शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

औट्रम घाटातील बोगद्याच्या ‘डीपीआर’चे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 19:23 IST

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, चाळीसगावजवळ औट्रम घाटात ५ कि़मी. अंतराच्या टनेलचे काम हाती घेण्यात येणार आहे.

औरंगाबाद : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, चाळीसगावजवळ औट्रम घाटात ५ कि़मी. अंतराच्या टनेलचे काम हाती घेण्यात येणार आहे. व्हायाबिलिटी अहवालानंतर याचा कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. मार्चपर्यंत याचा अहवाल येण्याची शक्यता असून, त्यानंतर याच्या कामाचा प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ चे काम गत काही वर्षांपासून सुरू आहे. बहुतांश ठिकाणी भूसंपादन पूर्ण झाले असून, काम प्रगतिपथावर आहे. चाळीसगाव परिसरात घाट असल्याने येथे ५ कि़मी. अंतराचा बोगदा तयार करण्याचे प्रस्तावित होते. या कामाला जवळपास ५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रस्तावाची वस्तुनिष्ठता तपासण्याचे आदेश संबंधित अभियंत्यांना देण्यात आले. याचा सकारात्मक अहवाल प्राप्त झाल्यानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी हिरवा कंदिल दाखवला. ‘एम्बर्ग’ या एजन्सीला औट्रम घाट टनेलच्या कामाचा डीपीआर तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. आगामी मार्चपर्यंत डीपीआरचे काम होईल. त्यानंतर  कामाचा प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल.

तीन पर्यायांवर विचार सुरूटनेलच्या कामाचे कंत्राट बीओटी, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अथवा हायब्रीड अ‍ॅन्युटी पद्धतीवर दिले जावे, यावर डीपीआर अहवाल प्राप्त झाल्यानंतर निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

बारकाईने अभ्यास केला जात आहेऔट्रम घाटातील ५ कि़मी. अंतर असलेल्या या टनेलचे काम दर्जेदार व्हावे, यासाठी अत्यंत बारकाईने याचा अभ्यास केला जात आहे. मार्चमध्ये डीपीआर तयार होईल त्यानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडे या कामाचा प्रस्ताव पाठविला जाईल. - अजय गाडेकर, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, विभाग औरंगाबाद

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्गroad safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग