शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाची नोकरी नको रे बाबा; डीएडकडे विद्यार्थ्यांची पाठ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:02 IST

दहा वर्षांपूर्वी प्रवेशासाठी चढाओढ : आता विद्यार्थी मिळणे झाले अवघड --- औरंगाबाद : अनेक वर्षांपासून शिक्षकांची भरत न झाल्याने ...

दहा वर्षांपूर्वी प्रवेशासाठी चढाओढ : आता विद्यार्थी मिळणे झाले अवघड

---

औरंगाबाद : अनेक वर्षांपासून शिक्षकांची भरत न झाल्याने डीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र राज्यभर आहे. जिल्ह्यात ३४ डीएड महाविद्यालयांत २ हजार ३०० प्रवेश क्षमता आहे. त्यासाठी पार पडलेल्या पहिल्या प्रवेश फेरीत केवळ ७०७ अर्ज आले. त्यामुळे दोन तृतीयांश जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. खाजगी शाळांत मिळणारे तुटपुंजे मानधन आणि दुरापास्त झालेल्या सरकारी शाळांतील नोकरीमुळे अलीकडे शिक्षकाची नोकरी नको रे बाबा, म्हणत डीएडकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे.

जिल्ह्यात २०१० पर्यंत ९० महाविद्यालये कार्यरत होती. विद्यार्थ्यांनी डीएडकडे पाठ फिरवायला सुरुवात केली. त्यामुळे कालांतराने अनेक महाविद्यालये बंद पडत गेली, तर काही महाविद्यालयांनी प्रवेश बंद केल्याने सध्या १ अनुदानित, ३ शासकीय आणि ३० खाजगी डीएड महाविद्यालये सुरू आहेत. २००० ते २०१० हा कालखंड डीएड महाविद्यालयांसाठी सुवर्ण काळ होता. गुणवत्तेवर आधारित प्रवेश क्षमतेत बहुतांश वेळी बारावी विज्ञान शाखेत चांगले गुण मिळवलेले विद्यार्थी डीएड करण्याचा आग्रह धरत. मात्र, सरकारी शाळांतील शिक्षक भरती होत नाही. शिवाय खाजगी शाळांत दिले जाणारे तुटपुंजे वेतन लक्षात घेऊन विद्यार्थी रोजगार पूरक अभ्यासक्रमांना आता प्राधान्य देत आहेत.

---

जिल्ह्यातील डीएड कॉलेज -३४

एकूण जागा -२३००

आलेले अर्ज -७०७

---

नोकरीची हमी नाही !

डीएड, बीएड करून नोकरी हमखास मिळेल त्याची हमी नाही. शासकीय नोकर भरतीला लागलेला खो आणि अनुदानित शाळांत नोकरी मिळवण्यासाठी मोजावे लागणारे पैसे, यापेक्षा व्यवसाय किंवा इतर नोकरी करणे परवडते, असे मत विद्यार्थ्यांतून व्यक्त होत आहे. २०११ नंतर केंद्रीय शिक्षक भरती नाही. त्यामुळे डीएडची क्रेझ कमी झाली. विद्यार्थी बारावीनंतर बीबीए, एमबीए, एमएसडब्ल्यू यासारख्या अभ्यासक्रमांकडे वळत आहेत.

----

...म्हणून इतर अभ्यासक्रमांना प्रवेश

२००८ च्या माझ्या बारावीच्या ५० जणांच्या बॅचमध्ये २३ जणांनी डीएडला प्रवेश घेतला. त्यातील बहुतांश जणांना नोकरी मिळाली. मात्र, आता २०११ पासून केंद्रीय शिक्षक भरती नाही. त्यामुळे नोकरीच्या संधी कमी झाल्याने डीएडची क्रेझ कमी झाली. डीएड केल्यावरही नोकरी मिळेल याची हमी नसल्याने बहुतांश विद्यार्थी व्यवसाय पूरक अभ्यासक्रमांकडे वळतात.

- श्रीकांत सरवदे, शिक्षक, महात्मा गांधी अध्यापक विद्यालय, औरंगाबाद

---

प्राचार्य म्हणतात

दहा वर्षांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील प्रवेशासाठी १८ ते २० हजार अर्ज येत होते. हे प्रमाण प्रवेश क्षमतेच्या पाच पट अधिक होते. आता प्रवेश क्षमतेपेक्षा निम्मेही अर्ज येत नाहीत. २०१० नंतर डीएड केल्यावर नोकरी मिळेलच, असे चित्र न दिसल्याने हळूहळू डीएडकडे विद्यार्थी पाठ फिरवायला लागले आहेत.

- डाॅ. कलीमोद्दीन शेख, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था औरंगाबाद