शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

शिक्षकाची नोकरी नको रे बाबा; डीएडकडे विद्यार्थ्यांची पाठ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:02 IST

दहा वर्षांपूर्वी प्रवेशासाठी चढाओढ : आता विद्यार्थी मिळणे झाले अवघड --- औरंगाबाद : अनेक वर्षांपासून शिक्षकांची भरत न झाल्याने ...

दहा वर्षांपूर्वी प्रवेशासाठी चढाओढ : आता विद्यार्थी मिळणे झाले अवघड

---

औरंगाबाद : अनेक वर्षांपासून शिक्षकांची भरत न झाल्याने डीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र राज्यभर आहे. जिल्ह्यात ३४ डीएड महाविद्यालयांत २ हजार ३०० प्रवेश क्षमता आहे. त्यासाठी पार पडलेल्या पहिल्या प्रवेश फेरीत केवळ ७०७ अर्ज आले. त्यामुळे दोन तृतीयांश जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. खाजगी शाळांत मिळणारे तुटपुंजे मानधन आणि दुरापास्त झालेल्या सरकारी शाळांतील नोकरीमुळे अलीकडे शिक्षकाची नोकरी नको रे बाबा, म्हणत डीएडकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे.

जिल्ह्यात २०१० पर्यंत ९० महाविद्यालये कार्यरत होती. विद्यार्थ्यांनी डीएडकडे पाठ फिरवायला सुरुवात केली. त्यामुळे कालांतराने अनेक महाविद्यालये बंद पडत गेली, तर काही महाविद्यालयांनी प्रवेश बंद केल्याने सध्या १ अनुदानित, ३ शासकीय आणि ३० खाजगी डीएड महाविद्यालये सुरू आहेत. २००० ते २०१० हा कालखंड डीएड महाविद्यालयांसाठी सुवर्ण काळ होता. गुणवत्तेवर आधारित प्रवेश क्षमतेत बहुतांश वेळी बारावी विज्ञान शाखेत चांगले गुण मिळवलेले विद्यार्थी डीएड करण्याचा आग्रह धरत. मात्र, सरकारी शाळांतील शिक्षक भरती होत नाही. शिवाय खाजगी शाळांत दिले जाणारे तुटपुंजे वेतन लक्षात घेऊन विद्यार्थी रोजगार पूरक अभ्यासक्रमांना आता प्राधान्य देत आहेत.

---

जिल्ह्यातील डीएड कॉलेज -३४

एकूण जागा -२३००

आलेले अर्ज -७०७

---

नोकरीची हमी नाही !

डीएड, बीएड करून नोकरी हमखास मिळेल त्याची हमी नाही. शासकीय नोकर भरतीला लागलेला खो आणि अनुदानित शाळांत नोकरी मिळवण्यासाठी मोजावे लागणारे पैसे, यापेक्षा व्यवसाय किंवा इतर नोकरी करणे परवडते, असे मत विद्यार्थ्यांतून व्यक्त होत आहे. २०११ नंतर केंद्रीय शिक्षक भरती नाही. त्यामुळे डीएडची क्रेझ कमी झाली. विद्यार्थी बारावीनंतर बीबीए, एमबीए, एमएसडब्ल्यू यासारख्या अभ्यासक्रमांकडे वळत आहेत.

----

...म्हणून इतर अभ्यासक्रमांना प्रवेश

२००८ च्या माझ्या बारावीच्या ५० जणांच्या बॅचमध्ये २३ जणांनी डीएडला प्रवेश घेतला. त्यातील बहुतांश जणांना नोकरी मिळाली. मात्र, आता २०११ पासून केंद्रीय शिक्षक भरती नाही. त्यामुळे नोकरीच्या संधी कमी झाल्याने डीएडची क्रेझ कमी झाली. डीएड केल्यावरही नोकरी मिळेल याची हमी नसल्याने बहुतांश विद्यार्थी व्यवसाय पूरक अभ्यासक्रमांकडे वळतात.

- श्रीकांत सरवदे, शिक्षक, महात्मा गांधी अध्यापक विद्यालय, औरंगाबाद

---

प्राचार्य म्हणतात

दहा वर्षांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील प्रवेशासाठी १८ ते २० हजार अर्ज येत होते. हे प्रमाण प्रवेश क्षमतेच्या पाच पट अधिक होते. आता प्रवेश क्षमतेपेक्षा निम्मेही अर्ज येत नाहीत. २०१० नंतर डीएड केल्यावर नोकरी मिळेलच, असे चित्र न दिसल्याने हळूहळू डीएडकडे विद्यार्थी पाठ फिरवायला लागले आहेत.

- डाॅ. कलीमोद्दीन शेख, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था औरंगाबाद