शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पुरामुळे गोदा काठच्या 52 गावांचा विद्युतपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 16:05 IST

वैजापूर व गंगापूर तालुक्यातील 8‍ विद्युत उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या 22 उच्चदाब वाहिन्या बंद

औरंगाबाद : नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी नदीला पूर आला आहे. पूरपरिस्थितीमुळे गोदावरी नदीकाठच्या 52 गावांचा विद्युतपुरवठा रविवारी रात्रीपासून सुरक्षेसाठी बंद ठेवण्यात आला आहे. यामध्ये घरगुती आणि कृषिपंपाचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. आपात्कालिन परिस्थितीत संयम ठेवून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे.

पूरस्थितीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून वैजापूर व गंगापूर तालुक्यातील 8‍ विद्युत उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या 22 उच्चदाब वाहिन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच 658 रोहित्रांवरील 5 हजार 56 ग्राहकांचा विद्युतपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. बंद ठेवलेले रोहित्र हे प्रामुख्याने नदीकाठी असलेल्या कृषिपंपांचे आहेत. महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन अभियंते व कर्मचाऱ्यांना आपात्कालिन परिस्थितीत सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

पूर व पावसामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी गोदावरी नदीकाठावरील वीज संच, रोहित्र, विद्युत वाहिनी अनधिकृतपणे हाताळू नये. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ संबंधित महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. नागरिकांनी अशा स्थितीत संयम ठेवावा व महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजAurangabadऔरंगाबादfloodपूर