शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शहरालगतच्या ग्रामपंचायतींचा समावेश महापालिकेत नकोच; जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 12:12 IST

आर्थिक सक्षम ग्रामपंचायती स्वायत्त ठेवा, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत गुरुवारी संमत करण्यात आला.

ठळक मुद्देआर्थिक सक्षम ग्रामपंचायती स्वायत्त ठेवामनपात समाविष्ट करून नागरिकांचे हाल करू नका.

औरंगाबाद : महापालिका हद्दीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून ते अनेक सुविधांची वाणवा आहे. त्यात वाळूज परिसरातील जोगेश्वरी, रांजणगाव, वडगाव, पंढरपूर या सक्षम व सुविधा पुरवणाऱ्या ग्रामपंचायतीचे क्षेत्र महापालिकेत समाविष्ट करण्यास जिल्हा परिषद सदस्यांनी विरोध दर्शविला. मनपात समाविष्ट करून नागरिकांचे हाल करू नका. आर्थिक सक्षम ग्रामपंचायती स्वायत्त ठेवा, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत गुरुवारी संमत करण्यात आला.

अध्यक्षा मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. सदस्य रमेश गायकवाड यांनी जोगेश्वरी, रांजणगाव, वडगाव, पंढरपूर या ग्रामपंचायतींची स्वायत्तता अबाधित ठेवण्याचा ठराव मांडला. तर ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना आगीतून फुफाट्यात टाकू नका म्हणत मधुकर वालतुरे यांंनी ठरावाला अनुमोदन दिले. मंजूर ठराव आणि सदस्यांसह गावकऱ्यांच्या भावना शासनाला कळविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

नियोजनावरुन सदस्यांची नाराजीजिल्हा परिषदेच्या निधी नियोजनाची माहिती स्थायी समितीसमोर ठेवायला हवी. नियोजनात सर्वांना समान न्याय द्या. ग्रामीण भागाच्या विकासासाठी आलेला निधी वापरता येत नसेल तर निधी कोरोनाला देऊन टाका. अशी उद्विग्न अन् संतप्त भावना तायडे यांनी व्यक्त केली. मार्चअखेर आला तरी अद्याप नियोजन होत नसेल तर जबाबदारी निश्चित करून कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली. आधी ३३ टक्के नंतर ५९ टक्के, त्यानंतर १०० टक्के असे निकष बदलले. सुधारित मंजुरी मिळाली त्यानुसार नियोजन अंतिम टप्प्यात असून निधी परत जाऊ देणार नसल्याचे आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी स्पष्ट केले. यावेळी उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, समाजकल्याण सभापती मोनाली राठोड, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण, शिवाजी पाथ्रीकर, किशोर पाटील, केशवराव तायडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संतोष कवडे उपस्थित होते.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWalujवाळूज