शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

लग्नसराईला दुष्काळाचा फटका

By admin | Updated: November 18, 2015 00:40 IST

राजकुमार जोंधळे , लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पडणाऱ्या दुष्काळाचा फटका यंदा लग्नसराईलाही बसल्याचे दिसून येत आहे़ तब्बल २७० दिवसांच्या लग्नसराईत ७४ विवाह

राजकुमार जोंधळे , लातूरजिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पडणाऱ्या दुष्काळाचा फटका यंदा लग्नसराईलाही बसल्याचे दिसून येत आहे़ तब्बल २७० दिवसांच्या लग्नसराईत ७४ विवाह तिथी आहेत़ प्रामुख्याने तुलसी विवाहानंतर लग्नसोहळ्याची धूम सुरु होते़ मात्र यंदा दुष्काळामुळे विवाह सोहळ्यांचे प्रमाण कमी आहे़ लातूर शहरातील ३५ मंगल कार्यालयात सरासरी ३० ते ३५ तारखांची नोंदणी महिनाभरापूर्वीच होत असे़ यंदा मात्र ही नोंदणी सरासरी १० वर आहे़ हा दुष्काळाचा फटका आहे़ लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, जळकोट, चाकूर, उदगीर, देवणी तालुक्यातील परिसर हा डोंगराळ आणि बालाघाटांच्या डोंगररांगांचा आहे़ परिणामी जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत या परिसरात अल्प पाऊस असतो़ मात्र गेल्या तीन वर्षांपासून अत्याअल्प पावसामुळे दुष्काळ आहे़ अशा दुष्काळात उपवर मुला-मुलींचे विवाह जुळविणे कुटुंब प्रमुखाला अवघड झाले आहे़ दुष्काळामुळे नापिकी अन त्यातून कोलमडलेले अर्थकारण यामुळे आपल्या मुला-मुलींचा विवाह कसा उरकायचा ही चिंता बहुतांश जन्मदात्यांना सतावत आहे़ लातूर शहरात ३५ मंगल कार्यालये आहेत़ लग्नसराईत ही मंगल कार्यालये मिळणे मुश्किलीचे असते़ यंदा मात्र मंगल कार्यालयाच्या नोंदणीसाठी येणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे़ महत्त्वाच्या तारखेत तर एकाच दिवशी एकाच मंगल कार्यालयात वेळेचा मेळ घालून तीन-तीन विवाह सोहळे बुकिंग होतात़ यंदा अशी परिस्थिती नसल्याचे राहीचंद्र मंगल कार्यालयाचे अतुल देशमुख यांनी सांगितले़ अलीकडे लातूर जिल्ह्यात विविध समाजाच्या वतीने सामूहिक वधू-वर परिचय मेळावा आणि विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे़ आता या विवाहसोहळ्याचे महत्त्व अनेकांना पटू लागल्यामुळे अशा कार्यक्रमात कुटुंबांचा सहभाग वाढू लागला आहे़ यातून वधू आणि वर पित्याकडे कुटुंबाचा अनावश्यक खर्चाची बचत होऊ लागली आहे़ दुष्काळावर मात करण्यासाठी व मोठ्या खर्चाला फाटा देण्यासाठी उपवर वधू-वरांच्या पालकांना यामुळे दिलासा मिळाला आहे़ विविध समाजाच्या संस्था, संघटना अशा मेळाव्यांचे आयोजन करु लागले आहेत़ परिचय मेळाव्यातून लग्न जुळविण्याबरोबर विवाह सोहळे करण्याचा हा उपक्रम आहे़ शासनानेही सामुहीक विवाह सोहळ्याला बळ दिले असून, समाज कल्याण विभागाकडे अशा सोहळ्यांसाठी अनुदान देण्याची योजनाही आहे़ ४जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विवाह सोहळ्यांसाठी शुभमंगल योजनाही सुरु केली आहे़ या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना लग्नासाठी मदत करण्याचा उपक्रम बँकेमार्फत गेल्या दोन वर्षांपासून राबविण्यात येत आहे़