शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

पानतावणे सरांची विद्यापीठातील ती २० वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 10:23 IST

मराठी साहित्याचे समीक्षक, लेखक, विचारवंत अशी विविध नामाभिधान लागलेले पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागात चौथ्या क्रमांकाच्या एकाच खोलीत अध्यापनाची २० वर्षे घालवली. याच खोलीत ज्ञानाचा आणि ज्ञानदानाचा झरा अविरतपणे सुरू होता. याविषयीच्या भावना मराठी विभागातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

ठळक मुद्देअध्यापन : मराठी विभागातील एकाच केबिनमध्ये अभ्यास, मनन आणि चिंतन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठी साहित्याचे समीक्षक, लेखक, विचारवंत अशी विविध नामाभिधान लागलेले पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागात चौथ्या क्रमांकाच्या एकाच खोलीत अध्यापनाची २० वर्षे घालवली. याच खोलीत ज्ञानाचा आणि ज्ञानदानाचा झरा अविरतपणे सुरू होता. याविषयीच्या भावना मराठी विभागातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.विद्यापीठातील मराठी विभागात ८ जून १९७७ रोजी प्रा. गंगाधर पानतावणे यांची सहायक प्राध्यापक म्हणून निवड झाली. त्यापूर्वी नागसेनवनातील मिलिंद विज्ञान महाविद्यालयात १९७२ पासून अध्यापनाचे कार्य केल्याचे मिलिंद विज्ञानचे प्राचार्य डॉ. राठोड यांनी सांगितले.

मराठी विभागात डॉ. पानतावणे यांना चौथ्या क्रमांकाची खोली मिळाली होती. या खोलीतच त्यांनी ८ जून १९७७ ते ३० जून १९९७ पर्यंत कार्य केले. १९९५ ते ९७ या कार्यकाळात त्यांनी मराठी विभागाचे प्रमुखपद भूषविले. या कार्यकाळातही त्यांचे काम याच खोलीतून होत असे. विभागप्रमुखांच्या खोलीत कामानिमित्ताने बसत. उर्वरित वेळी अभ्यास, चिंतन, वाचन करण्यासाठी चौथ्या क्रमांकाच्या खोलीचाच वापर करीत होते. डॉ. पानतावणे यांना कोणताही विषय वर्ज्य नव्हता. मराठीच्या शिक्षकांनी सर्व प्रकारचे साहित्य प्रकार, प्रवाहाच्या विषयात पारंगत असावे, असे त्यांचे मत होते. कारण विद्यार्थ्यांना ज्ञान देताना कोणत्याही प्रकारचा प्रश्न विद्यार्थ्यांकडून येऊ शकतो. त्याची तयारी अध्यापकाने केलीच पाहिजे, असाही नियम त्यांनी अध्यापन करताना पाळला.डॉ. पानतावणे सर मराठी विभागात वैचारिक वाङ्मय शिकवायचे. यात प्रामुख्याने फुले-शाहू-आंबेडकर या विचारांचा समावेश होता. दलित साहित्याचे भाष्यकार असतानाही ज्ञानेश्वरी हा विषय अप्रतिम शिकवत होते. त्यांच्या तासाला विद्यार्थी विषय नसला तरीही बसत. त्यांच्या तोंडून एकदा विषय ऐकला की, पुन्हा त्यावर अभ्यासही करावा लागत नसे, अशी माहिती त्यांचे विद्यार्थी राहिलेले डॉ. दासू वैद्य यांनी दिली.

टॅग्स :Asmitadarsh Movementअस्मितादर्श चळवळMarathwadaमराठवाडाDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादDr.Gangadhar Pantawaneडॉ. गंगधर पानतावणे