शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक उत्पादन घटल्याने मालवाहतुकीची गती मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 19:44 IST

आठ-आठ दिवसांपासून औद्योगिक क्षेत्रात दीड ते दोन हजार मालट्रक उभ्या

ठळक मुद्दे देशभरातून मागणी कमी झाली आहे. उत्पादन ४० टक्क्यांपर्यंत घटले आहे.

औरंगाबाद : मागील महिनाभरापासून उठाव घटल्याने औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन कमी करण्यात आले आहे. परिणामी, मागील आठ दिवसांपासून दीड ते दोन हजारांपेक्षा अधिक मालट्रक जागीच उभ्या आहेत. 

शहरातील  रेल्वेस्टेशन, चिकलठाणा, वाळूज, शेंद्रा, चितेपिंपळगाव औद्योगिक वसाहतीत लहान-मोठे मिळून ४ हजार युनिट आहेत. आॅटोमोबाईल हब म्हणून औरंगाबादची ओळख संपूर्ण जगात आहे. येथून संपूर्ण देशात वाहने, स्पेअर्स पार्ट, जॉबवर्क पाठविले जातात तसेच निर्यातही केली जाते. मात्र, मागील महिनाभरापासून मागणी घटल्याने येथील उद्योजकांनी उत्पादन कमी केले आहे. मसिआचे माजी अध्यक्ष किशोर राठी यांनी सांगितले की, आॅटोमोबाईल सेक्टर, कंज्युमर प्रॉडक्ट, इलेक्ट्रॉनिक्स आदी क्षेत्रातील उत्पादन ४० टक्क्यांपर्यंत घटले आहे. कारण, देशभरातून मागणी कमी झाली आहे.

बाजारात पैसा खेळता नसल्याचा परिणाम औद्योगिक उत्पादनावर होत आहे. मसिआचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ उद्योजक अर्जुन गायके यांनी सांगितले की, आॅटोमोबाईल क्षेत्रातील उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. कारण, आजघडीला देशभरातील शोरूममध्ये साडेतीन कोटी कार व ४० हजार कोटी दुचाकी विक्रीविना शिल्लक आहेत. आॅटोमोबाईल कंपन्यांनी आपल्या उत्पादनात घट केल्याने त्याचा येथील वेंडरच्या जॉबवर्कवरही परिणाम झाला आहे. त्याची तीव्रता औद्योगिक क्षेत्रात पाहण्यास मिळते आहे. मालवाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष फय्याज खान यांनी सांगितले की, मागील ८ दिवसांपासून मालट्रक वाहतुकीची गती मंदावली आहे. आजघडीला वाळूज, चिकलठाणा एमआयडीसी, शेंद्रा, बीड बायपास इत्यादी ठिकाणी दीड ते दोन हजारांपेक्षा अधिक मालट्रक उभ्या आहेत. 

शहरातून देशभरात उत्पादने पाठविली जातात. त्यात उत्तर व दक्षिण भारतात सर्वाधिक माल पाठविण्यात येतो. मागणी नसल्याने डिझेलचे भाव वाढूनही मालट्रकची भाडेवाढ झाली नाही, अशी परिस्थिती औरंगाबादेतच नाही देशभरात आहे. दरवर्षी जून-जुलै महिन्यात मागणी घटते, पण यंदा याची तीव्रता अधिक जाणवत आहे. 

१० ते १५ टक्के परिणाम मार्चअखेर नंतर सर्व प्रकारची मागणी कमी होत असते. जून महिन्यात पाऊस लांबल्याने परिस्थिती थोडी बिकट झाली आहे. विशेषत: चारचाकी वाहनांच्या मागणीवर परिणाम जास्त जाणवत आहे. तरीपण एकंदरीत औद्योगिक उत्पादनावर १० ते १५ टक्के परिणाम झाला आहे. सर्वत्र पाऊस चांगला झाला आहे. यामुळे येत्या काळात मागणी वाढेल. - शिवप्रसाद जाजू, सचिव,सीएमआयए 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादbusinessव्यवसायMONEYपैसा