शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पुरामुळे गोदा काठच्या 52 गावांचा विद्युतपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 16:05 IST

वैजापूर व गंगापूर तालुक्यातील 8‍ विद्युत उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या 22 उच्चदाब वाहिन्या बंद

औरंगाबाद : नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी नदीला पूर आला आहे. पूरपरिस्थितीमुळे गोदावरी नदीकाठच्या 52 गावांचा विद्युतपुरवठा रविवारी रात्रीपासून सुरक्षेसाठी बंद ठेवण्यात आला आहे. यामध्ये घरगुती आणि कृषिपंपाचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. आपात्कालिन परिस्थितीत संयम ठेवून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे.

पूरस्थितीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून वैजापूर व गंगापूर तालुक्यातील 8‍ विद्युत उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या 22 उच्चदाब वाहिन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच 658 रोहित्रांवरील 5 हजार 56 ग्राहकांचा विद्युतपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. बंद ठेवलेले रोहित्र हे प्रामुख्याने नदीकाठी असलेल्या कृषिपंपांचे आहेत. महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन अभियंते व कर्मचाऱ्यांना आपात्कालिन परिस्थितीत सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

पूर व पावसामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी गोदावरी नदीकाठावरील वीज संच, रोहित्र, विद्युत वाहिनी अनधिकृतपणे हाताळू नये. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ संबंधित महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. नागरिकांनी अशा स्थितीत संयम ठेवावा व महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजAurangabadऔरंगाबादfloodपूर