शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
4
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
5
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
6
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
7
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
8
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
9
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
10
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
11
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
12
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
13
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
14
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
15
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
16
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
17
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
18
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
19
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
20
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पाणी आणा पाणी; पर्याय सूचवा ना...!; औरंगाबाद मनपामध्ये भाजपच्या मागणीला सेनेचे उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 13:34 IST

शहरात उपलब्ध पाणी आणि वाढती गरज लक्षात घेऊन प्रत्येकाला वाटते पाणी आणावे. पाणी आणायचे कसे, याचा पर्यायही सुचविण्यात यावा, असा टोला शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी भाजपला लगावला.

ठळक मुद्देजायकवाडीहून औरंगाबाद शहरापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकून पाणी आणण्यात यावे, अशी मागणी दोन दिवसांपूर्वीच भाजपतर्फे करण्यात आली होती.पाणी आणायचे कसे, याचा पर्यायही सुचविण्यात यावा, असा टोला शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी भाजपला लगावला.

औरंगाबाद : जायकवाडीहून औरंगाबाद शहरापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकून पाणी आणण्यात यावे, अशी मागणी दोन दिवसांपूर्वीच भाजपतर्फे करण्यात आली होती. शहरात उपलब्ध पाणी आणि वाढती गरज लक्षात घेऊन प्रत्येकाला वाटते पाणी आणावे. पाणी आणायचे कसे, याचा पर्यायही सुचविण्यात यावा, असा टोला शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी भाजपला लगावला. समांतर प्रकरण सर्वोच्च न्यायालय आणि लवादाकडे प्रलंबित आहे. यातून कोणता मार्ग काढावा हे कोणीच सांगत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

उन्हाळ्यात महापालिकेला पाणीपुरवठ्यात तारेवरची कसरत करावी लागते. दरवर्षी पाण्यावरून धरणे, निदर्शने, मोर्चे निघतात. कधी पाण्याच्या टाकीवर घेराव आंदोलन होते, तर कधी महापौर दालनात ठिय्या आंदोलन होते. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच महापालिकेत समांतरच्या मुद्यावरून राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे. दोन दिवसांपूर्वी स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल, उपमहापौर विजय औताडे यांनी मुख्य जलवाहिनी टाकून शहरात पाणी आणावे, अशी मागणी केली.

या मागणीला उत्तर देताना शुक्रवारी महापौर घोडेले म्हणाले की, सर्वांना कळतंय की, शहरात पाणी आणले पाहिजे. मुख्य जलवाहिनीचे काम कसे सुरू करणार? प्रकरण सर्वोच्च न्यायालय आणि लवादाकडे प्रलंबित आहे. शासन महापालिकेला स्वतंत्रपणे जलवाहिनी टाकण्यास मुभाही देत नाही. सव्वातीनशे कोटी रुपये समांतरचे बँकेत पडून आहेत, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. समांतरचे काम करणा-या युटिलिटी कंपनीने सर्वसाधारण सभेत आमची बाजू मांडू द्यावी असा विनंती अर्ज केला होता. हा अर्ज विधि विभागाकडे सल्ला घेण्यासाठी पाठवून दिला. त्यावर अद्याप निर्णय आलेला नाही.

समान पाणी वाटप म्हणजे काय भाऊ...एमआयएम पक्षाचे नगरसेवक मागील काही दिवसांपासून समान पाणी वाटपाची मागणी करीत आहेत. नेमके समान पाणी वाटप म्हणजे काय, याचा अर्थ तरी सांगावा. मुस्लिमबहुल वसाहतींना कमी आणि हिंदू वसाहतींना जास्त पाणी देण्यात येत आहे, हे सिद्ध करून दाखवावे, असे आवाहनही महापौरांनी केले.गुलमंडी, राजाबाजार, खाराकुंआ आदी वसाहतींनाही पाच ते सहा दिवसांनंतर पाणी मिळत आहे. या भागात तर सेनेचे मोठे नेते राहतात. विनाकारण राजकीय स्टंट सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

कारागृहातून येताच...एमआयएमचे दोन नगरसेवक कारागृहातून येताच पाणी प्रश्नावर वेगवेगळ्या पद्धतीने आपली भूमिका मांडत आहेत. एका नगरसेवकाने गुरुवारी स्थायी समितीमध्ये ठिय्या आंदोलन केले. दुसºया एका नगरसेवकाने वॉर्डात दूषित पाणी येत असल्याची तक्रार करीत २६ जानेवारीला मनपासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबादwater transportजलवाहतूक