शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

पशुधनाची संख्या घटल्याने शेणखतही महागले

By admin | Updated: June 9, 2014 00:09 IST

परंडा : तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात होता.

परंडा : तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात होता. त्यामुळे शेतीसाठीही शेणखताचा वापर होत होता. परंतु, गेल्या काही वर्षांत पशुपालन करण्यासाठी स्वतंत्र मजूर ठेवणे शक्य होत नसल्याने तसेच खर्चही वाढत असल्याने पशुधनाची संख्या कमी होत चालली आहे. पर्यायाने शेणखतही मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे यंदा शेणखताचे भाव चांगलेच वधारले आहेत. सध्या १ हजार ४०० रुपयाला एक ट्रॉली शेणखत विकले जात असून, वाहतुकीसाठीही अंतरानुसार ट्रॉलीधारकाकडून दर आकारला जात आहे. याशिवाय मजुरीचे अतिरिक्त पैसेही शेतकऱ्यांना मोजावे लागत आहे.पूर्वी घराघरात पशुधनाचा संभाळा केला जात असे. त्यामुळे शेणखत मुबलक प्रमाणात उपलब्ध होत होते. शेतीमध्ये याचा प्रचंड वापर होत होता. मात्र १९८५ च्या दशकात तालुक्यात हरितक्रांतीचे वारे वाहू लागल्याने शेतीचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीकोनातून शासन स्तरावर रासायनिक खताचे पाकीट शेतकऱ्यांना प्रायोगीक तत्वावर पुरवठा केले जाऊ लागले. यामुळे कालांतराने रासायनिक खतांचा वापर वाढला. उत्पादन वाढविण्याच्या स्पर्धेमध्ये शेतकरीही रासायनीक खताकडे आकर्षिक होत गेला. परंतु, याचा परिणाम जमिनीच्या पोतावर होऊ लागला होता. दरम्यान, गेल्या दशकात पर्यावरणवाद्यांनी या मुद्यावर जनजागृतीची मोहीम सुरु केली. शेवटच्या घटकापर्यतच्या शेतकऱ्याला सेंद्रीय खताविषयीचे महत्व पटवून देण्यात येऊ लागले. त्यामुळे गेल्या तीन-चार वर्षात शेतकरी पुन्हा सेंद्रीय शेतीकडे वळू लागला आहे. सेंद्रीय शेतीच्या भरवशावर शेती उत्पादन वाढवून त्यातून आलेला शेतमाल स्वाभिमानाने विकू लागले. यांना बाहेरच्या बाजारपेठेत जाण्याचीही अवशकता भासली नाही. ग्रामीण स्तरावर सेंद्रीय शेतीच्या पिकांना भाव मिळू लागला. शेणखतातून उत्पादीत केलेला माल, असे अभिमानाने सांगणारे शेतकरी दुकानावर दिसू लागले. त्यामुळे पुन्हा शेणखताला जुने वैभव प्राप्त झाले असल्याचे प्रगतशील शेतकरी बाळासाहेब पाटील म्हणाले. मात्र, शेणखताचा शोध घेण्यासाठी वाड्या-वस्त्यांवर जावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)तालुक्याच्या ग्रामीण भागात आता मोजक्याच शेतकऱ्यांकडे पशुधन आहे. हे शेतकरी दररोज जनावरांचे शेण तसेच मलमूत्र एका विशिष्ट ठिकाणी साठवण करतात. वर्षभर कुजलेले हे शेणखत खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतात फेकण्याचे काम केले जाते. मात्र, दिवसेंदिवस पशुधनात घट होत चालल्याने शेणखताचे भाव आता चांगलेच वधारले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे शेती नाही, असे पशुपालक आपल्याकडील खत इतरांना विकतात. परंडा, तालुक्यात जागेवर शेणखताची १४०० रुपये ट्रॉलीने यंदा विक्री होत आहे. शेणखताचे फायदेएक टन शेणखतातून ५.६ किलो नत्र, ३.५ किलो स्फुरद, ७.८ किलो पालाश, १ किलो गंधक, २०० ग्रॅम मगनीज, ८० ग्रॅम लोह, १५.६ ग्रॅम तांबे, २० ग्रॅम बोरॉन, २.३ ग्रॅम मॅलिब्डे नम ही घटकद्रवे मिळतात. या द्रव्यामुळे जमिनीची सुपिकता वाढून जमिनीतून सक्षम उत्पन्नाची निर्मिती होते व जमिनीचा क स वाढील लागतो.