शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

कारखानदारांसाठीचे कलम १२५ रद्द झाल्याने ग्रामपंचायतीला कर वसुलीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 20:21 IST

राज्य शासनाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये बदल करून कारखानदारांना कर सवलत देणारे कलम १२५ रद्द केले आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अंतर्गत शासनाच्या ३ डिसेंबर १९९९ च्या कर आकारणी अधिसूचनेनुसार कलम १२४ नुसार कारखान्यांना निवासी दराच्या दुप्पट दराने कर भरावा लागत होता.कलम १२५ नुसार कारखानदाराला कराच्या रकमेऐवजी ठोक अंशदान भरण्याची मुभा होती. यात कारखानदाराला विभागीय आयुक्तांच्या मान्यतेनुसार ५० टक्के करात सवलत मिळत होती.

- अशोक कांबळे  

वाळूज महानगर (औरंगाबाद ) : राज्य शासनाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये बदल करून कारखानदारांना कर सवलत देणारे कलम १२५ रद्द केले आहे. या निर्णयामुळे ग्रामपंचायतीला १०० टक्के कर वसुलीचा मार्ग मोकळा झाल्याने त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे वाळूज औद्योगिकनगरीतील ग्रामपंचायती आता आर्थिकदृष्ट्या चांगल्याच मालामाल होणार आहेत. 

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अंतर्गत शासनाच्या ३ डिसेंबर १९९९ च्या कर आकारणी अधिसूचनेनुसार कलम १२४ नुसार कारखान्यांना निवासी दराच्या दुप्पट दराने कर भरावा लागत होता. कलम १२५ नुसार कारखानदाराला कराच्या रकमेऐवजी ठोक अंशदान भरण्याची मुभा होती. यात कारखानदाराला विभागीय आयुक्तांच्या मान्यतेनुसार ५० टक्के करात सवलत मिळत होती.

करात सवलत देऊनही अनेक कारखानदार कर भरण्यास टाळाटाळ करीत असत.   कलम १२५ नुसार निवासी आणि कारखानदारांना सारखाच कर लागत असल्याने कलम १२५ रद्द करावे, अशी वाळूज महानगरातील ग्रामपंचायतींनी शासनाकडे मागणी केली होती. या अनुषंगाने ग्रामविकास प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांनी २८ जुलै २०१६ रोजी जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके व  रांजणगावचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी प्रकाश तुपे, वाळूजचे सुभाष लव्हाळे, जोगेश्वरीचे भीमराव भालेराव, घाणेगावचे बी. बी. गव्हाणे, वळदगावचे श्रीकांत पालवे यांची बैठक घेऊन चर्चा केली होती.

ग्रामपंचायतींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर शासनाने ३१ डिसेंबर २०१५ च्या अधिसूचनेनुसार करामध्ये सुधारणा करून ग्रामपंचायत आणि कारखानदार यांच्यात समन्वय साधला. नवीन अधिसूचनेनुसार कारखान्यांना निवासी दराच्या २० टक्के वाढीव कराची तरतूद केली. दरम्यानच्या काळात शासनाने कलम १२५ वर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून हिवाळी अधिवेशनात हे कलम रद्द करण्याचा निर्णय  घेतला. शासनाने १५ फेब्रुवारी रोजी अधिसूचना काढून कारखानदाराला करात सवलत मिळणारे कलम १२५ रद्द केले आहे. या निर्णयामुळे वाळूजचे सरपंच सुभाष तुपे, रांजणगावच्या मंगल लोहकरे, जोगेश्वरीचे सोनू लोहकरे, घाणेगावच्या मीना काळवणे, वळदगावचे राजेंद्र घोडके, पंढरपूरचे अक्तर शेख यांनी समाधान व्यक्त केले आहे.

ग्रामपंचायतीचा कर वसुलीचा मार्ग मोकळाशासनाने कलम १२५ रद्द केल्यामुळे कारखान्यांकडून पूर्णपणे कर मिळणार आहे. आता  ग्रामपंचायतीचा कर वसुलीचा मार्ग मोकळा झाला आहे, असे रांजणगाव ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी प्रकाश तुपे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टोलवाटोलवीला चापयापूर्वी कारखाने कलम १२५ चा आधार घेत. यात कारखानदाराला आपला अहवाल अगोदर स्थानिक ग्रामपंचायतींकडे द्यावा लागत असे. ग्रामपंचायतींकडून गटविकास अधिकारी व नंतर जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे हा अहवाल जात असे. जि. प. स्थायी समिती आपला अहवाल विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवीत. स्थायी समितीच्या अहवालावर विभागीय आयुक्त निर्णय घेत. अनेक वेळा हा अहवाल अधिकार्‍यांकडेच पडून राहत असे. ही प्रक्रिया खूपच किचकट असल्याने कारखान्याकडे वर्षानुवर्षे कराची रक्कम थकीत राही. आता विनाअडथळा कारखान्यांकडून कराची संपूर्ण रक्कम मिळणार असल्याने ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढणार आहे. 

टॅग्स :TaxकरAurangabadऔरंगाबाद