शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

लॉकडाऊनमुळे महापालिकेला किमान ३० कोटी रुपयांवर पाणी फिरवावे लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:06 AM

औरंगाबाद : मागील वर्षी मार्चअखेरीस लॉकडाऊन झाले. त्यामुळे महापालिकेची करवसुली घटली. आता पुन्हा लॉकडाऊनचे संकट घोंघावत आहे. उद्या, सोमवार ...

औरंगाबाद : मागील वर्षी मार्चअखेरीस लॉकडाऊन झाले. त्यामुळे महापालिकेची करवसुली घटली. आता पुन्हा लॉकडाऊनचे संकट घोंघावत आहे. उद्या, सोमवार किंवा मंगळवार (दि. ९)पासून लॉकडाऊन लावलेच तर महापालिकेला किमान २५ ते ३० कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाला लॉकडाऊन लावताना अनेकदा विचार करावा लागणार आहे.

मागील वर्षी मालमत्ताकर आणि पाणीपट्टीतून महापालिकेला १०० कोटी रुपये प्राप्त झाले होते. यंदा तीन ते चार महिन्यांपासून वसुलीसाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे मालमत्ताकर आणि पाणीपट्टीची वसुली शंभर कोटींपेक्षा जास्त झाली आहे. ३१ मार्चपर्यंत किमान ५० कोटींचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून काम करण्यात येत आहे. कोरोना आजाराचा संसर्ग वाढल्याने वसुली किमान २५ ते ३० कोटी रुपये तरी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. विविध व्यावसायिक मालमत्ताधारकांकडून मोठ्या प्रमाणात वसुली बाकी आहे. मागील वर्षी राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध कार्यालयांनी महापालिकेला कर भरलेला नाही. यंदाही अनेक कार्यालयांकडे कराची रक्कम थकीत आहे. आज, रविवारी प्रशासनाने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला तर महापालिकेला मोठ्या आर्थिक संकटाचा मुकाबला करावा लागेल. लॉकडाऊन हळूहळू ३१ मार्चपर्यंत वाढला तर वसुली अजिबात होणार नाही, अशी भीती प्रशासनातील सूत्रांनी व्यक्त केली. आज, रविवारच्या बैठकीतील निर्णयाकडे सर्वसामान्य नागरिकांचे जेवढे लक्ष लागले आहे, तेवढेच लक्ष महापालिकेचेही आहे.

प्रशासनाचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची शक्यता

मार्चअखेरपर्यंत अपेक्षित उत्पन्न गृहीत धरून प्रशासनाने काही ठोस पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला होता. घनकचरा प्रकल्पासाठी महापालिकेचा वाटा म्हणून काही रक्कम टाकण्यात येणार होती. त्याचप्रमाणे स्मार्ट सिटी योजनेसाठी काही रक्कम देण्यात येणार होती. या दोन मोठ्या कामांना तूर्त बाजूला ठेवण्याशिवाय महापालिकेकडे पर्याय राहणार नाही.