शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी किनवट तालुक्यावर दुष्काळ

By admin | Updated: August 3, 2014 01:13 IST

किनवट : जुलैअखेर यंदाच्या पावसाळ्यात केवळ १३९ मि़मी़ इतक्या पावसाची नोंद झाली आहे़ गतवर्षी ही सरासरी ८०२ मि़मी़ इतकी होती़ पावसाची सरासरी पाहता तालुक्यात भयावह परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे़

किनवट : जुलैअखेर यंदाच्या पावसाळ्यात केवळ १३९ मि़मी़ इतक्या पावसाची नोंद झाली आहे़ गतवर्षी ही सरासरी ८०२ मि़मी़ इतकी होती़ पावसाची सरासरी पाहता तालुक्यात भयावह परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे़पावसाळा लांबल्याने नव्हे लांबतच गेल्याने तालुक्यावर कोरड्या दुष्काळाचे गडद संकट उभे टाकले आहे़ ७१ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाल्याची नोंद पाहता खरीप हंगामात दुबार-तिबार पेरणी करावी लागल्याने तालुक्यातील शेतकरी कोरड्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या सावटाने हवालदिल झाला आहे़ खरीप हंगामात पेरणीसाठी ७९ हजार ७०० हेक्टर क्षेत्र सर्वसाधारण लागवडीखाली असताना ३१ जुलैअखेर प्रत्यक्षात ७१ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली़ पाऊस लांबल्याने या दरम्यान जसजसा पाऊस पडेल तसतशी शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी केली़ पण मध्येच पाऊस दडी मारू लागल्याने दुबार, तिबार पेरणी करूनही उगवण न झाल्याने महागामोलाचे बियाणे वाया गेले़ पेरलेल्या बिण्यांची उगवणक्षमता म्हणावी तशी नसल्याने पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांचे साधारणत: दहा बॅगपैकी चार बॅग बियाण्यांची उगवण झाली़ सहा बॅग वाया गेल्या़ मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांचे तर मोठे नुकसान होवून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे़जुलैअखेर ५७५ मि़मी़ इतका पाऊस व्हायला पाहिजे असताना यंदा जुलैअखेर १३९ मि़मी़ इतक्या पावसाची नोंद झाली़ गतवर्षी ही नोंद ८०२ मि़मी़ इतकी होती़ यावर्षीच्या पावसाळ्यातील नोंद पाहता अवर्षणाचे संकट तालुक्यावर उभे टाकल्याची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे़ गतवर्षीच्या पावसाचा उच्चांक व यावर्षीचा निचांक पाहता नदी, नाले, तलाव कधी नव्हे, ते कोरड्या अवस्थेत जुलै महिन्यात आहे़ भूगर्भही खोल गेला नव्हे, पार आटला आहे़पांढरे सोने म्हणविल्या जाणाऱ्या कापूस या नगदी पिकाची पेरणी ४८ हजार हेक्टर क्षेत्रात झाली आहे़ सोयाबीन १३ हजार २०० हेक्टर क्षेत्रात, तूर ५ हजार ५०० हेक्टर, ज्वारी १ हजार ३०० हेक्टर व इतर पिकांची ३ हजार २०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे़ दरवर्षी ३१ जुलैअखेर कापूस पिकाला खताची दोन मात्रा होते़ निंदण उगवणे ही कामेही प्रगतीपथावर असते़ पण यंदा आता कुठे बियाण्याची उगवण होताना दिसत आहे़ ओलिताची सोय नसल्याने कोरडवाहू शेतीवरच अवलंबून असलेला शेतकरी पुरता नागवला आहे़ कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर ही पिके जमिनीला भिडूनच असल्याने एकूणच तालुक्यातील विदारक चित्र पाहता तालुक्यावर कोरड्या दुष्काळाचे संकट कायमच आहे़ यापुढे पाऊस बरसला तरी खरीप हंगामाच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे़ उसनवारी, बँकेचे पीककर्ज काढून केलेली पेरणी एकदा, दोनदा नव्हे तीनदा वाया गेल्याने कर्जाची परतफेड करावी, कशी ही चिंता शेतकऱ्यांना भेडसावू लागली आहे़पडावयाचा पाऊस व पडलेला पाऊस तसेच गतवर्षीचा पाऊस पाहता शासनाने किनवट तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून पीककर्ज माफ करावे व दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे चालावा यासाठी शासनाने भरीव मदत करून हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे़ (वार्ताहर)