शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

पुरामुळे गोदा काठच्या 52 गावांचा विद्युतपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 16:05 IST

वैजापूर व गंगापूर तालुक्यातील 8‍ विद्युत उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या 22 उच्चदाब वाहिन्या बंद

औरंगाबाद : नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी नदीला पूर आला आहे. पूरपरिस्थितीमुळे गोदावरी नदीकाठच्या 52 गावांचा विद्युतपुरवठा रविवारी रात्रीपासून सुरक्षेसाठी बंद ठेवण्यात आला आहे. यामध्ये घरगुती आणि कृषिपंपाचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. आपात्कालिन परिस्थितीत संयम ठेवून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे.

पूरस्थितीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून वैजापूर व गंगापूर तालुक्यातील 8‍ विद्युत उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या 22 उच्चदाब वाहिन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच 658 रोहित्रांवरील 5 हजार 56 ग्राहकांचा विद्युतपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. बंद ठेवलेले रोहित्र हे प्रामुख्याने नदीकाठी असलेल्या कृषिपंपांचे आहेत. महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन अभियंते व कर्मचाऱ्यांना आपात्कालिन परिस्थितीत सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

पूर व पावसामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी गोदावरी नदीकाठावरील वीज संच, रोहित्र, विद्युत वाहिनी अनधिकृतपणे हाताळू नये. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ संबंधित महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. नागरिकांनी अशा स्थितीत संयम ठेवावा व महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजAurangabadऔरंगाबादfloodपूर