शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
4
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
5
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
6
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
7
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
8
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
9
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
10
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
11
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
12
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
13
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
14
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
15
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
16
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
17
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
18
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
19
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
20
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर

हलक्या प्रतीच्या कागदामुळे ५०० रुपयांच्या फाटक्या नोटा वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 16:06 IST

हलक्या प्रतीच्या कागदामुळे दोन वर्षांत खराब झाल्या नोटा

ठळक मुद्देपरवानाधारक व्यापारी कमिशनवर बदलून देताहेत नोटा

औरंगाबाद : नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने चलनात ५०० रुपयांची नोट आणली. मात्र, हलक्या कागदामुळे अवघ्या ३ वर्षांत या नोटा खराब होऊ लागल्या आहेत. हाताळून हाताळून या नोटा फाटू लागल्या आहेत. अशा फाटक्या नोटा घेऊन नागरिक बँकांमध्ये येत आहेत. आठवड्याला १०० पेक्षा अधिक ग्राहक अशा नोटा घेऊन बँकांमध्ये येत आहेत. अति फाटलेल्या नोटा ज्या बँका घेत नाहीत, अशा नोटा परवानाधारक व्यापारी कमिशनवर बदलून देत आहेत. 

८ नोव्हेंबर २०१६ रोजी १,००० रुपये व ५०० रुपयांच्या जुन्या नोटा व्यवहारातून बाद झाल्या. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने नवीन ५०० रुपये व २ हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या. ५०० रुपयांच्या नोटेचा आकार ६६ एमएम बाय १५० एमएम एवढा ठेवण्यात आला आहे. मात्र, ५०० रुपयांच्या नवीन नोटा हातात पडताच त्यावेळी नागरिकांनी या नोटा हलक्या प्रतीच्या कागदापासून तयार करण्यात आल्या असल्याचा आरोप केला होता, तसेच हाताळून हाताळून या नोटा लवकर खराब होतील, असेही म्हटले होते. 

नवीन नोटा चलनात येऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. नागरिकांचे म्हणणे आता सत्य ठरत आहे. कारण, बँकांकडे मोठ्या संख्येने ५०० रुपयांच्या नवीन खराब नोटा ग्राहक आणून देत आहेत. शहरात सर्व बँकांमध्ये मिळून दररोज १०० पेक्षा अधिक ग्राहक ५०० रुपयांच्या फाटक्या नोटा आणून देत असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यात २ तुकडे असलेल्या नोटा, हाताळून खराब झालेल्या नोटा, रंग फिक्कट झालेल्या नोटा, एवढेच नव्हे, तर ३ ते ४ तुकडे झालेल्या नोटांचे प्रमाण अधिक आहे. 

स्टेट बँक आॅफ इंडियाच्या दूध डेअरी करन्सी चेस्टमध्ये दर शुक्रवारी अशा नोटा बदलून दिल्या जात आहेत. याच बँकेच्या शाहगंज येथील करन्सी चेस्टमध्ये दररोज ५०० रुपयांच्या १३ ते १५ खराब नोटा घेऊन ग्राहक येत असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. बँक दोन तुकडे असलेली नोट स्वीकारते; पण ती नोट चिकटवून दिलेली पाहिजे. तीन तुकडे असलेली किंवा नंबरवरच खराब झालेली किंवा नंबरवरच तुकडा पडलेली नोट बँक स्वीकारत नाही, असेही त्यांनी नमूद केले. मागील ६ महिन्यांत ५०० रुपयांच्या फाटलेल्या नोटा ग्राहकांकडून आणून देण्याचे प्रमाण वाढल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. 

तीन तुकड्यांवरील नोटा कमिशन एजन्टकडे तीन तुकड्यांवरील नोटा बँका स्वीकारत नाहीत. अशा नोटा अखेरीस ग्राहक शहरातील कमिशन एजन्टकडे नेत आहेत. कमिशन एजन्टने सांगितले की, दररोज ५०० रुपयांच्या २० ते २५ नोटा ग्राहक आणत आहेत. या नोटा ३० टक्के कमिशन घेऊन बदलून दिल्या जात आहेत. येथून या फाटक्या नोटा मुंबईत रिझर्व्ह बँकेसमोर बसलेल्या कमिशन एजन्टकडे पाठविल्या जातात. ते कमिशन एजन्ट रिझर्व्ह बँकेत नोटा जमा करीत असल्याचे कमिशन एजन्टने सांगितले. 

५ लाखांच्या बनावट नोटा बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार बाजारात ३ लाख रुपयांच्या बनावट नोटा चलनात आहेत, तर २ लाख रुपयांच्या बनावट नोटा बँकांमध्ये जमा झालेल्या आहेत. यामुळे बँकांमधील अधिकाऱ्यांनी नोटा स्वीकारताना संपूर्ण काळजी घ्यावी, असेही सूचना देण्यात आल्या आहेत. बँकांमध्ये येणाऱ्या बंडलमध्येही दोन ते तीन बनावट नोटा येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. व्यापारी व ग्राहकांनीही दैनंदिन व्यवहारामध्ये नोटा तपासून घ्याव्यात, असे आवाहनही बँक अधिकाऱ्यांनी केले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMONEYपैसाbusinessव्यवसाय