शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक उत्पादन घटल्याने मालवाहतुकीची गती मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 19:44 IST

आठ-आठ दिवसांपासून औद्योगिक क्षेत्रात दीड ते दोन हजार मालट्रक उभ्या

ठळक मुद्दे देशभरातून मागणी कमी झाली आहे. उत्पादन ४० टक्क्यांपर्यंत घटले आहे.

औरंगाबाद : मागील महिनाभरापासून उठाव घटल्याने औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन कमी करण्यात आले आहे. परिणामी, मागील आठ दिवसांपासून दीड ते दोन हजारांपेक्षा अधिक मालट्रक जागीच उभ्या आहेत. 

शहरातील  रेल्वेस्टेशन, चिकलठाणा, वाळूज, शेंद्रा, चितेपिंपळगाव औद्योगिक वसाहतीत लहान-मोठे मिळून ४ हजार युनिट आहेत. आॅटोमोबाईल हब म्हणून औरंगाबादची ओळख संपूर्ण जगात आहे. येथून संपूर्ण देशात वाहने, स्पेअर्स पार्ट, जॉबवर्क पाठविले जातात तसेच निर्यातही केली जाते. मात्र, मागील महिनाभरापासून मागणी घटल्याने येथील उद्योजकांनी उत्पादन कमी केले आहे. मसिआचे माजी अध्यक्ष किशोर राठी यांनी सांगितले की, आॅटोमोबाईल सेक्टर, कंज्युमर प्रॉडक्ट, इलेक्ट्रॉनिक्स आदी क्षेत्रातील उत्पादन ४० टक्क्यांपर्यंत घटले आहे. कारण, देशभरातून मागणी कमी झाली आहे.

बाजारात पैसा खेळता नसल्याचा परिणाम औद्योगिक उत्पादनावर होत आहे. मसिआचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ उद्योजक अर्जुन गायके यांनी सांगितले की, आॅटोमोबाईल क्षेत्रातील उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. कारण, आजघडीला देशभरातील शोरूममध्ये साडेतीन कोटी कार व ४० हजार कोटी दुचाकी विक्रीविना शिल्लक आहेत. आॅटोमोबाईल कंपन्यांनी आपल्या उत्पादनात घट केल्याने त्याचा येथील वेंडरच्या जॉबवर्कवरही परिणाम झाला आहे. त्याची तीव्रता औद्योगिक क्षेत्रात पाहण्यास मिळते आहे. मालवाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष फय्याज खान यांनी सांगितले की, मागील ८ दिवसांपासून मालट्रक वाहतुकीची गती मंदावली आहे. आजघडीला वाळूज, चिकलठाणा एमआयडीसी, शेंद्रा, बीड बायपास इत्यादी ठिकाणी दीड ते दोन हजारांपेक्षा अधिक मालट्रक उभ्या आहेत. 

शहरातून देशभरात उत्पादने पाठविली जातात. त्यात उत्तर व दक्षिण भारतात सर्वाधिक माल पाठविण्यात येतो. मागणी नसल्याने डिझेलचे भाव वाढूनही मालट्रकची भाडेवाढ झाली नाही, अशी परिस्थिती औरंगाबादेतच नाही देशभरात आहे. दरवर्षी जून-जुलै महिन्यात मागणी घटते, पण यंदा याची तीव्रता अधिक जाणवत आहे. 

१० ते १५ टक्के परिणाम मार्चअखेर नंतर सर्व प्रकारची मागणी कमी होत असते. जून महिन्यात पाऊस लांबल्याने परिस्थिती थोडी बिकट झाली आहे. विशेषत: चारचाकी वाहनांच्या मागणीवर परिणाम जास्त जाणवत आहे. तरीपण एकंदरीत औद्योगिक उत्पादनावर १० ते १५ टक्के परिणाम झाला आहे. सर्वत्र पाऊस चांगला झाला आहे. यामुळे येत्या काळात मागणी वाढेल. - शिवप्रसाद जाजू, सचिव,सीएमआयए 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादbusinessव्यवसायMONEYपैसा