लातूर : गेल्या तीन वर्षांपासून अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी पर्जन्यमानाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याची वेळ आली आहे. गतवर्षी १६ जूनपर्यंत सरासरी ७१़०० मिमी पाऊस झाला होता़ परंतु, यंदा मात्र त्यातही घट झाली असून, यावर्षी १६ जूनपर्यंत ७०़०९ मिमी पाऊस झाला आहे़ त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे़ लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून अवर्षणग्रस्त परिस्थिती आहे़ लातूर जिल्ह्यातील ५३ मंडळामध्ये जून २०१५ या कालावधीत १६ जूनपर्यंत लातूर ६२़१४, औसा ६८़७१, रेणापूर ७८़७५, उदगीर ९७़५६, अहमदपूर ४४़०, चाकूर ६३़८०, जळकोट ११३़५०, निलंगा ५८़१३, देवणी ८५़६७, शिरुर अनंतपाळ ४४़६७ असा एकूण ७१़६८ मिमी पाऊस झाला आहे़ तर यंदा १६ जूनपर्यंत लातूर ५०़८, औसा ६२़६, अहमदपूर ६७़७, निलंगा ८७़८, उदगीर ५५़९, चाकूर १०९़२, रेणापूर ५७़७, देवणी ५७़८, शिरुर अनंतपाळ १०१़४, जळकोट ८७़५ असा एकूण ७०़९ मिमी पाऊस झाला आहे़ गतवर्षीच्या तुलनेत हा पाऊस सध्यातरी कमी आहे़ पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा लागली आहे़
मृग नक्षत्राचा पाऊस यंदाही अपुराच
By admin | Updated: June 17, 2016 00:32 IST