शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

दुष्काळाच्या झळाने मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 19:42 IST

 मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे विभागात केवळ २५ टक्के जलसाठातीन आराखड्यांनुसार प्रशासन करणार काम

औरंगाबाद :  मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऊसतोड कामगारांनी तर मराठवाड्यातून स्थलांतर केलेच आहे. बीड, जालन्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, पैठण तालुक्यांतून ऊसतोडीसाठी स्थलांतर झाल्याची माहिती समोर येत आहे. 

पिण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी डिसेंबर ते मार्चपर्यंत आणि तेथून पुढे जूनपर्यंत नियोजन करणे. रोजगार उपलब्धतेचा आराखडा केला जात आहे. गावनिहाय, गटनिहाय, मंडळनिहाय चारा उपलब्धतेची माहिती संकलित करणे. या तीन टप्प्यांत प्रशासन काम करीत आहे. तसेच रोजगार हमी योजनेवर किती नागरिक काम करीत आहेत. किती नागरिकांना शेतावर व मनरेगासाठी काम देऊ शकतो. याचीही माहिती प्रशासन संकलित करीत आहे.

पाणी उपलब्ध आहे तोपर्यंत स्थलांतर होणार नाही. मात्र त्यानंतर स्थलांतर होऊ शकते. विभागात सर्व जलसाठ्यांत २५ टक्के साठा आहे. महसूल, ग्रामविकास, कृषी विभागाला दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. चाराटंचाईची परिस्थिती परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत कमी आहे. १३ लाख मेट्रिक टन चाऱ्याची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे. चाऱ्यासाठी पशुधनासह स्थलांतर होण्याची जास्त शक्यता आहे. औरंगाबाद जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्या वाढली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कामांंची संख्या आगामी काळात वाढू शकते. पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड परिसरातील रोहयोच्या कामांवर मजुरांचा टक्का वाढला आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायत हद्दीत ३ हजार १६९ मजूर ५९० कामांवर काम करीत आहेत. आठ महिने या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. रोजगारासाठी सर्वाधिक स्थलांतर होण्याची शक्यता आहे. 

विभागीय आयुक्तांची माहिती अशी...स्थलांतर किती प्रमाणात होत आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. किंबहुना त्याबाबत प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडून अहवालदेखील मागविलेले नाहीत. नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी विभागीय प्रशासन तीन टप्प्यांतील आराखड्यानुसार काम करणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी स्पष्ट केले आहे. दुष्काळामुळे मराठवाड्यात भीषण टंचाईग्रस्त परिस्थिती आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना देखील सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा आयुक्तांनी दिला.  

टॅग्स :Marathwadaमराठवाडाdroughtदुष्काळMigrationस्थलांतरण