शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

दुष्काळाच्या झळाने मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 19:42 IST

 मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे विभागात केवळ २५ टक्के जलसाठातीन आराखड्यांनुसार प्रशासन करणार काम

औरंगाबाद :  मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऊसतोड कामगारांनी तर मराठवाड्यातून स्थलांतर केलेच आहे. बीड, जालन्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, पैठण तालुक्यांतून ऊसतोडीसाठी स्थलांतर झाल्याची माहिती समोर येत आहे. 

पिण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी डिसेंबर ते मार्चपर्यंत आणि तेथून पुढे जूनपर्यंत नियोजन करणे. रोजगार उपलब्धतेचा आराखडा केला जात आहे. गावनिहाय, गटनिहाय, मंडळनिहाय चारा उपलब्धतेची माहिती संकलित करणे. या तीन टप्प्यांत प्रशासन काम करीत आहे. तसेच रोजगार हमी योजनेवर किती नागरिक काम करीत आहेत. किती नागरिकांना शेतावर व मनरेगासाठी काम देऊ शकतो. याचीही माहिती प्रशासन संकलित करीत आहे.

पाणी उपलब्ध आहे तोपर्यंत स्थलांतर होणार नाही. मात्र त्यानंतर स्थलांतर होऊ शकते. विभागात सर्व जलसाठ्यांत २५ टक्के साठा आहे. महसूल, ग्रामविकास, कृषी विभागाला दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. चाराटंचाईची परिस्थिती परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत कमी आहे. १३ लाख मेट्रिक टन चाऱ्याची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे. चाऱ्यासाठी पशुधनासह स्थलांतर होण्याची जास्त शक्यता आहे. औरंगाबाद जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्या वाढली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कामांंची संख्या आगामी काळात वाढू शकते. पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड परिसरातील रोहयोच्या कामांवर मजुरांचा टक्का वाढला आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायत हद्दीत ३ हजार १६९ मजूर ५९० कामांवर काम करीत आहेत. आठ महिने या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. रोजगारासाठी सर्वाधिक स्थलांतर होण्याची शक्यता आहे. 

विभागीय आयुक्तांची माहिती अशी...स्थलांतर किती प्रमाणात होत आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. किंबहुना त्याबाबत प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडून अहवालदेखील मागविलेले नाहीत. नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी विभागीय प्रशासन तीन टप्प्यांतील आराखड्यानुसार काम करणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी स्पष्ट केले आहे. दुष्काळामुळे मराठवाड्यात भीषण टंचाईग्रस्त परिस्थिती आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना देखील सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा आयुक्तांनी दिला.  

टॅग्स :Marathwadaमराठवाडाdroughtदुष्काळMigrationस्थलांतरण