शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
4
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
5
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
7
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
8
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
9
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
10
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
11
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
12
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
13
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
14
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
15
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
16
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
17
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
18
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
19
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
20
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
Daily Top 2Weekly Top 5

कारखानदारांसाठीचे कलम १२५ रद्द झाल्याने ग्रामपंचायतीला कर वसुलीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 20:21 IST

राज्य शासनाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये बदल करून कारखानदारांना कर सवलत देणारे कलम १२५ रद्द केले आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अंतर्गत शासनाच्या ३ डिसेंबर १९९९ च्या कर आकारणी अधिसूचनेनुसार कलम १२४ नुसार कारखान्यांना निवासी दराच्या दुप्पट दराने कर भरावा लागत होता.कलम १२५ नुसार कारखानदाराला कराच्या रकमेऐवजी ठोक अंशदान भरण्याची मुभा होती. यात कारखानदाराला विभागीय आयुक्तांच्या मान्यतेनुसार ५० टक्के करात सवलत मिळत होती.

- अशोक कांबळे  

वाळूज महानगर (औरंगाबाद ) : राज्य शासनाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये बदल करून कारखानदारांना कर सवलत देणारे कलम १२५ रद्द केले आहे. या निर्णयामुळे ग्रामपंचायतीला १०० टक्के कर वसुलीचा मार्ग मोकळा झाल्याने त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे वाळूज औद्योगिकनगरीतील ग्रामपंचायती आता आर्थिकदृष्ट्या चांगल्याच मालामाल होणार आहेत. 

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अंतर्गत शासनाच्या ३ डिसेंबर १९९९ च्या कर आकारणी अधिसूचनेनुसार कलम १२४ नुसार कारखान्यांना निवासी दराच्या दुप्पट दराने कर भरावा लागत होता. कलम १२५ नुसार कारखानदाराला कराच्या रकमेऐवजी ठोक अंशदान भरण्याची मुभा होती. यात कारखानदाराला विभागीय आयुक्तांच्या मान्यतेनुसार ५० टक्के करात सवलत मिळत होती.

करात सवलत देऊनही अनेक कारखानदार कर भरण्यास टाळाटाळ करीत असत.   कलम १२५ नुसार निवासी आणि कारखानदारांना सारखाच कर लागत असल्याने कलम १२५ रद्द करावे, अशी वाळूज महानगरातील ग्रामपंचायतींनी शासनाकडे मागणी केली होती. या अनुषंगाने ग्रामविकास प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांनी २८ जुलै २०१६ रोजी जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके व  रांजणगावचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी प्रकाश तुपे, वाळूजचे सुभाष लव्हाळे, जोगेश्वरीचे भीमराव भालेराव, घाणेगावचे बी. बी. गव्हाणे, वळदगावचे श्रीकांत पालवे यांची बैठक घेऊन चर्चा केली होती.

ग्रामपंचायतींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर शासनाने ३१ डिसेंबर २०१५ च्या अधिसूचनेनुसार करामध्ये सुधारणा करून ग्रामपंचायत आणि कारखानदार यांच्यात समन्वय साधला. नवीन अधिसूचनेनुसार कारखान्यांना निवासी दराच्या २० टक्के वाढीव कराची तरतूद केली. दरम्यानच्या काळात शासनाने कलम १२५ वर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून हिवाळी अधिवेशनात हे कलम रद्द करण्याचा निर्णय  घेतला. शासनाने १५ फेब्रुवारी रोजी अधिसूचना काढून कारखानदाराला करात सवलत मिळणारे कलम १२५ रद्द केले आहे. या निर्णयामुळे वाळूजचे सरपंच सुभाष तुपे, रांजणगावच्या मंगल लोहकरे, जोगेश्वरीचे सोनू लोहकरे, घाणेगावच्या मीना काळवणे, वळदगावचे राजेंद्र घोडके, पंढरपूरचे अक्तर शेख यांनी समाधान व्यक्त केले आहे.

ग्रामपंचायतीचा कर वसुलीचा मार्ग मोकळाशासनाने कलम १२५ रद्द केल्यामुळे कारखान्यांकडून पूर्णपणे कर मिळणार आहे. आता  ग्रामपंचायतीचा कर वसुलीचा मार्ग मोकळा झाला आहे, असे रांजणगाव ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी प्रकाश तुपे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टोलवाटोलवीला चापयापूर्वी कारखाने कलम १२५ चा आधार घेत. यात कारखानदाराला आपला अहवाल अगोदर स्थानिक ग्रामपंचायतींकडे द्यावा लागत असे. ग्रामपंचायतींकडून गटविकास अधिकारी व नंतर जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे हा अहवाल जात असे. जि. प. स्थायी समिती आपला अहवाल विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवीत. स्थायी समितीच्या अहवालावर विभागीय आयुक्त निर्णय घेत. अनेक वेळा हा अहवाल अधिकार्‍यांकडेच पडून राहत असे. ही प्रक्रिया खूपच किचकट असल्याने कारखान्याकडे वर्षानुवर्षे कराची रक्कम थकीत राही. आता विनाअडथळा कारखान्यांकडून कराची संपूर्ण रक्कम मिळणार असल्याने ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढणार आहे. 

टॅग्स :TaxकरAurangabadऔरंगाबाद