शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

स्थानिकांच्या त्रासामुळे तमाशा मंडळ जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 23:10 IST

आधुनिक युगात यात्रा, उरुस आदींच्या माध्यमातून लोककला जिवंत ठेवणे आव्हान असतानाच स्थानिकांच्या त्रासामुळे शेकटा येथून परत जाण्याचा इशारा पुणे येथील कुंदा पाटील पुणेकर यांनी मंगळवारी दिला.

करमाड : लोककलेने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकलेली आहे. आधुनिक युगात यात्रा, उरुस आदींच्या माध्यमातून लोककला जिवंत ठेवणे आव्हान असतानाच स्थानिकांच्या त्रासामुळे शेकटा येथून परत जाण्याचा इशारा पुणे येथील कुंदा पाटील पुणेकर यांनी मंगळवारी दिला.

शेकटा येथे दहा दिवसांपासून अब्दुल्ला मियाचा उरुस भरलेला आहे. उरुस १५ दिवस चालत असल्याने संपूर्ण जिल्ह्यातून भाविक येत आहेत. या ठिकाणी राज्यातील नामवंत लोकनाट्य तमाशा मंडळ अनेक वर्षांपासून हजेरी लावत आहेत. ग्रामीण भागातील लोक तमाशा पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत येतात. त्यामुळे या उरुसमध्ये रात्री लोकांची अधिक उपस्थिती असते. पुणे येथील कुंदा पाटील लोकनाट्य तमाशा मंडळानेही येथे तमाशाचा फड टाकला आहे.

भावना व्यक्त करताना कुंदा पाटील म्हणाल्या की, माहिती व तंत्रज्ञानाच्या या युगात लोककला जिवंत ठेवणे आव्हान बनले आहे. त्यातच मोबाईल, टीव्ही व सिनेमामुळे तमाशा मंडळ डबघाईस आले आहेत. त्यातच कलाकारांचे मानधन, त्यांचा भोजनाचा खर्च, वाहतुकीचा खर्च यातच आमचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. आता शेकटा येथेही पोलीस, ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटीकडून त्रास दिला जात असल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. पोलीस, ग्रामपंचायत व यात्रा कमिटीच्या वतीने एका तमाशासाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांची मागणी करण्यात आली. ही मागणी पूर्ण होणे अशक्य असल्याने येथून निघून जाण्याचा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद