शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीच्या दादागिरी विरोधात उद्योजकांचा महाराष्ट्र सोडण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 18:52 IST

वाळूज औद्योगिक वसाहत सात ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. येथील उद्योजक ग्रामपंचायत ' कर ' भरत असतात. मात्र, मागील दोन वर्षापासून ग्रामपंचायतींनी  दादागिरी करीत उद्योजकांकडून मनमानीपद्धतीने अवास्तव कर वसूली करणे सुरु केले आहे.

ठळक मुद्देथकीत कर वसूलीसाठी या ग्रामपंचायती मधील ग्रामसेवक व पदाधिका-यांनी थेट कंपन्यांमध्ये घुसून कॉप्यूटर अन्य साहित्य जप्ती करणे सुरु केले आहे. या दादागिरी विरोधात सर्व उद्योजक एकवटले आहेत प्रशासनाने या मुद्दाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही व ग्रामपंचायतींची अशीच दादागिरी सुरु राहिली तर येत्या काळात आम्हाला नाईलाजाने महाराष्ट्र सोडावा लागेल असा इशारा उद्योजकांनी दिला. 

औरंगाबाद :  वाळूज औद्योगिक वसाहत सात ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. येथील उद्योजक ग्रामपंचायत ' कर ' भरत असतात. मात्र, मागील दोन वर्षापासून ग्रामपंचायतींनी  दादागिरी करीत उद्योजकांकडून मनमानीपद्धतीने अवास्तव कर वसूली करणे सुरु केले आहे. एवढेच नव्हे तर आता थकीत कर वसूलीसाठी या ग्रामपंचायती मधील ग्रामसेवक व पदाधिका-यांनी थेट कंपन्यांमध्ये घुसून कॉप्यूटर अन्य साहित्य जप्ती करणे सुरु केले आहे. या दादागिरी विरोधात सर्व उद्योजक एकवटले आहे. प्रशासनाने या मुद्दाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही व ग्रामपंचायतींची अशीच दादागिरी सुरु राहिली तर येत्या काळात आम्हाला नाईलाजाने महाराष्ट्र सोडावा लागेल व शेजारी राज्यात उद्योग सुरु करावे लागतील, असा इशारा उद्योजकांनी दिला. 

यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर (सीएमआयए)चे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, मराठवाडा असोसिएशन आॅफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर (मासिआ)चे अध्यक्ष सुनिल किर्दक व वाळूज इंडस्ट्रीज असोसिएशन (डब्ल्युआयए) चे अध्यक्ष वसंत वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुनिल किर्दक यांनी सांगितले की, जोगेश्वरी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या  किर्दक आॅटोकॉपमध्ये दुपारी ४ वाजता ग्रामपंचायतचे लोक आले त्यांनी  कर वसूलीसाठी आॅफीसमधील कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर, हार्डवेअरचे सामान सर्व जप्त करुन ट्रॅक्टरमध्ये टाकले. ग्रामपंचायतच्या म्हणण्यानुसार कंपनीकडे १ लाख ७० हजाराची कर थकबाकी होती. मात्र, त्यासाठी कंपनीतील सुमारे २५ लाखापेक्षा अधिकचे सामान ग्रामपंचायतच्या लोकांनी जप्त केले. 

कलम १२५ नुसार वाटाघाटीकरुन तोडगा काढण्याचा अधिकार आहे पण ग्रामपंचायत तसे करीत नसल्याने थकबाकी दिसून येत आहे.  अश्या प्रकारे दादागिरी करुन जप्ती करण्याचा पहिल्यांदाच प्रकार देशात घडला आहे. ही घटना निंदनीय आहे. यामुळे सर्व उद्योजक घाबरले आहेत. अशा असुरक्षीत वातावरणात आम्ही उद्योग करु शकणार नाही, असे सांगत किर्दक पुढे म्हणाले की, औरंगाबादेतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील उद्योजकांना ‘ग्रामपंचायत कर’ पोटी असा त्रास, दादागिरी सहन करावी लागत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर आम्ही आम्ही येथील उद्योग बंद करुन दुसºया राज्यात उद्योग सुरु करु असा इशाराही त्यांनी दिला. 

ग्रामपंचायत कर रद्द करावा सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी सांगितले की, उद्योगांना देण्यात येणारा भूखंड महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (म.औ.वि.म.) कडून दिले जातात. औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, पाणी, पथदिवे,आदी मुलभूत सुविधा एमआयडीसीकडून पुरविल्या जातात. आणि त्यासाठी उद्योगांकडून सेवाशुल्क वसुल केले जाते. मग ग्रामपंचायत कर  कशासाठी आकारला जातो. विशेष म्हणजे ग्रामपंचायत कोणत्याही सुविधा देत नाहीत. या ग्रामपंचायत करा आड दादागिरी, मनमानी कर वसूली वाढली असून याचा राज्यातील सर्व उद्योगांना त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण देशात जीएसटी एकच करप्रणाली लागू झाल्याने आता   ग्रामपंचायत कर रद्द झाला पाहिजे तरच राज्यात भविष्यात उद्योग टिकून राहतील. 

उद्योजकांच्या मागण्या१) जीएसटी लागू झाल्याने  ग्रामपंचायत कर रद्द करावा.२) कर भरण्यासाठी एक खिडकी योजना असावी.३) एमआयडीसी सेवा पुरविते आम्ही तिथेच कर भरण्याची मुभा असावी. ४) संपूर्ण राज्यात ग्रामपंचायत करात सुसुत्रता असावी. 

टॅग्स :Taxकरbusinessव्यवसायAurangabadऔरंगाबाद