शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

पावसाअभावी किनवट तालुक्यावर दुष्काळ

By admin | Updated: August 3, 2014 01:13 IST

किनवट : जुलैअखेर यंदाच्या पावसाळ्यात केवळ १३९ मि़मी़ इतक्या पावसाची नोंद झाली आहे़ गतवर्षी ही सरासरी ८०२ मि़मी़ इतकी होती़ पावसाची सरासरी पाहता तालुक्यात भयावह परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे़

किनवट : जुलैअखेर यंदाच्या पावसाळ्यात केवळ १३९ मि़मी़ इतक्या पावसाची नोंद झाली आहे़ गतवर्षी ही सरासरी ८०२ मि़मी़ इतकी होती़ पावसाची सरासरी पाहता तालुक्यात भयावह परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे़पावसाळा लांबल्याने नव्हे लांबतच गेल्याने तालुक्यावर कोरड्या दुष्काळाचे गडद संकट उभे टाकले आहे़ ७१ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाल्याची नोंद पाहता खरीप हंगामात दुबार-तिबार पेरणी करावी लागल्याने तालुक्यातील शेतकरी कोरड्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या सावटाने हवालदिल झाला आहे़ खरीप हंगामात पेरणीसाठी ७९ हजार ७०० हेक्टर क्षेत्र सर्वसाधारण लागवडीखाली असताना ३१ जुलैअखेर प्रत्यक्षात ७१ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली़ पाऊस लांबल्याने या दरम्यान जसजसा पाऊस पडेल तसतशी शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी केली़ पण मध्येच पाऊस दडी मारू लागल्याने दुबार, तिबार पेरणी करूनही उगवण न झाल्याने महागामोलाचे बियाणे वाया गेले़ पेरलेल्या बिण्यांची उगवणक्षमता म्हणावी तशी नसल्याने पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांचे साधारणत: दहा बॅगपैकी चार बॅग बियाण्यांची उगवण झाली़ सहा बॅग वाया गेल्या़ मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांचे तर मोठे नुकसान होवून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे़जुलैअखेर ५७५ मि़मी़ इतका पाऊस व्हायला पाहिजे असताना यंदा जुलैअखेर १३९ मि़मी़ इतक्या पावसाची नोंद झाली़ गतवर्षी ही नोंद ८०२ मि़मी़ इतकी होती़ यावर्षीच्या पावसाळ्यातील नोंद पाहता अवर्षणाचे संकट तालुक्यावर उभे टाकल्याची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे़ गतवर्षीच्या पावसाचा उच्चांक व यावर्षीचा निचांक पाहता नदी, नाले, तलाव कधी नव्हे, ते कोरड्या अवस्थेत जुलै महिन्यात आहे़ भूगर्भही खोल गेला नव्हे, पार आटला आहे़पांढरे सोने म्हणविल्या जाणाऱ्या कापूस या नगदी पिकाची पेरणी ४८ हजार हेक्टर क्षेत्रात झाली आहे़ सोयाबीन १३ हजार २०० हेक्टर क्षेत्रात, तूर ५ हजार ५०० हेक्टर, ज्वारी १ हजार ३०० हेक्टर व इतर पिकांची ३ हजार २०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे़ दरवर्षी ३१ जुलैअखेर कापूस पिकाला खताची दोन मात्रा होते़ निंदण उगवणे ही कामेही प्रगतीपथावर असते़ पण यंदा आता कुठे बियाण्याची उगवण होताना दिसत आहे़ ओलिताची सोय नसल्याने कोरडवाहू शेतीवरच अवलंबून असलेला शेतकरी पुरता नागवला आहे़ कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर ही पिके जमिनीला भिडूनच असल्याने एकूणच तालुक्यातील विदारक चित्र पाहता तालुक्यावर कोरड्या दुष्काळाचे संकट कायमच आहे़ यापुढे पाऊस बरसला तरी खरीप हंगामाच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे़ उसनवारी, बँकेचे पीककर्ज काढून केलेली पेरणी एकदा, दोनदा नव्हे तीनदा वाया गेल्याने कर्जाची परतफेड करावी, कशी ही चिंता शेतकऱ्यांना भेडसावू लागली आहे़पडावयाचा पाऊस व पडलेला पाऊस तसेच गतवर्षीचा पाऊस पाहता शासनाने किनवट तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून पीककर्ज माफ करावे व दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे चालावा यासाठी शासनाने भरीव मदत करून हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे़ (वार्ताहर)