शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

‘जलयुक्त’मुळे २२ लाख हेक्टर सिंचनाचा निव्वळ बनाव : एच. एम. देसरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 11:49 IST

मूल्यमापन करण्यासाठी नेमलेल्या समितीने एजंट म्हणून काम करीत सरकारची पाठराखण करणारा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला आहे. तो स्वीकारण्यात येऊ नये, यासाठी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे, अशी माहिती जनहित याचिकाकर्ते, अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी दिली. 

औरंगाबाद : जलयुक्त शिवार योजनेतून राज्यात २२ लाख हेक्टर सिंचन निर्माण झाले, असे सांगितले जाते; परंतु हा केवळ बनाव आहे. या योजनेचे मूल्यमापन करण्यासाठी नेमलेल्या समितीने एजंट म्हणून काम करीत सरकारची पाठराखण करणारा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला आहे. तो स्वीकारण्यात येऊ नये, यासाठी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे, अशी माहिती जनहित याचिकाकर्ते, अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. 

मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेत शास्त्रशुद्ध ‘माथा ते पायथा’ संसाधन विकास पद्धतीला तिलांजली देत पर्यावरणाचा -हास आणि भ्रष्टाचाराला मोकळे रान दिल्याचा आरोप देसरडा यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी २०१५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या प्रकरणी समिती नेमण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थापन झालेल्या समितीने तीन वर्षांनंतर जूनमध्ये योजनेतील कामे योग्य असल्याचा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला आहे. या अहवालासंदर्भात प्रा. देसरडा यांनी माहिती दिली.

नवीन समिती नेमण्यात यावी

समितीने वस्तुनिष्ठ अहवाल दिलेला नाही. याचिकेत नमूद केलेल्या त्रुटीकडे साफ दुर्लक्ष केले आहे. योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. त्यातून राज्य टंचाईमुक्त झाल्याचा राज्य सरकारचा दावा चुकीचा आहे. अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. त्यामुळे हा अहवाल नाकारून पर्यावरण तज्ज्ञांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती नेमण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

केवळ ९ गावांत पाहणीयोजनेतून गेल्या तीन वर्षांत राज्यातील १६ हजार ५०० गावांत जलसंधारणाची कामे करण्यात आली. याची सत्य परिस्थिती पाहण्यासाठी समितीने केवळ ९ गावांचा दौरा केला. औरंगाबादमधील महालपिंप्री, जालना जिल्ह्यातील म्हात्रेवाडी या गावांचा समावेश आहे. महालपिंप्री येथील शेतकऱ्यांनी नाला खोलीकरणानंतर विहिरीचे पाणी कमी झाल्याचे सांगितले. तरीही त्याकडेही समितीने दुर्लक्ष केल्याचे प्रा. देसरडा म्हणाले.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पState Governmentराज्य सरकारJalyukt Shivarजलयुक्त शिवारCorruptionभ्रष्टाचार