शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पानतावणे सरांची विद्यापीठातील ती २० वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 10:23 IST

मराठी साहित्याचे समीक्षक, लेखक, विचारवंत अशी विविध नामाभिधान लागलेले पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागात चौथ्या क्रमांकाच्या एकाच खोलीत अध्यापनाची २० वर्षे घालवली. याच खोलीत ज्ञानाचा आणि ज्ञानदानाचा झरा अविरतपणे सुरू होता. याविषयीच्या भावना मराठी विभागातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

ठळक मुद्देअध्यापन : मराठी विभागातील एकाच केबिनमध्ये अभ्यास, मनन आणि चिंतन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठी साहित्याचे समीक्षक, लेखक, विचारवंत अशी विविध नामाभिधान लागलेले पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागात चौथ्या क्रमांकाच्या एकाच खोलीत अध्यापनाची २० वर्षे घालवली. याच खोलीत ज्ञानाचा आणि ज्ञानदानाचा झरा अविरतपणे सुरू होता. याविषयीच्या भावना मराठी विभागातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.विद्यापीठातील मराठी विभागात ८ जून १९७७ रोजी प्रा. गंगाधर पानतावणे यांची सहायक प्राध्यापक म्हणून निवड झाली. त्यापूर्वी नागसेनवनातील मिलिंद विज्ञान महाविद्यालयात १९७२ पासून अध्यापनाचे कार्य केल्याचे मिलिंद विज्ञानचे प्राचार्य डॉ. राठोड यांनी सांगितले.

मराठी विभागात डॉ. पानतावणे यांना चौथ्या क्रमांकाची खोली मिळाली होती. या खोलीतच त्यांनी ८ जून १९७७ ते ३० जून १९९७ पर्यंत कार्य केले. १९९५ ते ९७ या कार्यकाळात त्यांनी मराठी विभागाचे प्रमुखपद भूषविले. या कार्यकाळातही त्यांचे काम याच खोलीतून होत असे. विभागप्रमुखांच्या खोलीत कामानिमित्ताने बसत. उर्वरित वेळी अभ्यास, चिंतन, वाचन करण्यासाठी चौथ्या क्रमांकाच्या खोलीचाच वापर करीत होते. डॉ. पानतावणे यांना कोणताही विषय वर्ज्य नव्हता. मराठीच्या शिक्षकांनी सर्व प्रकारचे साहित्य प्रकार, प्रवाहाच्या विषयात पारंगत असावे, असे त्यांचे मत होते. कारण विद्यार्थ्यांना ज्ञान देताना कोणत्याही प्रकारचा प्रश्न विद्यार्थ्यांकडून येऊ शकतो. त्याची तयारी अध्यापकाने केलीच पाहिजे, असाही नियम त्यांनी अध्यापन करताना पाळला.डॉ. पानतावणे सर मराठी विभागात वैचारिक वाङ्मय शिकवायचे. यात प्रामुख्याने फुले-शाहू-आंबेडकर या विचारांचा समावेश होता. दलित साहित्याचे भाष्यकार असतानाही ज्ञानेश्वरी हा विषय अप्रतिम शिकवत होते. त्यांच्या तासाला विद्यार्थी विषय नसला तरीही बसत. त्यांच्या तोंडून एकदा विषय ऐकला की, पुन्हा त्यावर अभ्यासही करावा लागत नसे, अशी माहिती त्यांचे विद्यार्थी राहिलेले डॉ. दासू वैद्य यांनी दिली.

टॅग्स :Asmitadarsh Movementअस्मितादर्श चळवळMarathwadaमराठवाडाDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादDr.Gangadhar Pantawaneडॉ. गंगधर पानतावणे