ हेक्टर आहे. त्यापैकी १२,८६५ हेक्टर, तर उडदाची ५,२४४ हेक्टरवर पेरणी झाली. ऐन शेंगा लागणे व भरण्याच्या अवस्थेत असताना जुलै व आॅगस्टमध्ये ३ ते ४ आठवड्यांचा पावसात खंड पडल्याने दोन्हीची उत्पादकता ६० ते ७० टक्क्यांपर्यंत घटली आहे. यंदा १ हजार ५१ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली होती. उत्पादनात ८ ते १० टक्के घट होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.

गेल्या पाच वर्षांत ज्वारीचे सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ९७८ किलोग्रॅम एवढी आहे, तर यंदा ९२६ किलोग्रॅम असल्याचे नमूद करण्यात आले आहे. खरिपात २ लाख ६ हजार ९९४ हेक्टरवर मका लावण्यात आला. त्यापैकी २२,५६३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. कणसाची वाढ खुंटली, तसेच दाणे कमी प्रमाणात भरल्याने ४० टक्के उत्पादन कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

हेक्टरी २७ किलोने कापसाचे उत्पादन कमी जिल्ह्यात  ३ लाख ८८ हजार ७७८ हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. बोंडअळीचा परिणामही जाणवत आहे. २३ हजार ५९९ हेक्टर क्षेत्र हे पावसाच्या खंडाने बाधित झाले आहे. मागील पाच वर्षांत सरासरी उत्पादन (रुई) हेक्टरी २२७ किलो एवढे झाले आहे. यंदा हेक्टरी २०० किलो होण्याचा प्रथम नजर अंदाज नोंदविण्यात आला आहे. 

रबीच्या क्षेत्रात वाढीचे नियोजन औरंगाबाद जिल्ह्यात रबीचे सरासरी क्षेत्र १ लाख ८९ हेक्टर आहे. त्यापैकी मागील रबी हंगामात १ लाख ६९ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदात २ लाख १५ हजार हेक्टरवर पेरणी होेईल, असे नियोजन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. २७ टक्क्यांनी रबीचे क्षेत्र वाढेल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादagricultureशेती