शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसराईला दुष्काळाचा फटका

By admin | Updated: November 18, 2015 00:40 IST

राजकुमार जोंधळे , लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पडणाऱ्या दुष्काळाचा फटका यंदा लग्नसराईलाही बसल्याचे दिसून येत आहे़ तब्बल २७० दिवसांच्या लग्नसराईत ७४ विवाह

राजकुमार जोंधळे , लातूरजिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पडणाऱ्या दुष्काळाचा फटका यंदा लग्नसराईलाही बसल्याचे दिसून येत आहे़ तब्बल २७० दिवसांच्या लग्नसराईत ७४ विवाह तिथी आहेत़ प्रामुख्याने तुलसी विवाहानंतर लग्नसोहळ्याची धूम सुरु होते़ मात्र यंदा दुष्काळामुळे विवाह सोहळ्यांचे प्रमाण कमी आहे़ लातूर शहरातील ३५ मंगल कार्यालयात सरासरी ३० ते ३५ तारखांची नोंदणी महिनाभरापूर्वीच होत असे़ यंदा मात्र ही नोंदणी सरासरी १० वर आहे़ हा दुष्काळाचा फटका आहे़ लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, जळकोट, चाकूर, उदगीर, देवणी तालुक्यातील परिसर हा डोंगराळ आणि बालाघाटांच्या डोंगररांगांचा आहे़ परिणामी जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत या परिसरात अल्प पाऊस असतो़ मात्र गेल्या तीन वर्षांपासून अत्याअल्प पावसामुळे दुष्काळ आहे़ अशा दुष्काळात उपवर मुला-मुलींचे विवाह जुळविणे कुटुंब प्रमुखाला अवघड झाले आहे़ दुष्काळामुळे नापिकी अन त्यातून कोलमडलेले अर्थकारण यामुळे आपल्या मुला-मुलींचा विवाह कसा उरकायचा ही चिंता बहुतांश जन्मदात्यांना सतावत आहे़ लातूर शहरात ३५ मंगल कार्यालये आहेत़ लग्नसराईत ही मंगल कार्यालये मिळणे मुश्किलीचे असते़ यंदा मात्र मंगल कार्यालयाच्या नोंदणीसाठी येणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे़ महत्त्वाच्या तारखेत तर एकाच दिवशी एकाच मंगल कार्यालयात वेळेचा मेळ घालून तीन-तीन विवाह सोहळे बुकिंग होतात़ यंदा अशी परिस्थिती नसल्याचे राहीचंद्र मंगल कार्यालयाचे अतुल देशमुख यांनी सांगितले़ अलीकडे लातूर जिल्ह्यात विविध समाजाच्या वतीने सामूहिक वधू-वर परिचय मेळावा आणि विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे़ आता या विवाहसोहळ्याचे महत्त्व अनेकांना पटू लागल्यामुळे अशा कार्यक्रमात कुटुंबांचा सहभाग वाढू लागला आहे़ यातून वधू आणि वर पित्याकडे कुटुंबाचा अनावश्यक खर्चाची बचत होऊ लागली आहे़ दुष्काळावर मात करण्यासाठी व मोठ्या खर्चाला फाटा देण्यासाठी उपवर वधू-वरांच्या पालकांना यामुळे दिलासा मिळाला आहे़ विविध समाजाच्या संस्था, संघटना अशा मेळाव्यांचे आयोजन करु लागले आहेत़ परिचय मेळाव्यातून लग्न जुळविण्याबरोबर विवाह सोहळे करण्याचा हा उपक्रम आहे़ शासनानेही सामुहीक विवाह सोहळ्याला बळ दिले असून, समाज कल्याण विभागाकडे अशा सोहळ्यांसाठी अनुदान देण्याची योजनाही आहे़ ४जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विवाह सोहळ्यांसाठी शुभमंगल योजनाही सुरु केली आहे़ या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना लग्नासाठी मदत करण्याचा उपक्रम बँकेमार्फत गेल्या दोन वर्षांपासून राबविण्यात येत आहे़