शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
3
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
4
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
5
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
6
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
7
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
8
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
9
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
10
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
11
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
12
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
13
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
16
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
17
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
18
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
19
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
20
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी

शिक्षकाची नोकरी नको रे बाबा; डीएडकडे विद्यार्थ्यांची पाठ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:02 IST

दहा वर्षांपूर्वी प्रवेशासाठी चढाओढ : आता विद्यार्थी मिळणे झाले अवघड --- औरंगाबाद : अनेक वर्षांपासून शिक्षकांची भरत न झाल्याने ...

दहा वर्षांपूर्वी प्रवेशासाठी चढाओढ : आता विद्यार्थी मिळणे झाले अवघड

---

औरंगाबाद : अनेक वर्षांपासून शिक्षकांची भरत न झाल्याने डीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र राज्यभर आहे. जिल्ह्यात ३४ डीएड महाविद्यालयांत २ हजार ३०० प्रवेश क्षमता आहे. त्यासाठी पार पडलेल्या पहिल्या प्रवेश फेरीत केवळ ७०७ अर्ज आले. त्यामुळे दोन तृतीयांश जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. खाजगी शाळांत मिळणारे तुटपुंजे मानधन आणि दुरापास्त झालेल्या सरकारी शाळांतील नोकरीमुळे अलीकडे शिक्षकाची नोकरी नको रे बाबा, म्हणत डीएडकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे.

जिल्ह्यात २०१० पर्यंत ९० महाविद्यालये कार्यरत होती. विद्यार्थ्यांनी डीएडकडे पाठ फिरवायला सुरुवात केली. त्यामुळे कालांतराने अनेक महाविद्यालये बंद पडत गेली, तर काही महाविद्यालयांनी प्रवेश बंद केल्याने सध्या १ अनुदानित, ३ शासकीय आणि ३० खाजगी डीएड महाविद्यालये सुरू आहेत. २००० ते २०१० हा कालखंड डीएड महाविद्यालयांसाठी सुवर्ण काळ होता. गुणवत्तेवर आधारित प्रवेश क्षमतेत बहुतांश वेळी बारावी विज्ञान शाखेत चांगले गुण मिळवलेले विद्यार्थी डीएड करण्याचा आग्रह धरत. मात्र, सरकारी शाळांतील शिक्षक भरती होत नाही. शिवाय खाजगी शाळांत दिले जाणारे तुटपुंजे वेतन लक्षात घेऊन विद्यार्थी रोजगार पूरक अभ्यासक्रमांना आता प्राधान्य देत आहेत.

---

जिल्ह्यातील डीएड कॉलेज -३४

एकूण जागा -२३००

आलेले अर्ज -७०७

---

नोकरीची हमी नाही !

डीएड, बीएड करून नोकरी हमखास मिळेल त्याची हमी नाही. शासकीय नोकर भरतीला लागलेला खो आणि अनुदानित शाळांत नोकरी मिळवण्यासाठी मोजावे लागणारे पैसे, यापेक्षा व्यवसाय किंवा इतर नोकरी करणे परवडते, असे मत विद्यार्थ्यांतून व्यक्त होत आहे. २०११ नंतर केंद्रीय शिक्षक भरती नाही. त्यामुळे डीएडची क्रेझ कमी झाली. विद्यार्थी बारावीनंतर बीबीए, एमबीए, एमएसडब्ल्यू यासारख्या अभ्यासक्रमांकडे वळत आहेत.

----

...म्हणून इतर अभ्यासक्रमांना प्रवेश

२००८ च्या माझ्या बारावीच्या ५० जणांच्या बॅचमध्ये २३ जणांनी डीएडला प्रवेश घेतला. त्यातील बहुतांश जणांना नोकरी मिळाली. मात्र, आता २०११ पासून केंद्रीय शिक्षक भरती नाही. त्यामुळे नोकरीच्या संधी कमी झाल्याने डीएडची क्रेझ कमी झाली. डीएड केल्यावरही नोकरी मिळेल याची हमी नसल्याने बहुतांश विद्यार्थी व्यवसाय पूरक अभ्यासक्रमांकडे वळतात.

- श्रीकांत सरवदे, शिक्षक, महात्मा गांधी अध्यापक विद्यालय, औरंगाबाद

---

प्राचार्य म्हणतात

दहा वर्षांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील प्रवेशासाठी १८ ते २० हजार अर्ज येत होते. हे प्रमाण प्रवेश क्षमतेच्या पाच पट अधिक होते. आता प्रवेश क्षमतेपेक्षा निम्मेही अर्ज येत नाहीत. २०१० नंतर डीएड केल्यावर नोकरी मिळेलच, असे चित्र न दिसल्याने हळूहळू डीएडकडे विद्यार्थी पाठ फिरवायला लागले आहेत.

- डाॅ. कलीमोद्दीन शेख, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था औरंगाबाद