शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

दीड हजार शेतकऱ्यांना ठिबक अनुदानाचा लाभ

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

लातूर : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत अनुदान मंजूर झालेल्या लातूर जिल्ह्यातील १ हजार ६९६ शेतकऱ्यांना दुष्काळात आधार मिळाला आहे़

लातूर : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत अनुदान मंजूर झालेल्या लातूर जिल्ह्यातील १ हजार ६९६ शेतकऱ्यांना दुष्काळात आधार मिळाला आहे़ जवळपास ५ कोटी ६४ लाख रुपये शासनाने जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केले आहेत़ लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू असून चार दिवसांत संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम दिली जाणार आहे़ लातूर जिल्ह्यातील ३ हजार ४२८ शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनच्या सेटसाठी कृषी विभागाकडे अर्ज दाखल केले होते़ त्यापैकी पूर्वसंमती मिळालेल्या १७८१ अर्जापैकी १६९६ अर्ज अनुदानास पात्र झाले आहे़ पात्र लाभार्थ्यांसाठी ५ कोटी ६४ लाख ५७ हजारांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे़ कृषी विभागाकडून लाभार्थ्यांच्या अपडेट याद्या करण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे़ चार दिवसांमध्ये १६९६ लाभार्थ्यांच्या खात्यावर सदरील अनुदान जमा होणार आहे़ दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना ठिबकच्या अनुदानामुळे काहीअंशी का होईना दिलासा मिळाला आहे़लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे़ त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत फळबाग धारकांना व ऊसाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना अशा परिस्थितीतही आपले पीक कायम ठेवता यावे यासाठी शासनाने ठिबक सिंचनची योजना गेल्या अनेक वर्षांपासून सुरु केली आहे़ या योजनेचा लाभ घेण्यासाठी २०१५-१६ मध्ये ४ हजार ३२८ जणांनी अर्ज केले होते़ त्यापैकी अहमदपूर तालुक्यातील ११६, औसा ३७५, चाकूर २२४, देवणी ६९, जळकोट ४०, लातूर २५९, निलंगा २०८, रेणापूर १२६, शिरुर अनंतपाळ ७२, उदगीर १०६ अशा एकूण १ हजार ६९६ अर्ज अनुदानासाठी पात्र ठरले आहेत़ या शेतकरी लाभार्थ्यांनी दुष्काळी परिस्थितीत आधार मिळावा यासाठी शासनाकडून २०१५-१६ साठी ५ कोटी ६४ लाख ५७ हजार रुपयांचे अनुदान जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहे़ त्यांनी हे अनुदान संबंधीत बँकेच्या शाखेकडे अनुदान जमा करण्यासाठी लाभार्थ्यांच्या याद्या अपडेट करण्याचे काम सुरु केले आहे़ उर्वरीत १ हजार ४२९ लाभार्थ्यांचे अनुदान मात्र उर्वरीत बजेट आल्यानंतरच संबंधीत शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे़