शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

ग्रामपंचायतीच्या दादागिरी विरोधात उद्योजकांचा महाराष्ट्र सोडण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 18:52 IST

वाळूज औद्योगिक वसाहत सात ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. येथील उद्योजक ग्रामपंचायत ' कर ' भरत असतात. मात्र, मागील दोन वर्षापासून ग्रामपंचायतींनी  दादागिरी करीत उद्योजकांकडून मनमानीपद्धतीने अवास्तव कर वसूली करणे सुरु केले आहे.

ठळक मुद्देथकीत कर वसूलीसाठी या ग्रामपंचायती मधील ग्रामसेवक व पदाधिका-यांनी थेट कंपन्यांमध्ये घुसून कॉप्यूटर अन्य साहित्य जप्ती करणे सुरु केले आहे. या दादागिरी विरोधात सर्व उद्योजक एकवटले आहेत प्रशासनाने या मुद्दाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही व ग्रामपंचायतींची अशीच दादागिरी सुरु राहिली तर येत्या काळात आम्हाला नाईलाजाने महाराष्ट्र सोडावा लागेल असा इशारा उद्योजकांनी दिला. 

औरंगाबाद :  वाळूज औद्योगिक वसाहत सात ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. येथील उद्योजक ग्रामपंचायत ' कर ' भरत असतात. मात्र, मागील दोन वर्षापासून ग्रामपंचायतींनी  दादागिरी करीत उद्योजकांकडून मनमानीपद्धतीने अवास्तव कर वसूली करणे सुरु केले आहे. एवढेच नव्हे तर आता थकीत कर वसूलीसाठी या ग्रामपंचायती मधील ग्रामसेवक व पदाधिका-यांनी थेट कंपन्यांमध्ये घुसून कॉप्यूटर अन्य साहित्य जप्ती करणे सुरु केले आहे. या दादागिरी विरोधात सर्व उद्योजक एकवटले आहे. प्रशासनाने या मुद्दाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही व ग्रामपंचायतींची अशीच दादागिरी सुरु राहिली तर येत्या काळात आम्हाला नाईलाजाने महाराष्ट्र सोडावा लागेल व शेजारी राज्यात उद्योग सुरु करावे लागतील, असा इशारा उद्योजकांनी दिला. 

यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर (सीएमआयए)चे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, मराठवाडा असोसिएशन आॅफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर (मासिआ)चे अध्यक्ष सुनिल किर्दक व वाळूज इंडस्ट्रीज असोसिएशन (डब्ल्युआयए) चे अध्यक्ष वसंत वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुनिल किर्दक यांनी सांगितले की, जोगेश्वरी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या  किर्दक आॅटोकॉपमध्ये दुपारी ४ वाजता ग्रामपंचायतचे लोक आले त्यांनी  कर वसूलीसाठी आॅफीसमधील कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर, हार्डवेअरचे सामान सर्व जप्त करुन ट्रॅक्टरमध्ये टाकले. ग्रामपंचायतच्या म्हणण्यानुसार कंपनीकडे १ लाख ७० हजाराची कर थकबाकी होती. मात्र, त्यासाठी कंपनीतील सुमारे २५ लाखापेक्षा अधिकचे सामान ग्रामपंचायतच्या लोकांनी जप्त केले. 

कलम १२५ नुसार वाटाघाटीकरुन तोडगा काढण्याचा अधिकार आहे पण ग्रामपंचायत तसे करीत नसल्याने थकबाकी दिसून येत आहे.  अश्या प्रकारे दादागिरी करुन जप्ती करण्याचा पहिल्यांदाच प्रकार देशात घडला आहे. ही घटना निंदनीय आहे. यामुळे सर्व उद्योजक घाबरले आहेत. अशा असुरक्षीत वातावरणात आम्ही उद्योग करु शकणार नाही, असे सांगत किर्दक पुढे म्हणाले की, औरंगाबादेतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील उद्योजकांना ‘ग्रामपंचायत कर’ पोटी असा त्रास, दादागिरी सहन करावी लागत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर आम्ही आम्ही येथील उद्योग बंद करुन दुसºया राज्यात उद्योग सुरु करु असा इशाराही त्यांनी दिला. 

ग्रामपंचायत कर रद्द करावा सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी सांगितले की, उद्योगांना देण्यात येणारा भूखंड महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (म.औ.वि.म.) कडून दिले जातात. औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, पाणी, पथदिवे,आदी मुलभूत सुविधा एमआयडीसीकडून पुरविल्या जातात. आणि त्यासाठी उद्योगांकडून सेवाशुल्क वसुल केले जाते. मग ग्रामपंचायत कर  कशासाठी आकारला जातो. विशेष म्हणजे ग्रामपंचायत कोणत्याही सुविधा देत नाहीत. या ग्रामपंचायत करा आड दादागिरी, मनमानी कर वसूली वाढली असून याचा राज्यातील सर्व उद्योगांना त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण देशात जीएसटी एकच करप्रणाली लागू झाल्याने आता   ग्रामपंचायत कर रद्द झाला पाहिजे तरच राज्यात भविष्यात उद्योग टिकून राहतील. 

उद्योजकांच्या मागण्या१) जीएसटी लागू झाल्याने  ग्रामपंचायत कर रद्द करावा.२) कर भरण्यासाठी एक खिडकी योजना असावी.३) एमआयडीसी सेवा पुरविते आम्ही तिथेच कर भरण्याची मुभा असावी. ४) संपूर्ण राज्यात ग्रामपंचायत करात सुसुत्रता असावी. 

टॅग्स :Taxकरbusinessव्यवसायAurangabadऔरंगाबाद