शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
5
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
6
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
7
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
8
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
9
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
10
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
11
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
12
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
13
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
14
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
15
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
16
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
17
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
18
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
19
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
20
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव

पाणी आणा पाणी; पर्याय सूचवा ना...!; औरंगाबाद मनपामध्ये भाजपच्या मागणीला सेनेचे उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 13:34 IST

शहरात उपलब्ध पाणी आणि वाढती गरज लक्षात घेऊन प्रत्येकाला वाटते पाणी आणावे. पाणी आणायचे कसे, याचा पर्यायही सुचविण्यात यावा, असा टोला शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी भाजपला लगावला.

ठळक मुद्देजायकवाडीहून औरंगाबाद शहरापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकून पाणी आणण्यात यावे, अशी मागणी दोन दिवसांपूर्वीच भाजपतर्फे करण्यात आली होती.पाणी आणायचे कसे, याचा पर्यायही सुचविण्यात यावा, असा टोला शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी भाजपला लगावला.

औरंगाबाद : जायकवाडीहून औरंगाबाद शहरापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकून पाणी आणण्यात यावे, अशी मागणी दोन दिवसांपूर्वीच भाजपतर्फे करण्यात आली होती. शहरात उपलब्ध पाणी आणि वाढती गरज लक्षात घेऊन प्रत्येकाला वाटते पाणी आणावे. पाणी आणायचे कसे, याचा पर्यायही सुचविण्यात यावा, असा टोला शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी भाजपला लगावला. समांतर प्रकरण सर्वोच्च न्यायालय आणि लवादाकडे प्रलंबित आहे. यातून कोणता मार्ग काढावा हे कोणीच सांगत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

उन्हाळ्यात महापालिकेला पाणीपुरवठ्यात तारेवरची कसरत करावी लागते. दरवर्षी पाण्यावरून धरणे, निदर्शने, मोर्चे निघतात. कधी पाण्याच्या टाकीवर घेराव आंदोलन होते, तर कधी महापौर दालनात ठिय्या आंदोलन होते. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच महापालिकेत समांतरच्या मुद्यावरून राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे. दोन दिवसांपूर्वी स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल, उपमहापौर विजय औताडे यांनी मुख्य जलवाहिनी टाकून शहरात पाणी आणावे, अशी मागणी केली.

या मागणीला उत्तर देताना शुक्रवारी महापौर घोडेले म्हणाले की, सर्वांना कळतंय की, शहरात पाणी आणले पाहिजे. मुख्य जलवाहिनीचे काम कसे सुरू करणार? प्रकरण सर्वोच्च न्यायालय आणि लवादाकडे प्रलंबित आहे. शासन महापालिकेला स्वतंत्रपणे जलवाहिनी टाकण्यास मुभाही देत नाही. सव्वातीनशे कोटी रुपये समांतरचे बँकेत पडून आहेत, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. समांतरचे काम करणा-या युटिलिटी कंपनीने सर्वसाधारण सभेत आमची बाजू मांडू द्यावी असा विनंती अर्ज केला होता. हा अर्ज विधि विभागाकडे सल्ला घेण्यासाठी पाठवून दिला. त्यावर अद्याप निर्णय आलेला नाही.

समान पाणी वाटप म्हणजे काय भाऊ...एमआयएम पक्षाचे नगरसेवक मागील काही दिवसांपासून समान पाणी वाटपाची मागणी करीत आहेत. नेमके समान पाणी वाटप म्हणजे काय, याचा अर्थ तरी सांगावा. मुस्लिमबहुल वसाहतींना कमी आणि हिंदू वसाहतींना जास्त पाणी देण्यात येत आहे, हे सिद्ध करून दाखवावे, असे आवाहनही महापौरांनी केले.गुलमंडी, राजाबाजार, खाराकुंआ आदी वसाहतींनाही पाच ते सहा दिवसांनंतर पाणी मिळत आहे. या भागात तर सेनेचे मोठे नेते राहतात. विनाकारण राजकीय स्टंट सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

कारागृहातून येताच...एमआयएमचे दोन नगरसेवक कारागृहातून येताच पाणी प्रश्नावर वेगवेगळ्या पद्धतीने आपली भूमिका मांडत आहेत. एका नगरसेवकाने गुरुवारी स्थायी समितीमध्ये ठिय्या आंदोलन केले. दुसºया एका नगरसेवकाने वॉर्डात दूषित पाणी येत असल्याची तक्रार करीत २६ जानेवारीला मनपासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबादwater transportजलवाहतूक