शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
3
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
4
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
7
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
8
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
9
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
10
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
11
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
12
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
13
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
14
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
15
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
16
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
17
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
18
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
19
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
20
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

पावसाअभावी किनवट तालुक्यावर दुष्काळ

By admin | Updated: August 3, 2014 01:13 IST

किनवट : जुलैअखेर यंदाच्या पावसाळ्यात केवळ १३९ मि़मी़ इतक्या पावसाची नोंद झाली आहे़ गतवर्षी ही सरासरी ८०२ मि़मी़ इतकी होती़ पावसाची सरासरी पाहता तालुक्यात भयावह परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे़

किनवट : जुलैअखेर यंदाच्या पावसाळ्यात केवळ १३९ मि़मी़ इतक्या पावसाची नोंद झाली आहे़ गतवर्षी ही सरासरी ८०२ मि़मी़ इतकी होती़ पावसाची सरासरी पाहता तालुक्यात भयावह परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे़पावसाळा लांबल्याने नव्हे लांबतच गेल्याने तालुक्यावर कोरड्या दुष्काळाचे गडद संकट उभे टाकले आहे़ ७१ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाल्याची नोंद पाहता खरीप हंगामात दुबार-तिबार पेरणी करावी लागल्याने तालुक्यातील शेतकरी कोरड्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या सावटाने हवालदिल झाला आहे़ खरीप हंगामात पेरणीसाठी ७९ हजार ७०० हेक्टर क्षेत्र सर्वसाधारण लागवडीखाली असताना ३१ जुलैअखेर प्रत्यक्षात ७१ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली़ पाऊस लांबल्याने या दरम्यान जसजसा पाऊस पडेल तसतशी शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी केली़ पण मध्येच पाऊस दडी मारू लागल्याने दुबार, तिबार पेरणी करूनही उगवण न झाल्याने महागामोलाचे बियाणे वाया गेले़ पेरलेल्या बिण्यांची उगवणक्षमता म्हणावी तशी नसल्याने पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांचे साधारणत: दहा बॅगपैकी चार बॅग बियाण्यांची उगवण झाली़ सहा बॅग वाया गेल्या़ मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांचे तर मोठे नुकसान होवून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे़जुलैअखेर ५७५ मि़मी़ इतका पाऊस व्हायला पाहिजे असताना यंदा जुलैअखेर १३९ मि़मी़ इतक्या पावसाची नोंद झाली़ गतवर्षी ही नोंद ८०२ मि़मी़ इतकी होती़ यावर्षीच्या पावसाळ्यातील नोंद पाहता अवर्षणाचे संकट तालुक्यावर उभे टाकल्याची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे़ गतवर्षीच्या पावसाचा उच्चांक व यावर्षीचा निचांक पाहता नदी, नाले, तलाव कधी नव्हे, ते कोरड्या अवस्थेत जुलै महिन्यात आहे़ भूगर्भही खोल गेला नव्हे, पार आटला आहे़पांढरे सोने म्हणविल्या जाणाऱ्या कापूस या नगदी पिकाची पेरणी ४८ हजार हेक्टर क्षेत्रात झाली आहे़ सोयाबीन १३ हजार २०० हेक्टर क्षेत्रात, तूर ५ हजार ५०० हेक्टर, ज्वारी १ हजार ३०० हेक्टर व इतर पिकांची ३ हजार २०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे़ दरवर्षी ३१ जुलैअखेर कापूस पिकाला खताची दोन मात्रा होते़ निंदण उगवणे ही कामेही प्रगतीपथावर असते़ पण यंदा आता कुठे बियाण्याची उगवण होताना दिसत आहे़ ओलिताची सोय नसल्याने कोरडवाहू शेतीवरच अवलंबून असलेला शेतकरी पुरता नागवला आहे़ कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर ही पिके जमिनीला भिडूनच असल्याने एकूणच तालुक्यातील विदारक चित्र पाहता तालुक्यावर कोरड्या दुष्काळाचे संकट कायमच आहे़ यापुढे पाऊस बरसला तरी खरीप हंगामाच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे़ उसनवारी, बँकेचे पीककर्ज काढून केलेली पेरणी एकदा, दोनदा नव्हे तीनदा वाया गेल्याने कर्जाची परतफेड करावी, कशी ही चिंता शेतकऱ्यांना भेडसावू लागली आहे़पडावयाचा पाऊस व पडलेला पाऊस तसेच गतवर्षीचा पाऊस पाहता शासनाने किनवट तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून पीककर्ज माफ करावे व दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे चालावा यासाठी शासनाने भरीव मदत करून हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे़ (वार्ताहर)