शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘पदवीधर’ च्या आचारसंहितेमुळे कामकाज ठप्प

By admin | Updated: May 22, 2014 00:36 IST

हिंगोली : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणुकीची आचारसंहिता २१ मे पासून संपूर्ण मराठवाडाभर लागू झाली आहे.

हिंगोली : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणुकीची आचारसंहिता २१ मे पासून संपूर्ण मराठवाडाभर लागू झाली आहे. परिणामी पुन्हा एकदा सर्व विकास कामे ठप्प होणार आहेत. लोकसभेची आचारसंहिता ५ मार्च रोजी लागू झाल्यानंतर ती १७ मे रोजी संपुष्टात आली. त्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून ठप्प झालेली विकास कामे पुन्हा सुरू होतील, असे वाटप होते. मराठवाडा पदवीधर मतदार संघाची आचारसंहिता २५ मे नंतर लागू होईल, अशीही चर्चा होती; परंतु भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा कार्यक्रम आजच जाहीर केला. त्यामुळे आपोआपच निवडणुकीची आचारसंहिताही लागू झाली आहे. त्यानुसार २७ मे रोजी यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध होणार असून, ३ जून पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ४ रोजी आलेल्या अर्जांची छाणनी होणार असून, ६ जूनपर्यंत उमेदवारी परत घेता येणार आहे. २० जून रोजी पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होणार असून, २४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच अनेक विकास कामेही ठप्प होणार आहेत. याचा तात्काळ परिणाम बुधवारी दिसून आला. जिल्हा परिषदेत जलसंधारण समितीच्या बैठकीची औपचारिकता करावी लागली. त्यामध्ये कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. तसेच जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांच्या बदलीची प्रक्रिया स्थगित करण्यात आली. सकाळी १० च्या सुमारास जि. प. च्या ५ विभागातील बदली प्रक्रियेस समुपदेशनद्वारे प्रारंभ झाला. यावेळी सीईओ पी. व्ही. बनसोडे, अतिरिक्त सीईओ अशोक सिरसे, जि. प. अध्यक्षा मीनाक्षी बोंढारे, सभापती रंगराव कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती ढेरे आदींची उपस्थिती होती. महिला व बालकल्याण, अर्थ, पंचायत, ग्रामीण पाणी पुरवठा, बांधकाम या पाच विभागाची बदली प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. याच वेळी पदवीधरची आचारसंहिता लागू झाल्याचा निरोप प्रशासनाला मिळाला. त्यामुळे आहे तशी प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली. याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आचारसंहितेचा निरोप मिळण्यापूर्वी केलेल्या कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यासंदर्भात निवडणूक विभागाकडून मार्गदर्शन मागविण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतरच पुढील निर्णय होणार असल्याचे ते म्हणाले. आचारसंहिता लागू झाल्याने आता पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत होणार्‍या बैठकांवर बंधने आली असून, पदाधिकार्‍यांकडे असलेली शासकीय वाहने जिल्हा प्रशासन ताब्यात घेणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी) शिक्षकांच्या बदल्या आता जुलैमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पदवीधरची आचारसंहिता संपल्यानंतर होणार आहे. जिल्हा परिषदेकडे प्राथमिक पदवीधर व मुख्याध्यापक यांचे एकूण ३१ बदल्यांचे लेखी विनंती अर्ज आले असून, २४० प्राथमिक शिक्षकांचे बदल्यांचे विनंती अर्जही शिक्षण विभागाकडे आले आहेत. या विनंती बदल्या करण्यापूर्वी शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत अतिरिक्त ठरलेल्या पाचही तालुक्यातील शिक्षकांचे त्याच तालुक्यात समायोजन केले जाणार असून, त्यानंतर होणार्‍या रिक्त जागांवर बदल्यांची प्रक्रिया होणार आहे. शिक्षकांच्या तालुकांतर्गत प्रशासकीय बदल्या होणार की नाही? याचे चित्रही अद्याप स्पष्ट झालेले नाही. असे असले तरी ही सर्व प्रक्रिया जुलैमध्येच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.