शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’मुळे २२ लाख हेक्टर सिंचनाचा निव्वळ बनाव : एच. एम. देसरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 11:49 IST

मूल्यमापन करण्यासाठी नेमलेल्या समितीने एजंट म्हणून काम करीत सरकारची पाठराखण करणारा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला आहे. तो स्वीकारण्यात येऊ नये, यासाठी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे, अशी माहिती जनहित याचिकाकर्ते, अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी दिली. 

औरंगाबाद : जलयुक्त शिवार योजनेतून राज्यात २२ लाख हेक्टर सिंचन निर्माण झाले, असे सांगितले जाते; परंतु हा केवळ बनाव आहे. या योजनेचे मूल्यमापन करण्यासाठी नेमलेल्या समितीने एजंट म्हणून काम करीत सरकारची पाठराखण करणारा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला आहे. तो स्वीकारण्यात येऊ नये, यासाठी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे, अशी माहिती जनहित याचिकाकर्ते, अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. 

मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेत शास्त्रशुद्ध ‘माथा ते पायथा’ संसाधन विकास पद्धतीला तिलांजली देत पर्यावरणाचा -हास आणि भ्रष्टाचाराला मोकळे रान दिल्याचा आरोप देसरडा यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी २०१५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या प्रकरणी समिती नेमण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थापन झालेल्या समितीने तीन वर्षांनंतर जूनमध्ये योजनेतील कामे योग्य असल्याचा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला आहे. या अहवालासंदर्भात प्रा. देसरडा यांनी माहिती दिली.

नवीन समिती नेमण्यात यावी

समितीने वस्तुनिष्ठ अहवाल दिलेला नाही. याचिकेत नमूद केलेल्या त्रुटीकडे साफ दुर्लक्ष केले आहे. योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. त्यातून राज्य टंचाईमुक्त झाल्याचा राज्य सरकारचा दावा चुकीचा आहे. अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. त्यामुळे हा अहवाल नाकारून पर्यावरण तज्ज्ञांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती नेमण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

केवळ ९ गावांत पाहणीयोजनेतून गेल्या तीन वर्षांत राज्यातील १६ हजार ५०० गावांत जलसंधारणाची कामे करण्यात आली. याची सत्य परिस्थिती पाहण्यासाठी समितीने केवळ ९ गावांचा दौरा केला. औरंगाबादमधील महालपिंप्री, जालना जिल्ह्यातील म्हात्रेवाडी या गावांचा समावेश आहे. महालपिंप्री येथील शेतकऱ्यांनी नाला खोलीकरणानंतर विहिरीचे पाणी कमी झाल्याचे सांगितले. तरीही त्याकडेही समितीने दुर्लक्ष केल्याचे प्रा. देसरडा म्हणाले.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पState Governmentराज्य सरकारJalyukt Shivarजलयुक्त शिवारCorruptionभ्रष्टाचार